शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
5
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
6
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
7
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
8
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
9
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
10
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
11
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
12
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
13
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
14
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
15
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
16
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
17
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
18
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
19
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
20
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

शाळा सुरूचा ठराव देण्यास ग्रामपंचायतींकडून विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 05:00 IST

दीड वर्षापासून शाळा बंद आहेत, त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम हाेत आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने, शासनाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग नियमांचे पालन करून, १५ जुलैपासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, शाळा सुरू करण्यास ग्रामपंचायतीचा ठराव, पालकांची परवानगी व त्या गावांतील कोरोनाची स्थिती याचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत.

ठळक मुद्देभेंडाळा परिसरातील विद्यार्थ्यांचे हाेत आहे नुकसान

राेशन थाेरातलाेकमत न्यूज नेटवर्कभेंडाळा : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील विश्वशांती विद्यालयात परिसरातील फराडा, मोहुर्ली, मार्कंडा, नवेगाव, वाघोली या गावांमधील विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेेने या ग्रामपंचायतींकडून शाळा सुरू करण्यासंबंधी ठरावाची मागणी केली आहे.  मात्र,  देण्यास दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष बाब अशी की, या ग्रामपंचायतीच्या हद्दीत गेल्या महिन्याभरात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. दीड वर्षापासून शाळा बंद आहेत, त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम हाेत आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने, शासनाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग नियमांचे पालन करून, १५ जुलैपासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, शाळा सुरू करण्यास ग्रामपंचायतीचा ठराव, पालकांची परवानगी व त्या गावांतील कोरोनाची स्थिती याचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्या अनुषंगाने विश्वशांती विद्यालयाने शाळा सुरू करण्यासाठी दि. १२ जुलैला फराडा, मोहुर्ली, मार्कंडा, नवेगाव, वाघोली या ग्रामपंचायतीकडे ठरावाच्या मागणीचे निवेदन देण्यात आले, पण आता पंधरा दिवस झाले, या ग्रामपंचायतीने अजूनही ठराव दिला नसल्याने, त्या गावांतील विद्यार्थी प्रत्यक्षात अजूनही शाळेत येऊ शकत नाही. शाळेचे मुख्याध्यापक यांनी अनेक वेळा भ्रमणध्वनीद्वारे आणि प्रत्यक्ष जाऊन ठराव घेण्याविषयी विनंती केली. मात्र, अजूनपर्यंत ठराव घेण्यात आला नाही.

जिल्हाभरातही हीच स्थितीशासनाने आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये अनेक गावचे विद्यार्थी येतात. ज्या गावचे विद्यार्थी आहेत, त्या गावाच्या ग्रामपंचायतीची संमती असणे आवश्यक आहे. मात्र अनेक ग्रामपंचायतींनी अजूनपर्यंत ठरावच घेतले नसल्याने त्या गावातील विद्यार्थी शाळेपासून वंचित राहत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायतींनी लवकर ठराव घेण्याची गरज आहे. 

पहिले ते सातवीचेही वर्ग सुरू करण्याची जाेर धरताहे मागणी

- जिल्हा व राज्यभरात काेराेना रुग्णांची संख्या कमालीची घटली आहे. गडचिराेली जिल्ह्यात केवळ आता ७० रुग्ण उपचार घेत आहेत. काेराेनामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. पहिलीच्या विद्यार्थ्यांनी तर अजूनपर्यंत शाळाच बघितली नाही.- काेराेनाचा प्रभाव प्रामुख्याने शहरी भागात दिसून येते. ग्रामीण भागात काेराेनाचा फारसा प्रसार झाला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्यास काहीच हरकत नाही. काही हाेतकरू शिक्षक विद्यार्थ्यांना शाळेत बाेलावून शिकवत आहेत.

 

टॅग्स :Schoolशाळाgram panchayatग्राम पंचायत