शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा

By admin | Updated: September 12, 2015 01:22 IST

जिल्ह्यात यावर्षी सरासरी ५० टक्क्याहून कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे धानपीक धोक्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांना निवेदन : भारिप-बहुजन महासंघातर्फे आंदोलनगडचिरोली : जिल्ह्यात यावर्षी सरासरी ५० टक्क्याहून कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे धानपीक धोक्यात आले आहे. हजारो हेक्टर जमीन रोवणीअभावी पडून आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, यासाह इतर मागण्यांसाठी भारिप-बहुजन महासंघ जिल्हा गडचिरोलीच्या वतीने शुक्रवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अद्याप मिळाली नाही, ती त्वरित वाटप करावी, चालू शैक्षणिक सत्रातील शिष्यवृत्ती द्यावी, ओबीसीचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, दलित आदिवासींवर होणाऱ्या अत्याचारास पायबंद घालण्यासाठी अडक उपाययोजना कराव्या, सूरजागड येथील खनिजावर आधारित उद्योग गडचिरोली जिल्ह्यातच सुरू करावा, इतर जिल्ह्यात लोहखनिज नेण्यास परवानगी देऊ नये, वनजमिनीचे पट्टे मंजूर करावे, आष्टी एमआयडीसीमधील शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे मोबदला द्यावा, प्रत्येक शेतकरी कुटुंबातील एकास शासकीय नोकरी द्यावी आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष रोहिदास राऊत, कुलपती मेश्राम, नसीर जुम्मन शेख, पुणेश्वर दुधे, जगन जांभुळकर, वनमाला भजगवळी, भीमराव ढवळे, पत्रू टेंभुर्णे, सी. जे. मेश्राम, डॉ. हरिदास नंदेश्वर, जितेंद्र गलबले, जगन बन्सोड, गोवर्धन काळे, किलाबाई वनकर, कांता ढवळे, शंकर मारशेट्टीवार आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)