शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

गुड्डीगुडम परिसर अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:15 IST

अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम परिसरात मागील अनेक दिवसांपासून वीज समस्या आहे. परंतु मागील चार दिवसांपासून परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देचार दिवस उलटले : महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम परिसरात मागील अनेक दिवसांपासून वीज समस्या आहे. परंतु मागील चार दिवसांपासून परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.अहेरी तालुक्याच्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात नेहमीच वीज पुरवठा खंडित होत असतो. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या भागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. मागील चार दिवसांपासून परिसरातील तितरम, निमलगुडम, गोलाकर्जी, रायगट्टा येथील वीज पुरवठा खंडित आहे. त्यामुळे महावितरण कंपनीच्या कारभाराविषयी नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. गुड्डीगुडम भागाला जिमलगट्टा विद्युत उपकेंदातून वीज पुरवठा केला जातो. सदर अंतर लांब पडत असल्याने अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असतो. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या परिसरात नियमित वीज पुरवठा करणे आवश्यक आहे. परंतु अनियमित वीज पुरवठा करून दर महिन्याला देयके पाठविण्याचे काम महावितरण कंपनीतर्फे केले जाते, असा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, कंपनीचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उदासीन आहेत, असे संतोष गणपूरवार, रमेश बावनकर, श्रीनिवास पट्टावार, नारायण कोतकोंडावार यांनी म्हटले आहे.स्थायी लाईनमनची नियुक्ती करण्याची मागणीगुड्डीगुडम परिसरात महिन्यातून जवळपास आठ ते दहा दिवसच विद्युत पुरवठा सुरळीत केला जातो. उर्वरित दिवशी केवळ विजेचा लपंडाव असतो. विशेष म्हणजे, या दुर्गम भागात लाईनमन मुख्यालयी राहत नाही. एका लाईनमनकडे अनेक गावांचा प्रभार असतो. गुड्डीगुडम परिसरात स्थायी लाईनमन नसल्याने या भागातील वीज पुरठ्यात बिघाड आल्यास वेळीच दुरूस्ती केली जात नाही. रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर दुसºया दिवशीपर्यत तो पूर्ववत होत नाही. पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना डासांच्या प्रकोपाला बळी पडावे लागत आहे. यातून विविध आजार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे स्थायी लाईनमन नियुक्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :electricityवीज