शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आरमोरी तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:41 IST

आरमोरी : या वर्षीच्या खरीप हंगामात पावसाचे प्रमाण अल्प असून बऱ्याच शेतकऱ्यांची रोवणीची कामे खोळंबली आहेत. आरमोरी तालुक्यातील शेतकरी ...

आरमोरी : या वर्षीच्या खरीप हंगामात पावसाचे प्रमाण अल्प असून बऱ्याच शेतकऱ्यांची रोवणीची कामे खोळंबली आहेत. आरमोरी तालुक्यातील शेतकरी हा अस्मानी-सुलतानी संकटात सापडला आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून आरमोरी तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शिवसेना व युवासेना शाखा आरमोरीच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनातून केली आहे.

या वर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा प्रफुल्लित झाल्या होत्या. परंतु सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी झाल्याने तलाव, बोड्या रिकाम्या आहेत. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या धान रोवणीची कामे खोळंबली असून हलक्या धानाचे पऱ्हे हे निसवण्याच्या मार्गावर आहेत. ज्या शेतकऱ्यांनी तलाव, बोळ्यांमध्ये थोडेफार पाणी साचलेले होते त्या पाण्याने कशीबशी धानाची रोवणी केली परंतु गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने रोवणी झालेले धानपीक करपण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे शासनाने तालुक्यातील शेतजमिनींचे पंचनामे करून लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आरमोरी तालुका शिवसेना व युवासेनेच्या वतीने करण्यात आली.

तहसीलदारांना निवेदन देताना युवासेनेचे माजी जिल्हाप्रमुख चंदू बेहरे, नगर परिषदेचे बांधकाम सभापती सागर मने, भूषण सातव, लहानू पिलारे, रामदास डोंगरवार, पुंजीराम मेश्राम, माजी जि. प. सदस्य वेणू ढवगाये, नगरसेवक माणिक भोयर, कवळू सहारे, मेघा मने, शैलेश ढोरे, विजय मुरवतकार, शैलेश चिटमटलवार, अनिल पारधी, उल्हास बनपूरकर, वसंत गेडाम, ज्ञानेश्वर ढवगाये, राजू ढोरे, किशोर मेश्राम, सतीश गुरनुले, टिकाराम खेवले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

270821\img-20210827-wa0039.jpg

आरमोरीचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करताना सेना व युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते