शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

गुड्डीगुडम परिसर अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:15 IST

अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम परिसरात मागील अनेक दिवसांपासून वीज समस्या आहे. परंतु मागील चार दिवसांपासून परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देचार दिवस उलटले : महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम परिसरात मागील अनेक दिवसांपासून वीज समस्या आहे. परंतु मागील चार दिवसांपासून परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.अहेरी तालुक्याच्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात नेहमीच वीज पुरवठा खंडित होत असतो. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या भागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. मागील चार दिवसांपासून परिसरातील तितरम, निमलगुडम, गोलाकर्जी, रायगट्टा येथील वीज पुरवठा खंडित आहे. त्यामुळे महावितरण कंपनीच्या कारभाराविषयी नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. गुड्डीगुडम भागाला जिमलगट्टा विद्युत उपकेंदातून वीज पुरवठा केला जातो. सदर अंतर लांब पडत असल्याने अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असतो. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या परिसरात नियमित वीज पुरवठा करणे आवश्यक आहे. परंतु अनियमित वीज पुरवठा करून दर महिन्याला देयके पाठविण्याचे काम महावितरण कंपनीतर्फे केले जाते, असा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, कंपनीचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उदासीन आहेत, असे संतोष गणपूरवार, रमेश बावनकर, श्रीनिवास पट्टावार, नारायण कोतकोंडावार यांनी म्हटले आहे.स्थायी लाईनमनची नियुक्ती करण्याची मागणीगुड्डीगुडम परिसरात महिन्यातून जवळपास आठ ते दहा दिवसच विद्युत पुरवठा सुरळीत केला जातो. उर्वरित दिवशी केवळ विजेचा लपंडाव असतो. विशेष म्हणजे, या दुर्गम भागात लाईनमन मुख्यालयी राहत नाही. एका लाईनमनकडे अनेक गावांचा प्रभार असतो. गुड्डीगुडम परिसरात स्थायी लाईनमन नसल्याने या भागातील वीज पुरठ्यात बिघाड आल्यास वेळीच दुरूस्ती केली जात नाही. रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर दुसºया दिवशीपर्यत तो पूर्ववत होत नाही. पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना डासांच्या प्रकोपाला बळी पडावे लागत आहे. यातून विविध आजार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे स्थायी लाईनमन नियुक्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :electricityवीज