शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
4
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
7
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
10
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
11
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
12
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
13
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
14
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
15
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
16
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
17
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
18
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
19
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
20
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा

जोगीसाखरात तीव्र पाणी टंचाई

By admin | Updated: June 13, 2014 00:09 IST

येथील वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असल्याने नळामार्फत दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावापासून २ किमी अंतरावर असलेल्या

जोगीसाखरा : येथील वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असल्याने नळामार्फत दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावापासून २ किमी अंतरावर असलेल्या रोपवाटिकेतील पाणी आणून नागरिक आपली तहान भागवितात. वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असल्याने कामाचा नागरिकांना फटका सहन करावा लागत आहे.भर उन्हाळ्यात नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम ग्रामपंचायत प्रशासनातर्फे केले जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम काही दिवसापासून सुरू आहे. परंतु काम सुरू केल्यानंतर आठ ते दहा दिवस नळाचे पाणी कायमचे बंद करण्यात आले होते. लोकमतमध्ये पाणी टंचाईसंदर्भातील वृत्त प्रकाशित होताच घागरमोर्चा निघेल या भीतीने नदीचे वाहते दुषित पाणी नळामार्फत गावात सोडले गेले. परंतु सदर पाणी पिण्यायोग्य नव्हते. नदीचे नळामार्फत सोडलेले पाणी पिण्यास वापरू नये, अशी दवंडी ग्रामपंचायत प्रशासनामार्फत देणे गरजेचे होते. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक नागरिकांनी दुषित पाण्याचा वापर केल्याने किरकोळ आजार किंवा साथीच्या आजाराची लागण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नळामार्फत गढूळ पाण्याचा पुरवठा करून नागरिकांना शांत करण्याचा ग्रामपंचायत प्रशासनाने प्रयत्न केला. परंतु सदर पाणी पिण्यायोग्य नसल्याने अनेक नागरिकांनी पाण्याचा वापर करणे टाळले. त्यामुळे गावापासून २ किमी अंतरावर असलेल्या रोपवाटिकेतील पाणी पिण्यासाठी नागरिकांना आणावे लागत आहे. गावातील अनेक नागरिक नदीतील चुव्याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी करीत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात जोगीसाखरा येथे दरवर्षी पिण्याच्या पाण्याची काही प्रमाणात टंचाई असते. याची जाणीव ग्रामपंचायत प्रशासनाला असतांनाही ऐन उन्हाळ्यात वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम ग्रामपंचायत प्रशासनाने का सुरू केले,असा प्रश्नही गावकरी करीत आहेत. जोगीसाखरा येथील लोकसंख्या ३ हजाराच्या आसपास आहे. त्यामुळे गावात असलेले पाण्याचे स्त्रोत अत्यल्प प्रमाणात आहेत. गावात निर्माण झालेली भीषण पाणी टंचाईची समस्या कधी सुटणार, असा सवालही गावातील नागरिक प्रशासनाला करीत आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावातील पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन त्वरित सोडवावी, अशी मागणी जोगीसाखरा येथील नागरिकांंकडून केली जात आहे. (वार्ताहर)