शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
2
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
3
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
4
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
5
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
6
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
7
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
8
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
9
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
10
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
11
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
12
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!
14
पहलगामनंतर आता दिल्ली..; 7 महिन्यात 41 भारतीयांचा मृत्यू, काँग्रेसचा मोदी-शाहांवर निशाणा
15
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
16
Groww IPO Allotment and GMP: ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
17
वाहतूककोंडीचा त्रास संपवण्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत टोल नाक्याचा प्रस्ताव
18
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
19
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...

शाळा सुरूचा ठराव देण्यास ग्रामपंचायतींकडून विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 05:00 IST

दीड वर्षापासून शाळा बंद आहेत, त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम हाेत आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने, शासनाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग नियमांचे पालन करून, १५ जुलैपासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, शाळा सुरू करण्यास ग्रामपंचायतीचा ठराव, पालकांची परवानगी व त्या गावांतील कोरोनाची स्थिती याचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत.

ठळक मुद्देभेंडाळा परिसरातील विद्यार्थ्यांचे हाेत आहे नुकसान

राेशन थाेरातलाेकमत न्यूज नेटवर्कभेंडाळा : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील विश्वशांती विद्यालयात परिसरातील फराडा, मोहुर्ली, मार्कंडा, नवेगाव, वाघोली या गावांमधील विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेेने या ग्रामपंचायतींकडून शाळा सुरू करण्यासंबंधी ठरावाची मागणी केली आहे.  मात्र,  देण्यास दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष बाब अशी की, या ग्रामपंचायतीच्या हद्दीत गेल्या महिन्याभरात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. दीड वर्षापासून शाळा बंद आहेत, त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम हाेत आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने, शासनाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग नियमांचे पालन करून, १५ जुलैपासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, शाळा सुरू करण्यास ग्रामपंचायतीचा ठराव, पालकांची परवानगी व त्या गावांतील कोरोनाची स्थिती याचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्या अनुषंगाने विश्वशांती विद्यालयाने शाळा सुरू करण्यासाठी दि. १२ जुलैला फराडा, मोहुर्ली, मार्कंडा, नवेगाव, वाघोली या ग्रामपंचायतीकडे ठरावाच्या मागणीचे निवेदन देण्यात आले, पण आता पंधरा दिवस झाले, या ग्रामपंचायतीने अजूनही ठराव दिला नसल्याने, त्या गावांतील विद्यार्थी प्रत्यक्षात अजूनही शाळेत येऊ शकत नाही. शाळेचे मुख्याध्यापक यांनी अनेक वेळा भ्रमणध्वनीद्वारे आणि प्रत्यक्ष जाऊन ठराव घेण्याविषयी विनंती केली. मात्र, अजूनपर्यंत ठराव घेण्यात आला नाही.

जिल्हाभरातही हीच स्थितीशासनाने आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये अनेक गावचे विद्यार्थी येतात. ज्या गावचे विद्यार्थी आहेत, त्या गावाच्या ग्रामपंचायतीची संमती असणे आवश्यक आहे. मात्र अनेक ग्रामपंचायतींनी अजूनपर्यंत ठरावच घेतले नसल्याने त्या गावातील विद्यार्थी शाळेपासून वंचित राहत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायतींनी लवकर ठराव घेण्याची गरज आहे. 

पहिले ते सातवीचेही वर्ग सुरू करण्याची जाेर धरताहे मागणी

- जिल्हा व राज्यभरात काेराेना रुग्णांची संख्या कमालीची घटली आहे. गडचिराेली जिल्ह्यात केवळ आता ७० रुग्ण उपचार घेत आहेत. काेराेनामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. पहिलीच्या विद्यार्थ्यांनी तर अजूनपर्यंत शाळाच बघितली नाही.- काेराेनाचा प्रभाव प्रामुख्याने शहरी भागात दिसून येते. ग्रामीण भागात काेराेनाचा फारसा प्रसार झाला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्यास काहीच हरकत नाही. काही हाेतकरू शिक्षक विद्यार्थ्यांना शाळेत बाेलावून शिकवत आहेत.

 

टॅग्स :Schoolशाळाgram panchayatग्राम पंचायत