शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 01:29 IST

जिल्ह्यात २०१७-१८ च्या खरीप हंगामात धानपिकावर मावा, तुडतुडा या रोगाचा प्रादुर्भाव झाला. दरवर्षीच्या तुलनेत यंदा प्रत्येक शेतकऱ्याला केवळ २० ते २५ टक्केच उत्पादन झाले. प्रतिहेक्टरी जवळपास ५० हजारांचे नुकसान झाले.

ठळक मुद्दे जिल्हा काँग्रेस कमिटीची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात २०१७-१८ च्या खरीप हंगामात धानपिकावर मावा, तुडतुडा या रोगाचा प्रादुर्भाव झाला. दरवर्षीच्या तुलनेत यंदा प्रत्येक शेतकऱ्याला केवळ २० ते २५ टक्केच उत्पादन झाले. प्रतिहेक्टरी जवळपास ५० हजारांचे नुकसान झाले. उत्पादन खर्च भरून निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना सरसकट २५ हजार रूपयांची हेक्टरी मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली.२०१७-१८ यावर्षीच्या खरीप हंगामात सुरुवातीपासूनच अनियमित पाऊस झाला. अनेक शेतकऱ्यांची धान रोवणी उशिरा झाली. त्यामुळे धानपिकाला फटका बसला. धानपीक जोमात येत असताना तसेच गर्भावस्थेत असताना मावा, तुडतुडा, खोडकिडा यासह विविध रोगांचा प्रादुर्भाव धानपिकावर झाला. अनेक शेतकºयांनी तीन ते चार वेळा फवारणी करूनही उपयोग झाला नाही. यात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला. त्यानंतर दिवाळी सणात परतीचा पाऊस आला. यादरम्यान हलके धानपीक कापणीला आले होते. परंतु पावसामुळे धानपीक सडले. जडप्रतीचे धानपीक विविध रोगांनी नष्ट झाले. अनेक गावांमध्ये पंचनामे करण्यात आले. परंतु शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही. शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित आहेत. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून प्रती हेक्टरी २५ हजार रूपयांची आर्थिक मदत द्यावी, तसेच शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने यांनी स्वीकारले.याप्रसंगी अनूसुचित जाती विभागाचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, मिलींद बोगसर, शहर अध्यक्ष सतीश विधाते, पी.टी. मसराम, रामदास टिपले, लहुकुमार रामटेके, नंदू वाईलकर, प्रभाकर वासेकर, पांडुरंग घोटेकर, लता ढोक, पंकज बारसिंगे, कमलेश खोब्रागडे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.आणेवारी चुकीची दाखविल्याचा आरोपखरीप हंगामात दरवर्षीच्या एकूण उत्पादनाच्या तुलनेत २० ते २५ टक्के उत्पादन झाले. परंतु सरकारी सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील केवळ १६६ गावांची आणेवारी ५० टक्केपेक्षा कमी दाखविण्यात आली. ही आणेवारी चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण करून दाखविण्यात आली. तसेच शासनाची दिशाभूल करणारा अहवाल महसूल व कृषी विभागामार्फत शासनाला सादर करण्यात आला. त्यामुळे बहुतांश शेतकरी शासकीय मदतीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकºयांमध्ये रोष व्यक्त होत आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.