शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
4
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
5
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
6
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
7
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
8
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
9
...तरच महिलांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, महाराष्ट्र सरकारने नियम बदलले
10
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
11
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
12
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
13
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
14
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
15
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
16
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
17
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
19
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
20
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली

पुलावर कठडे लावण्यास विलंब

By admin | Updated: November 13, 2015 01:25 IST

पावसाळा संपून जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटत आहे. परंतु गडचिरोली- चंद्रपूर सीमेवर आष्टीनजीक वैनंगगा नदीवर....

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : पावसाळ्यानंतर दोन महिने उलटले; अपघाताची शक्यताआष्टी : पावसाळा संपून जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटत आहे. परंतु गडचिरोली- चंद्रपूर सीमेवर आष्टीनजीक वैनंगगा नदीवर असलेल्या पुलावरील पावसाळ्यापूर्वी काढलेले कठडे अद्यापही लावण्यात न आल्याने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभाग पुलावर कठडे लावण्याचे काम करीत असते. परंतु यंदा संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आष्टी- गोंडपिंपरी मार्गावरील वैनगंगा नदीवरील पुलाचे बांधकाम ४० वर्षांपूर्वी करण्यात आले. सदर पूल ठेंगणा असल्याने दरवर्षी पावसाळ्यात या पुलावरून पुराचे पाणी वाहते. परिणामी अनेकदा सदर मार्ग बंद असतो. पावसाळ्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुलावरील लोखंडी कठडे काढले जाते. पावसाळा संपेपर्यंत कठड्यांशिवाय या मार्गाने पुलावरून वाहतूक होत असते. त्यामुळे पुलावरून वाहने चालविताना वाहनधारकांना कसरत करावी लागते. अहेरी- चंद्रपूर मार्गावर असलेल्या या पुलावरून दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. एसटी महामंडळाच्या बसेस, बांबूची वाहतूक करणारे ट्रक, ट्रेलर यासह अन्य जड वाहनांची वाहतूक होत असते. त्यामुळे पुलावरून दुचाकी वाहनधारकांना सावकाश वाहन चालवावे लागते. पुलांवर कठड्यांअभावी अनेकदा अपघात घडले आहेत. ट्रक, सुमो यासह दुचाके वाहने नदीत कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाळा संपल्यानंतर लगेच कठडे लावणे गरजेचे होते. मात्र याकडे सांबाविचे दुर्लक्ष होत आहे.(प्रतिनिधी)