शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आयकर जमा करण्यास विलंब

By admin | Updated: June 11, 2017 01:29 IST

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनातून कपात केलेली आयकराची रक्कम ३१ मे नंतर सुध्दा जिल्हा कोषागार कार्यालयाने

सेवानिवृत्तांना भुर्दंड : जिल्हा कोषागार कार्यालयाचा नियोजनशून्य कारभार उजेडात महेंद्र चचाणे । लोकमत न्यूज नेटवर्क देसाईगंज : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनातून कपात केलेली आयकराची रक्कम ३१ मे नंतर सुध्दा जिल्हा कोषागार कार्यालयाने आयकर विभागाकडे जमा केली नाही. उशिरा रक्कम जमा केल्याने याचा भूर्दंड सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर पडणार आहे. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी कोषागार कार्यालयाच्या कार्यप्रणालीबाबत संताप व्यक्त केला आहे. अधिकारी, कर्मचारी, अनुदानित शाळेचे कर्मचारी यांचे वेतन जिल्हा कोषागार कार्यालयाच्या मार्फत राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जमा होते. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या जानेवारी व फेब्रुवारी या महिन्यात आयकर बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनातून आयकराची रक्कम कपात केली जाते. आर्थिक वर्ष २०१६-१७ या वर्षाची आयकराची रक्कम जिल्हा कोषागार कार्यालयाने जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातच कपात केली. मात्र सदर रक्कम आता तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही आयकर विभागाकडे जमा केली नाही. आयकर रिटर्न फार्म सादर करण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचारी आॅडीटर गेले असता, कपात झालेली रक्कम कोषागार कार्यालयाने आयकर विभागाकडे जमा केली नसल्याचे उघड झाले आहे. आयकर विभागाच्या नियमानुसार तीन महिन्यांचा एक हप्ता याप्रमाणे वर्षाला चारदा आयकराची रक्कम चालानद्वारे आयकर विभागाकडे जमा करावी लागते. कोणत्याही परिस्थितीत आयकराची रक्कम आयकर विभगाकडे ३१ मे पर्यंत जमा झाली पाहिजे, असा नियम आहे. ३१ जुलैपर्यंत आयकराची रक्कम अदा केली असल्याचा रिटर्न फार्म सादर करून घ्यावा लागतो. ३१ मे नंतर आयकर विभागाकडे जमा केलेल्या आयकराच्या रकमेवर आयकर नियम २३ एई अंतर्गत प्रती दिवस २०० रूपये प्रमाणे विलंब शुल्क आकारले जाते. या व्यतिरिक्त आयकर नियम २०१ (१ ए) नुसार प्रती महिना १.५ टक्के व्याज आकारला जातो. आयकराची रक्कम अदा करण्याची नोटीस आयकर विभागाकडून दिली जाते. त्यामुळे जिल्हा कोषागार कार्यालयाकडून अद्याप भरणा न झालेल्या आयकरासाठी सेवानिवृत्त कर्मचारी दोषी नसतानाही त्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे कोषागार विभागाविषयी त्यांच्यामध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. यावर तोडगा काढावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.