शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

आरमोरी तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:41 IST

आरमोरी : या वर्षीच्या खरीप हंगामात पावसाचे प्रमाण अल्प असून बऱ्याच शेतकऱ्यांची रोवणीची कामे खोळंबली आहेत. आरमोरी तालुक्यातील शेतकरी ...

आरमोरी : या वर्षीच्या खरीप हंगामात पावसाचे प्रमाण अल्प असून बऱ्याच शेतकऱ्यांची रोवणीची कामे खोळंबली आहेत. आरमोरी तालुक्यातील शेतकरी हा अस्मानी-सुलतानी संकटात सापडला आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून आरमोरी तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शिवसेना व युवासेना शाखा आरमोरीच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनातून केली आहे.

या वर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा प्रफुल्लित झाल्या होत्या. परंतु सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी झाल्याने तलाव, बोड्या रिकाम्या आहेत. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या धान रोवणीची कामे खोळंबली असून हलक्या धानाचे पऱ्हे हे निसवण्याच्या मार्गावर आहेत. ज्या शेतकऱ्यांनी तलाव, बोळ्यांमध्ये थोडेफार पाणी साचलेले होते त्या पाण्याने कशीबशी धानाची रोवणी केली परंतु गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने रोवणी झालेले धानपीक करपण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे शासनाने तालुक्यातील शेतजमिनींचे पंचनामे करून लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आरमोरी तालुका शिवसेना व युवासेनेच्या वतीने करण्यात आली.

तहसीलदारांना निवेदन देताना युवासेनेचे माजी जिल्हाप्रमुख चंदू बेहरे, नगर परिषदेचे बांधकाम सभापती सागर मने, भूषण सातव, लहानू पिलारे, रामदास डोंगरवार, पुंजीराम मेश्राम, माजी जि. प. सदस्य वेणू ढवगाये, नगरसेवक माणिक भोयर, कवळू सहारे, मेघा मने, शैलेश ढोरे, विजय मुरवतकार, शैलेश चिटमटलवार, अनिल पारधी, उल्हास बनपूरकर, वसंत गेडाम, ज्ञानेश्वर ढवगाये, राजू ढोरे, किशोर मेश्राम, सतीश गुरनुले, टिकाराम खेवले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

270821\img-20210827-wa0039.jpg

आरमोरीचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करताना सेना व युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते