शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

शेती उपयोगी जनावरे घटली

By admin | Updated: August 11, 2015 01:58 IST

पशुसंवर्धन विभागाच्या मार्फतीने २०१२ साली १९ वी पशुगणना करण्यात आली. या पशुगणनेचा अहवाल नुकताच प्रसीद्ध झाला

दिगांबर जवादे ल्ल गडचिरोलीपशुसंवर्धन विभागाच्या मार्फतीने २०१२ साली १९ वी पशुगणना करण्यात आली. या पशुगणनेचा अहवाल नुकताच प्रसीद्ध झाला असून त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील बैल, रेडे या शेती उपयोगी जनावरांची व गावठी गाय तसेच म्हैस यांची संख्या घटली असून बकऱ्या व मेंढ्या यांची संख्या वाढली असल्याचे दर्शविण्यात आले आहे. देशामध्ये किती पाळीव जनावरे आहेत.त्यांची संख्या लक्षात यावी या उद्देशाने पशुसंवर्धन विभागाच्या मार्फतीने दर चार वर्षांनी पाळीव पशुंची गणना करण्यात येते. या पशुगणनेवरून देशातील जनावरांची संख्या वाढत आहे की, घटत आहे याचा अंदाज शासनाला बांधण्यास मदत होते. त्यानुसार आखावयाच्या योजना व पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित करण्यासाठी मदत होते. १८ वी पशुगणना २००८ साली करण्यात आली होती. तर चार वर्षांनंतर १९ वी पशुगणना करण्यात आली. १८ व्या पशुगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्यात गाय व बैल यांची संख्या सुमारे ५ लाख ८२ हजार ६६१ एवढी होती. २०१२ साली करण्यात आलेल्या पशुगणनेमध्ये गाय व बैल यांची संख्या ५ लाख ८ हजार ५२२ असल्याचे दर्शविण्यात आले आहे. म्हणजेच गाय व बैल यांची संख्या मागील चार वर्षांच्या कालावधीत सुमारे ७४ हजार १३९ ने घटली आहे. १८ व्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्यात सुमारे १ लाख ६ हजार ३०८ म्हशी व रेडे होते. १९ व्या जनगणनेमध्ये त्यांची संख्या ७६ हजार ३७२ एवढी असल्याचे दर्शविण्यात आले आहे. म्हणजेच म्हशींची संख्यासुध्दा २९ हजार ९३६ ने घटली आहे. २००८ च्या जनगणनेत शेळ्यांची संख्या २३ हजार ९५८ एवढी होती. २०१२ च्या जनगणनेमध्ये त्यांची संख्या २ लाख ५७० असल्याचे दर्शविण्यात आले आहे. यावरून शेळ्यांची संख्या १ लाख ७६ हजार ६१२ ने वाढली आहे. त्याचबरोबर मेंढ्यांची संख्या सुध्दा ५ हजार ९१३ ने वाढली आहे. पशु जनगणनेच्या अहवालाचा अभ्यास केल्यास शेती उपयोगी व गावठी जनावरांची संख्या घटत चालली आहे. मात्र तर दुसरीकडे संकरीत जनावरे वाढत चालली आहेत. मेंढ्या, बकरे, डुकर, कोंबड्या आदींचा उपयोग मांसाहारासाठी केला जातो. त्यांची संख्या वाढली आहे. यावरून पशुपालक ज्या पशुंना चांगली किंमत मिळते त्यांचेच पालन करीत असल्याचे दिसून येत आहे.कृषी यंत्रांनी कमी केले बैलांचे महत्त्व४दिवसेंदिवस शेतीमध्ये ट्रॅक्टरसह इतर कृषी यंत्रांचा वापर शेतकरी वाढवित चालला आहे. त्यामुळे बैलांची गरज राहिलेली नाही. एक महिन्याच्या शेतीसाठी ११ महिने बैलांची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे शेतकरी वर्ग ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकून शेतीची नांगरणी करण्यावर भर देत चालला आहे. त्याचबरोबर एक ते दोन एकर शेती असलेल्या शेतकऱ्याला ५० हजार रूपयांची बैलजोडी घेणे शक्य होत नाही. त्यामुळे तो भाड्याने ट्रॅक्टर करून शेतीची मशागत करण्यावर भर देत आहे.दुधाची बाजारपेठ नसल्याने म्हशी घटल्या४गडचिरोली जिल्ह्यात दुधाची बाजारपेठ नाही. त्याचबरोबर चराईचे क्षेत्र कमी झाल्याने म्हशी चारण्याचा प्रश्न पशुपालकांसमोर निर्माण झाला. त्यामुळे म्हशी पाळण्यास सहजासहजी शेतकरी वर्ग तयार होत नाही. शहराजवळच्या शेतकऱ्यांना दुधापासून थोडेफार उत्पन्न मिळते. मात्र दुर्गम भागातील पशुपालकांना उत्पन्न मिळत नाही. परिणामी म्हशींची संख्या मागील चार वर्षांत घटली आहे.