शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
2
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
3
"माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी
4
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
5
सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी
6
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
7
चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय?
8
Nirjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कुंभदान केल्याने धनराशीचा भरलेला राहतो घडा!
9
वासनेनं आंधळा झाला जीजू, मेहुणीवर टाकली वाईट नजर, नकार मिळताच केलं मोठं कांड!
10
संतोष देशमुख प्रकरणी आरोपींवरील मोक्का काढू देणार नाही, जरांगे-पाटलांचा निर्धार; मुख्यमंत्र्यांवर आरोप
11
Corona Virus : धक्कादायक! ३ वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, चिमुकल्यांसाठी किती घातक आहे नवा व्हेरिएंट?
12
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
13
सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा भीषण अपघात! वडिलांचा जागीच मृत्यू, तर अभिनेता गंभीर जखमी
14
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
15
रेपो दरात कपात, ५० आणि २० लाखांच्या लोनवर किती कमी होणार EMI? जाणून घ्या
16
परिस्थिती गंभीर! कोरोनापेक्षाही जीवघेणा 'हा' आजार; हृदयावरच आघात, दरवर्षी १८ मिलियन मृत्यू
17
९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...  
18
'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात
19
खळबळजनक! WhatsApp वर देवाचा फोटो DP; हनीट्रॅप, हेरगिरीसाठी पाकिस्तानचं 'देसी' प्लॅनिंग
20
"लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण...", लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली...

पुलाअभावी सुरू आहे धोकादायक प्रवास

By admin | Updated: May 30, 2015 01:59 IST

एटापल्ली-मुलचेरा मार्गावरील देवदा ते रेगडीदरम्यान असलेल्या दिना नदीवर जिल्हा निर्मितीच्या ३३ वर्षांनंतरही पुलाची निर्मिती करण्यात न आल्याने ...

एटापल्ली : एटापल्ली-मुलचेरा मार्गावरील देवदा ते रेगडीदरम्यान असलेल्या दिना नदीवर जिल्हा निर्मितीच्या ३३ वर्षांनंतरही पुलाची निर्मिती करण्यात न आल्याने या भागातील शेकडो नागरिक याच नदीतून धोकादायक प्रवास करीत असल्याचे विदारक वास्तव पुढे आले आहे. एटापल्लीवासीयांना विविध कामासाठी आलापल्ली मार्गे गडचिरोली येथे जिल्हा मुख्यालयी जावे लागते. हे अंतर १४० किमी आहे. मात्र एटापल्ली मुक्कामी राहणारी एटापल्ली-चिमूर ही महामंडळाची बस अहेरीवरून महागाव मार्गे ये-जा करते. परिणामी या अंतरात पुन्हा १० किमीची भर पडते. त्यामुळे एटापल्ली ते गडचिरोली हे अंतर १५० किमी पडते. दीडशे किमीचा प्रवास करण्यासाठी एटापल्ली तालुक्याच्या दुर्गम भागातील आदिवासी नागरिकांना मोठे प्रवासभाडे मोजावे लागते. तसेच गडचिरोली गाठण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे शेकडो नागरिक पैसा व वेळेच्या बचतीकरिता देवदा ते रेगडीदरम्यान असलेल्या दिना नदीतून प्रवास करतात. एटापल्ली-चंदनवेली-गेदा मार्गावरून मुलचेरा तालुक्यातील देवदा गावावरून चामोर्शी तालुक्यातील रेगडीकडे जाण्यासाठी दिना नदीचाच मार्ग परवडण्यासारखा असून कमी अंतराचा आहे. मात्र शासन व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे एटापल्ली व मुलचेरा तालुक्यातील नागरिकांना अद्यापही जीव घेणा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन दिना नदीवर पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी एटापल्ली भागातील नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)पावसाळ्यात मार्ग होतो बंदजिल्ह्यात पर्जन्यवृष्टीचे प्रमाण अधिक राहून पूर परिस्थिती निर्माण होते. दिना नदीलाही पावसाळ्यात तीन ते चारदा पूर येतो. मार्ग बंद होत असल्याने देवदा ते रेगडी या गावांचा संपर्क तुटतो. पुरामुळे नागरिकांचा सदर शार्टकट मार्ग बंद होतो.दिना नदीचा उगम एटापल्ली तालुक्यातूनदिना नदीचा उगम एटापल्ली तालुक्यातील कोटमी परिसरातील जंगल पहाडीतून झाला आहे. दिना नदी मुलचेरा, अहेरी तालुक्यातील अनेक गावांना जाऊन चौडमपल्ली येथील प्राणहिता नदीला मिळते. दिना नदीचा आधार घेऊन रेगडी जलाशयाची निर्मिती करण्यात आली. हे विशेष. कमी अंतराकरिता रेगडी धरणावरून धोकादायक प्रवास होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पुलाच्या निर्मितीमुळे ५० किमीने अंतर कमी देवदा-रेगडी दरम्यानच्या दिना नदीवर पुलाचे बांधकाम केल्यास एटापल्ली तालुका गडचिरोली जिल्हा मुख्यालयातील ५० किमीचे अंतर कमी होणार आहे. पुलाची निर्मिती झाल्यास एटापल्ली व मुलचेरा भागातील नागरिकांची वेळ व पैशाची बचत होणार आहे.