शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

शेती उपयोगी जनावरे घटली

By admin | Updated: August 11, 2015 01:58 IST

पशुसंवर्धन विभागाच्या मार्फतीने २०१२ साली १९ वी पशुगणना करण्यात आली. या पशुगणनेचा अहवाल नुकताच प्रसीद्ध झाला

दिगांबर जवादे ल्ल गडचिरोलीपशुसंवर्धन विभागाच्या मार्फतीने २०१२ साली १९ वी पशुगणना करण्यात आली. या पशुगणनेचा अहवाल नुकताच प्रसीद्ध झाला असून त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील बैल, रेडे या शेती उपयोगी जनावरांची व गावठी गाय तसेच म्हैस यांची संख्या घटली असून बकऱ्या व मेंढ्या यांची संख्या वाढली असल्याचे दर्शविण्यात आले आहे. देशामध्ये किती पाळीव जनावरे आहेत.त्यांची संख्या लक्षात यावी या उद्देशाने पशुसंवर्धन विभागाच्या मार्फतीने दर चार वर्षांनी पाळीव पशुंची गणना करण्यात येते. या पशुगणनेवरून देशातील जनावरांची संख्या वाढत आहे की, घटत आहे याचा अंदाज शासनाला बांधण्यास मदत होते. त्यानुसार आखावयाच्या योजना व पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित करण्यासाठी मदत होते. १८ वी पशुगणना २००८ साली करण्यात आली होती. तर चार वर्षांनंतर १९ वी पशुगणना करण्यात आली. १८ व्या पशुगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्यात गाय व बैल यांची संख्या सुमारे ५ लाख ८२ हजार ६६१ एवढी होती. २०१२ साली करण्यात आलेल्या पशुगणनेमध्ये गाय व बैल यांची संख्या ५ लाख ८ हजार ५२२ असल्याचे दर्शविण्यात आले आहे. म्हणजेच गाय व बैल यांची संख्या मागील चार वर्षांच्या कालावधीत सुमारे ७४ हजार १३९ ने घटली आहे. १८ व्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्यात सुमारे १ लाख ६ हजार ३०८ म्हशी व रेडे होते. १९ व्या जनगणनेमध्ये त्यांची संख्या ७६ हजार ३७२ एवढी असल्याचे दर्शविण्यात आले आहे. म्हणजेच म्हशींची संख्यासुध्दा २९ हजार ९३६ ने घटली आहे. २००८ च्या जनगणनेत शेळ्यांची संख्या २३ हजार ९५८ एवढी होती. २०१२ च्या जनगणनेमध्ये त्यांची संख्या २ लाख ५७० असल्याचे दर्शविण्यात आले आहे. यावरून शेळ्यांची संख्या १ लाख ७६ हजार ६१२ ने वाढली आहे. त्याचबरोबर मेंढ्यांची संख्या सुध्दा ५ हजार ९१३ ने वाढली आहे. पशु जनगणनेच्या अहवालाचा अभ्यास केल्यास शेती उपयोगी व गावठी जनावरांची संख्या घटत चालली आहे. मात्र तर दुसरीकडे संकरीत जनावरे वाढत चालली आहेत. मेंढ्या, बकरे, डुकर, कोंबड्या आदींचा उपयोग मांसाहारासाठी केला जातो. त्यांची संख्या वाढली आहे. यावरून पशुपालक ज्या पशुंना चांगली किंमत मिळते त्यांचेच पालन करीत असल्याचे दिसून येत आहे.कृषी यंत्रांनी कमी केले बैलांचे महत्त्व४दिवसेंदिवस शेतीमध्ये ट्रॅक्टरसह इतर कृषी यंत्रांचा वापर शेतकरी वाढवित चालला आहे. त्यामुळे बैलांची गरज राहिलेली नाही. एक महिन्याच्या शेतीसाठी ११ महिने बैलांची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे शेतकरी वर्ग ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकून शेतीची नांगरणी करण्यावर भर देत चालला आहे. त्याचबरोबर एक ते दोन एकर शेती असलेल्या शेतकऱ्याला ५० हजार रूपयांची बैलजोडी घेणे शक्य होत नाही. त्यामुळे तो भाड्याने ट्रॅक्टर करून शेतीची मशागत करण्यावर भर देत आहे.दुधाची बाजारपेठ नसल्याने म्हशी घटल्या४गडचिरोली जिल्ह्यात दुधाची बाजारपेठ नाही. त्याचबरोबर चराईचे क्षेत्र कमी झाल्याने म्हशी चारण्याचा प्रश्न पशुपालकांसमोर निर्माण झाला. त्यामुळे म्हशी पाळण्यास सहजासहजी शेतकरी वर्ग तयार होत नाही. शहराजवळच्या शेतकऱ्यांना दुधापासून थोडेफार उत्पन्न मिळते. मात्र दुर्गम भागातील पशुपालकांना उत्पन्न मिळत नाही. परिणामी म्हशींची संख्या मागील चार वर्षांत घटली आहे.