शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा

By admin | Updated: September 12, 2015 01:22 IST

जिल्ह्यात यावर्षी सरासरी ५० टक्क्याहून कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे धानपीक धोक्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांना निवेदन : भारिप-बहुजन महासंघातर्फे आंदोलनगडचिरोली : जिल्ह्यात यावर्षी सरासरी ५० टक्क्याहून कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे धानपीक धोक्यात आले आहे. हजारो हेक्टर जमीन रोवणीअभावी पडून आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, यासाह इतर मागण्यांसाठी भारिप-बहुजन महासंघ जिल्हा गडचिरोलीच्या वतीने शुक्रवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अद्याप मिळाली नाही, ती त्वरित वाटप करावी, चालू शैक्षणिक सत्रातील शिष्यवृत्ती द्यावी, ओबीसीचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, दलित आदिवासींवर होणाऱ्या अत्याचारास पायबंद घालण्यासाठी अडक उपाययोजना कराव्या, सूरजागड येथील खनिजावर आधारित उद्योग गडचिरोली जिल्ह्यातच सुरू करावा, इतर जिल्ह्यात लोहखनिज नेण्यास परवानगी देऊ नये, वनजमिनीचे पट्टे मंजूर करावे, आष्टी एमआयडीसीमधील शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे मोबदला द्यावा, प्रत्येक शेतकरी कुटुंबातील एकास शासकीय नोकरी द्यावी आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष रोहिदास राऊत, कुलपती मेश्राम, नसीर जुम्मन शेख, पुणेश्वर दुधे, जगन जांभुळकर, वनमाला भजगवळी, भीमराव ढवळे, पत्रू टेंभुर्णे, सी. जे. मेश्राम, डॉ. हरिदास नंदेश्वर, जितेंद्र गलबले, जगन बन्सोड, गोवर्धन काळे, किलाबाई वनकर, कांता ढवळे, शंकर मारशेट्टीवार आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)