शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

जोगीसाखरात तीव्र पाणी टंचाई

By admin | Updated: June 13, 2014 00:09 IST

येथील वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असल्याने नळामार्फत दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावापासून २ किमी अंतरावर असलेल्या

जोगीसाखरा : येथील वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असल्याने नळामार्फत दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावापासून २ किमी अंतरावर असलेल्या रोपवाटिकेतील पाणी आणून नागरिक आपली तहान भागवितात. वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असल्याने कामाचा नागरिकांना फटका सहन करावा लागत आहे.भर उन्हाळ्यात नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम ग्रामपंचायत प्रशासनातर्फे केले जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम काही दिवसापासून सुरू आहे. परंतु काम सुरू केल्यानंतर आठ ते दहा दिवस नळाचे पाणी कायमचे बंद करण्यात आले होते. लोकमतमध्ये पाणी टंचाईसंदर्भातील वृत्त प्रकाशित होताच घागरमोर्चा निघेल या भीतीने नदीचे वाहते दुषित पाणी नळामार्फत गावात सोडले गेले. परंतु सदर पाणी पिण्यायोग्य नव्हते. नदीचे नळामार्फत सोडलेले पाणी पिण्यास वापरू नये, अशी दवंडी ग्रामपंचायत प्रशासनामार्फत देणे गरजेचे होते. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक नागरिकांनी दुषित पाण्याचा वापर केल्याने किरकोळ आजार किंवा साथीच्या आजाराची लागण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नळामार्फत गढूळ पाण्याचा पुरवठा करून नागरिकांना शांत करण्याचा ग्रामपंचायत प्रशासनाने प्रयत्न केला. परंतु सदर पाणी पिण्यायोग्य नसल्याने अनेक नागरिकांनी पाण्याचा वापर करणे टाळले. त्यामुळे गावापासून २ किमी अंतरावर असलेल्या रोपवाटिकेतील पाणी पिण्यासाठी नागरिकांना आणावे लागत आहे. गावातील अनेक नागरिक नदीतील चुव्याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी करीत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात जोगीसाखरा येथे दरवर्षी पिण्याच्या पाण्याची काही प्रमाणात टंचाई असते. याची जाणीव ग्रामपंचायत प्रशासनाला असतांनाही ऐन उन्हाळ्यात वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम ग्रामपंचायत प्रशासनाने का सुरू केले,असा प्रश्नही गावकरी करीत आहेत. जोगीसाखरा येथील लोकसंख्या ३ हजाराच्या आसपास आहे. त्यामुळे गावात असलेले पाण्याचे स्त्रोत अत्यल्प प्रमाणात आहेत. गावात निर्माण झालेली भीषण पाणी टंचाईची समस्या कधी सुटणार, असा सवालही गावातील नागरिक प्रशासनाला करीत आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावातील पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन त्वरित सोडवावी, अशी मागणी जोगीसाखरा येथील नागरिकांंकडून केली जात आहे. (वार्ताहर)