शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

गुड्डीगुडम परिसर अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:15 IST

अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम परिसरात मागील अनेक दिवसांपासून वीज समस्या आहे. परंतु मागील चार दिवसांपासून परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देचार दिवस उलटले : महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम परिसरात मागील अनेक दिवसांपासून वीज समस्या आहे. परंतु मागील चार दिवसांपासून परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.अहेरी तालुक्याच्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात नेहमीच वीज पुरवठा खंडित होत असतो. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या भागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. मागील चार दिवसांपासून परिसरातील तितरम, निमलगुडम, गोलाकर्जी, रायगट्टा येथील वीज पुरवठा खंडित आहे. त्यामुळे महावितरण कंपनीच्या कारभाराविषयी नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. गुड्डीगुडम भागाला जिमलगट्टा विद्युत उपकेंदातून वीज पुरवठा केला जातो. सदर अंतर लांब पडत असल्याने अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असतो. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या परिसरात नियमित वीज पुरवठा करणे आवश्यक आहे. परंतु अनियमित वीज पुरवठा करून दर महिन्याला देयके पाठविण्याचे काम महावितरण कंपनीतर्फे केले जाते, असा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, कंपनीचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उदासीन आहेत, असे संतोष गणपूरवार, रमेश बावनकर, श्रीनिवास पट्टावार, नारायण कोतकोंडावार यांनी म्हटले आहे.स्थायी लाईनमनची नियुक्ती करण्याची मागणीगुड्डीगुडम परिसरात महिन्यातून जवळपास आठ ते दहा दिवसच विद्युत पुरवठा सुरळीत केला जातो. उर्वरित दिवशी केवळ विजेचा लपंडाव असतो. विशेष म्हणजे, या दुर्गम भागात लाईनमन मुख्यालयी राहत नाही. एका लाईनमनकडे अनेक गावांचा प्रभार असतो. गुड्डीगुडम परिसरात स्थायी लाईनमन नसल्याने या भागातील वीज पुरठ्यात बिघाड आल्यास वेळीच दुरूस्ती केली जात नाही. रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर दुसºया दिवशीपर्यत तो पूर्ववत होत नाही. पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना डासांच्या प्रकोपाला बळी पडावे लागत आहे. यातून विविध आजार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे स्थायी लाईनमन नियुक्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :electricityवीज