शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मार्कंडादेव यात्रेबाबत १४ फेब्रुवारीला हाेणार निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 05:00 IST

मार्कंडादेव येथे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरते. या जत्रेला लाखाे भाविक येतात. मागील वर्षी काेराेनाच्या संकटामुळे जत्रा रद्द करण्यात आली हाेती. यावर्षीही काेराेनाची तिसरी लाट सुरू आहे. मात्र या लाटेचा फारसा प्रभाव दिसून येत नाही. काेराेना रुग्ण आढळून येत असले तरी ते घरीच उपचार करून बरे हाेत आहेत. त्यामुळे काेराेनाविषयीची भीती नागरिकांच्या मनातून निघून गेली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कचामाेर्शी : यावर्षी महाशिवरात्रीनिमित्त मार्कंडादेव येथे जत्रेचे आयाेजन करायचे की नाही, याबाबत विचारविनिमय करण्यासाठी मार्कंडादेव येथे जिल्हाधिकारी संजय मीना यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची सभा आयाेजित करण्यात आली आहे. या सभेत जत्रा आयाेजित करायची की नाही, याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. मार्कंडादेव येथे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरते. या जत्रेला लाखाे भाविक येतात. मागील वर्षी काेराेनाच्या संकटामुळे जत्रा रद्द करण्यात आली हाेती. यावर्षीही काेराेनाची तिसरी लाट सुरू आहे. मात्र या लाटेचा फारसा प्रभाव दिसून येत नाही. काेराेना रुग्ण आढळून येत असले तरी ते घरीच उपचार करून बरे हाेत आहेत. त्यामुळे काेराेनाविषयीची भीती नागरिकांच्या मनातून निघून गेली आहे. शाळा, महाविद्यालये, आठवडी बाजार, लग्न समारंभ व इतर कार्यक्रम धुमधडाक्यात साजरे केले जात आहेत. शासनामार्फतही हळूहळू नियम शिथिल केले जात आहे. या परिस्थितीचा विचार बैठकीत केला जाणार आहे. १ मार्च राेजी महाशिवरात्री आहे. आठ दिवसांच्या जत्रेत काेट्यवधी रुपयांची उलाढाल हाेते. हजाराे नागरिकांना यातून राेजगार मिळते. त्यामुळे जत्रेचे आयाेजन करण्यास काहीच हरकत नाही, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. 

 मंडईंमध्ये उसळत आहे गर्दी -   गडचिराेली जिल्ह्याच्या उत्तर भागातील तालुक्यांमध्ये जानेवारी महिन्यापासून मंडईचे आयाेजन केले जाते. यावर्षीही मंडई भरविली जात आहे. माेठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी उसळत आहे. मात्र मंडईमुळे काेराेना वाढला, असे चित्र सध्यातरी दिसत नाही. मार्कंडा जत्रा ही सर्वांत माेठी जत्रा आहे. या ठिकाणी काेराेनाचे थाेडेफार नियम पाळून जत्रेचे आयाेजन करण्याची मागणी नागरिकांकडून हाेत आहे. 

मार्कंडा जत्रेबाबत याेग्य ताे निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १४ फेब्रुवारी राेजी साेमवारी मार्कंडादेव येथे सभेचे आयाेजन केले आहे. या सभेला सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना बाेलाविण्यात आले आहे. सर्व अधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून जिल्हाधिकारी याेग्य ताे निर्णय घेतील. - संजय नागतिळक, तहसीलदार, चामाेर्शी

 

टॅग्स :tourismपर्यटन