शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
2
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
3
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
4
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
5
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
6
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
7
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
8
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
9
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
10
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
11
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
12
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
13
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
14
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
15
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
20
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?

बालमृत्यूच्या संख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 00:12 IST

दुर्गम क्षेत्र असल्याने आरोग्य सुविधा पुरविण्यात येत असलेल्या अडचणी हळूहळू का होईना, दूर होत असल्याने आरोग्यसेवेत सुधारणा होत आहे. परिणामी जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. मात्र कुपोषण निर्मूलनात यंत्रणेला अजूनही अपेक्षित यश आलेले नाही.

ठळक मुद्देकुपोषण मात्र वाढले : अंगणवाडी सेविका झाल्या ‘स्मार्ट’

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दुर्गम क्षेत्र असल्याने आरोग्य सुविधा पुरविण्यात येत असलेल्या अडचणी हळूहळू का होईना, दूर होत असल्याने आरोग्यसेवेत सुधारणा होत आहे. परिणामी जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. मात्र कुपोषण निर्मूलनात यंत्रणेला अजूनही अपेक्षित यश आलेले नाही. दरम्यान कुपोषण निर्मूलनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या हाती आता स्मार्ट फोन आले असून त्यामुळे त्यांचे काम अधिक अपडेट होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.गेल्या तीन वर्षातील बालमृत्यूचे आकडे पाहिल्यास २०१६-१७ या वर्षात ० ते १ वर्ष वयोगटातील ५२५ बालकांचा तर १ ते ५ वर्षे वयातील ८८ बालकांचा मृत्यू विविध कारणांनी झाला होता. २००१७-१८ मध्ये हे प्रमाण कमी झाले. या वर्षात ० ते १ वर्ष वयातील ५०० बालक आणि १ ते ५ वर्ष वयातील ७० बालकांना जीव गमवावा लागला होता. २०१८-१९ मध्ये बालमृत्यूचे प्रमाण अजून कमी झाले. या वर्षात ० ते १ वर्षे वयोगटातील ४४२ तर १ ते ५ वर्षे वयोगटातील ४५ बालकांचा मृत्यू झाला. यावर्षी एप्रिल महिन्यात ० ते ५ वर्षापर्यंतची एकूण १४ बालके दगावली आहेत.गेल्यावर्षी रुग्णांच्या सेवेत दाखल झालेल्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयात जिल्हाभरातील बालकांवर उपचार केले जात आहेत. १०० खाटांच्या या रुग्णालयात दाखल होणाºया रुग्णांचे प्रमाण जास्त असल्यामुळे या रुग्णालयावर आरोग्य सेवेचा मोठा ताण आहे. मात्र आता अतिरिक्त १०० खाटांना मंजुरी मिळाल्याने या रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचे संख्याबळ वाढून आरोग्य सेवा अधिक चांगली होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे भविष्यात बालमृत्यूचे प्रमाण अजून कमी होऊ शकेल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर यांनी सांगितले.जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण मात्र वाढत आहे. बालकांपासून तर गर्भवती माता, स्तनदा मातांना आणि किशोरवयीन मुलींनासुद्धा पोषण आहार देण्याची व्यवस्था आहे. परंतू दुर्गम भागातील तांत्रिक अडचणींमुळे हा आहार अनेक लाभार्थ्यांच्या पोटात जात नाही. त्यासाठी जनजागृती करण्यात यंत्रणा कमी पडत आहे.नेट कव्हरेजअभावी आॅफलाईन सेवाअंगणवाड्यांमधील कामकाजाची दैनंदिन माहिती प्रशासकीय यंत्रणेला मिळण्यासाठी जिल्ह्यातील २२८७ ग्रामीण आणि ८९ शहरी भागातील अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन देण्यात आले आहेत. यामुळे त्यांना माहिती भराव्या लागणाऱ्या ११ रजिस्टरपैकी १० रजिस्टर कमी होऊन ती सर्व माहिती आॅनलाईन अपलोड करण्याचे नियोजन आहे. परंतू जिल्ह्याच्या दुर्गम भागात इंटरनेट कव्हरेजच नसल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी तूर्त ती माहिती आॅफलाईनच भरावी लागणार आहे. त्यामुळे स्मार्टफोनचा अपेक्षित उद्देश साध्य करण्यासाठी वेळ लागणार आहे.मानव विकास मिशनच्या शिबिरांमधून उपचारजिल्ह्यातील ४७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बालरोग तज्ज्ञ नसले तरी या केंद्रांमध्ये महिन्यातून महिन्यातून दोन वेळा बालरोग तज्ज्ञांच्या उपस्थितीत आरोग्य तपासणी शिबिरे घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मानव विकास मिशनच्या निधीतून घेतल्या जाणाऱ्या या शिबिरांमध्ये ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालयांमधील बाल आणि स्त्रीरोग तज्ज्ञांना पाचारण करून त्यांच्यामार्फत बालक व महिलांची आरोग्य तपासणी केली जात आहे. वेळीच उपचार मिळून आजारी बालके मृत्यूच्या दाढेत जाण्यापासून बचावत आहेत.