शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
4
राहुल गांधींना वाचन करण्याचा आदेश कसा द्यायचा? सावरकरांवरील याचिका हायकोर्टाने फेटाळली
5
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
6
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
7
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
8
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं
9
४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल
10
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
11
बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी
12
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
13
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
14
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
15
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
16
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार
17
Ritual: स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये असे म्हणतात; पण का? जाणून घ्या शास्त्रार्थ!
18
जुन्या घरात सापडला सांगाडा, नोकियाच्या फोनने असं उघड केलं १० वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूचं गुपित, पोलिसही अवाक्
19
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१५,११४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
20
Manglagauri 2025 Date: यंदा मंगळागौर कधी? ही घ्या तारखांची यादी, 'अशी' करा सुंदर तयारी लवकर..

पाण्याच्या पातळीत घट

By admin | Updated: December 17, 2015 01:53 IST

कमी खर्चात, कमी वेळात व कमी जागेत तयार होणाऱ्या विंधन विहिरीकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

रावणवाडी : कमी खर्चात, कमी वेळात व कमी जागेत तयार होणाऱ्या विंधन विहिरीकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यात पाण्याचे पुनर्भरण लवकर होत असल्यामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली जात असल्याची बाब पुढे येत आहे.पूर्वी पाण्याचे साधन म्हणून विहिरी खोदण्याकडे नागरिकांचा अधिक भर होता. त्यासाठी लागणारी भरपूर जागा, खोदकामास लागणारा भरपूर वेळ, त्यातून निघणारी माती व मलब्याची विल्हेवाट लाण्याची समस्या यामुळे बोअरवेल खोदण्याकडे नागरिकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. बोअरवेलमधून भरपूर शुद्ध पाणी उपलब्ध होतो, त्यामुळे परिसरात ठिकठिकाणी बोअरवेल्स उभारण्यास नागरिकांनी सुरूवात केली आहे.बोअरवेल्स उभारण्यासाठी जमिनीच्या पृष्ठभागात जवळपास २०० ते २५० फुटांपर्यंत यंत्राद्वारे खोदकाम करावे लागते. यावर स्वयंचलित विद्युत यंत्र बसवून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा दैनंदिन वापरात मुबलक सिंचनासाठी केला जातो. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे.पूर्वी पावसाचे पाणी थेट विहिरीत जायचे. मात्र बोअरवेल्सचे तसे नाही. पावसाचे पडलेले पाणी सहजासहजी बोअरवेल्समध्ये मुरत नाही. पावसाचे पाणी ४० ते ५० फुटांपर्यंत झिरपण्यासाठी कित्येक वर्षांचा कालावधी लागतो. तत्पूर्वी जमिनीतील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याने पाण्याची पातळी खाली जात आहे. बोअरवेल्समधून पाण्याचा उपसा झाल्यानंतर परिसरातील पाण्याच्या पातळीवर विपरित परिणाम होत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असल्यामुळे सध्या बोअरवेल खोदण्यासाठी अधिकचे २०० ते ३०० फुटापर्यंत खोदकाम करावे लागत आहे.