शहरं
Join us  
Trending Stories
1
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
2
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
3
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
4
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
5
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
6
अखेर 'ते' ब्रिटिश लढाऊ विमान दुरुस्त झाले; केरळहून ब्रिटनच्या दिशेने रवाना
7
आईच्या अपमानाचा बदला! दहा वर्षे घेतला आरोपीचा शोध, समोर येताच केले ठार; सोशल मीडिया पोस्टमुळे सापडले
8
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
9
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
10
IND vs ENG : इंग्लंडनं खेळली टीम इंडियासारखी 'चाल'; कसोटी क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
11
"मी लघवी स्वत:च प्यायलो, त्यांना दिली नाही म्हणून...", ट्रोल करणाऱ्यांना परेश रावल यांची सणसणीत चपराक
12
'सैय्यारा'से आशिकी हो गयी है मुझे! 'आशिकी गर्ल' श्रद्धा कपूरने सिनेमा पाहून दिली प्रतिक्रिया
13
हुंडा मागतो, दारू पिऊन नवरा मारतो...; हरियाणाच्या डान्सर सपनाचा सासरच्यांवर गंभीर आरोप
14
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
15
जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?
16
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...
17
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागचं कोडं उलगडेना; विरोधी पक्ष हैराण पण भाजपाही संभ्रमात?
18
८वा वेतन आयोग लांबणीवर? कोट्यवधी आजी-माजी कर्मचारी अद्यापही प्रतीक्षेतच
19
Jagdeep Dhankhar: धनखड यांच्यापूर्वी 'या' व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा?
20
"माझ्या डोळ्यासमोरच मित्राचा जळून मृत्यू..."; विद्यार्थ्याने सांगितली काळजात चर्र करणारी घटना

पुलाअभावी सुरू आहे धोकादायक प्रवास

By admin | Updated: May 30, 2015 01:59 IST

एटापल्ली-मुलचेरा मार्गावरील देवदा ते रेगडीदरम्यान असलेल्या दिना नदीवर जिल्हा निर्मितीच्या ३३ वर्षांनंतरही पुलाची निर्मिती करण्यात न आल्याने ...

एटापल्ली : एटापल्ली-मुलचेरा मार्गावरील देवदा ते रेगडीदरम्यान असलेल्या दिना नदीवर जिल्हा निर्मितीच्या ३३ वर्षांनंतरही पुलाची निर्मिती करण्यात न आल्याने या भागातील शेकडो नागरिक याच नदीतून धोकादायक प्रवास करीत असल्याचे विदारक वास्तव पुढे आले आहे. एटापल्लीवासीयांना विविध कामासाठी आलापल्ली मार्गे गडचिरोली येथे जिल्हा मुख्यालयी जावे लागते. हे अंतर १४० किमी आहे. मात्र एटापल्ली मुक्कामी राहणारी एटापल्ली-चिमूर ही महामंडळाची बस अहेरीवरून महागाव मार्गे ये-जा करते. परिणामी या अंतरात पुन्हा १० किमीची भर पडते. त्यामुळे एटापल्ली ते गडचिरोली हे अंतर १५० किमी पडते. दीडशे किमीचा प्रवास करण्यासाठी एटापल्ली तालुक्याच्या दुर्गम भागातील आदिवासी नागरिकांना मोठे प्रवासभाडे मोजावे लागते. तसेच गडचिरोली गाठण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे शेकडो नागरिक पैसा व वेळेच्या बचतीकरिता देवदा ते रेगडीदरम्यान असलेल्या दिना नदीतून प्रवास करतात. एटापल्ली-चंदनवेली-गेदा मार्गावरून मुलचेरा तालुक्यातील देवदा गावावरून चामोर्शी तालुक्यातील रेगडीकडे जाण्यासाठी दिना नदीचाच मार्ग परवडण्यासारखा असून कमी अंतराचा आहे. मात्र शासन व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे एटापल्ली व मुलचेरा तालुक्यातील नागरिकांना अद्यापही जीव घेणा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन दिना नदीवर पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी एटापल्ली भागातील नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)पावसाळ्यात मार्ग होतो बंदजिल्ह्यात पर्जन्यवृष्टीचे प्रमाण अधिक राहून पूर परिस्थिती निर्माण होते. दिना नदीलाही पावसाळ्यात तीन ते चारदा पूर येतो. मार्ग बंद होत असल्याने देवदा ते रेगडी या गावांचा संपर्क तुटतो. पुरामुळे नागरिकांचा सदर शार्टकट मार्ग बंद होतो.दिना नदीचा उगम एटापल्ली तालुक्यातूनदिना नदीचा उगम एटापल्ली तालुक्यातील कोटमी परिसरातील जंगल पहाडीतून झाला आहे. दिना नदी मुलचेरा, अहेरी तालुक्यातील अनेक गावांना जाऊन चौडमपल्ली येथील प्राणहिता नदीला मिळते. दिना नदीचा आधार घेऊन रेगडी जलाशयाची निर्मिती करण्यात आली. हे विशेष. कमी अंतराकरिता रेगडी धरणावरून धोकादायक प्रवास होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पुलाच्या निर्मितीमुळे ५० किमीने अंतर कमी देवदा-रेगडी दरम्यानच्या दिना नदीवर पुलाचे बांधकाम केल्यास एटापल्ली तालुका गडचिरोली जिल्हा मुख्यालयातील ५० किमीचे अंतर कमी होणार आहे. पुलाची निर्मिती झाल्यास एटापल्ली व मुलचेरा भागातील नागरिकांची वेळ व पैशाची बचत होणार आहे.