शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

शाळा सुरूचा ठराव देण्यास ग्रामपंचायतींकडून विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 05:00 IST

दीड वर्षापासून शाळा बंद आहेत, त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम हाेत आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने, शासनाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग नियमांचे पालन करून, १५ जुलैपासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, शाळा सुरू करण्यास ग्रामपंचायतीचा ठराव, पालकांची परवानगी व त्या गावांतील कोरोनाची स्थिती याचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत.

ठळक मुद्देभेंडाळा परिसरातील विद्यार्थ्यांचे हाेत आहे नुकसान

राेशन थाेरातलाेकमत न्यूज नेटवर्कभेंडाळा : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील विश्वशांती विद्यालयात परिसरातील फराडा, मोहुर्ली, मार्कंडा, नवेगाव, वाघोली या गावांमधील विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेेने या ग्रामपंचायतींकडून शाळा सुरू करण्यासंबंधी ठरावाची मागणी केली आहे.  मात्र,  देण्यास दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष बाब अशी की, या ग्रामपंचायतीच्या हद्दीत गेल्या महिन्याभरात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. दीड वर्षापासून शाळा बंद आहेत, त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम हाेत आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने, शासनाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग नियमांचे पालन करून, १५ जुलैपासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, शाळा सुरू करण्यास ग्रामपंचायतीचा ठराव, पालकांची परवानगी व त्या गावांतील कोरोनाची स्थिती याचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्या अनुषंगाने विश्वशांती विद्यालयाने शाळा सुरू करण्यासाठी दि. १२ जुलैला फराडा, मोहुर्ली, मार्कंडा, नवेगाव, वाघोली या ग्रामपंचायतीकडे ठरावाच्या मागणीचे निवेदन देण्यात आले, पण आता पंधरा दिवस झाले, या ग्रामपंचायतीने अजूनही ठराव दिला नसल्याने, त्या गावांतील विद्यार्थी प्रत्यक्षात अजूनही शाळेत येऊ शकत नाही. शाळेचे मुख्याध्यापक यांनी अनेक वेळा भ्रमणध्वनीद्वारे आणि प्रत्यक्ष जाऊन ठराव घेण्याविषयी विनंती केली. मात्र, अजूनपर्यंत ठराव घेण्यात आला नाही.

जिल्हाभरातही हीच स्थितीशासनाने आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये अनेक गावचे विद्यार्थी येतात. ज्या गावचे विद्यार्थी आहेत, त्या गावाच्या ग्रामपंचायतीची संमती असणे आवश्यक आहे. मात्र अनेक ग्रामपंचायतींनी अजूनपर्यंत ठरावच घेतले नसल्याने त्या गावातील विद्यार्थी शाळेपासून वंचित राहत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायतींनी लवकर ठराव घेण्याची गरज आहे. 

पहिले ते सातवीचेही वर्ग सुरू करण्याची जाेर धरताहे मागणी

- जिल्हा व राज्यभरात काेराेना रुग्णांची संख्या कमालीची घटली आहे. गडचिराेली जिल्ह्यात केवळ आता ७० रुग्ण उपचार घेत आहेत. काेराेनामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. पहिलीच्या विद्यार्थ्यांनी तर अजूनपर्यंत शाळाच बघितली नाही.- काेराेनाचा प्रभाव प्रामुख्याने शहरी भागात दिसून येते. ग्रामीण भागात काेराेनाचा फारसा प्रसार झाला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्यास काहीच हरकत नाही. काही हाेतकरू शिक्षक विद्यार्थ्यांना शाळेत बाेलावून शिकवत आहेत.

 

टॅग्स :Schoolशाळाgram panchayatग्राम पंचायत