शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

खड्ड्यामुळे संरक्षक भिंतीला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 05:00 IST

सार्वजनिक बांधकाम विभाग कुरखेडा अंतर्गत कढोलीजवळून वाहणाऱ्या सती नदीवरील पुलाच्या लगतचा भाग पावसाळ्यात वाहून गेला. त्याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली. पूल आणि संरक्षक भिंत यांच्यामधील पोकळी बुजविण्यासाठी नदीकाठावरची माती खोदून ती त्या पोकळीमध्ये टाकण्यात आली. खालची माती गेल्याने आता संरक्षक भिंतीलाच धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्दे दरड खोदून टाकली माती : पुलाजवळील संरक्षक भिंत कोसळण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : पूल व संरक्षक भिंत यांच्यामध्ये पडलेली पोकळी बुजविण्यासाठी कंत्राटदाराने काठाच्या बाजूची नाली खोदून खड्डा तयार केला आहे. त्यामुळे संरक्षक भिंतीलाच धोका निर्माण झाला आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग कुरखेडा अंतर्गत कढोलीजवळून वाहणाऱ्या सती नदीवरील पुलाच्या लगतचा भाग पावसाळ्यात वाहून गेला. त्याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली. पूल आणि संरक्षक भिंत यांच्यामधील पोकळी बुजविण्यासाठी नदीकाठावरची माती खोदून ती त्या पोकळीमध्ये टाकण्यात आली. खालची माती गेल्याने आता संरक्षक भिंतीलाच धोका निर्माण झाला आहे. ज्या मातीवर संरक्षक भिंत उभी आहे, त्या ठिकाणी खड्डा पाडल्याने पुढे नदीच्या पाण्यामुळे उर्वरित मातीही वाहून जाणार आहे. त्यामुळे सदर संरक्षक भिंत कोसळण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे कंत्राटदाराने संरक्षक भिंतीच्या खालची माती उपसण्याची काहीच गरज नव्हती. पोकळीच्या ठिकाणी मुरूम टाकणे आवश्यक होते. मात्र थातुरमातूर काम उरकण्यासाठी त्याच ठिकाणची माती टाकली आहे. माती खोदल्यामुळे संरक्षक भिंतीला धोका पोहोचणार आहे. ही बाब सामान्य नागरिकाच्या लक्षात येते, तर अभियंत्यांना कसे समजत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.पुलाजवळची माती खोदल्याने भविष्यात पुलालाही धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.शिवकालीन बंधाऱ्याने केले पात्राचे नुकसानकढोली पुलाच्या खालच्या भागातच शिवकालीन बंधारा चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आला. या बंधाऱ्याचा काहीच फायदा झाला नाही. मात्र पुलाच्या दोन्ही बाजूला जवळपास २५ एकर नदीकाठाचा भूभाग वाहून गेला आहे. त्यामुळे नदीचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारी यंत्रणा अशा पद्धतीने चुकीचे काम करीत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. बहुतांश ठिकाणचा नदीकाठ नदीबरोबर झाला आहे.नदी हा अतिशय संवेदनशील विषय आहे. नदीतील रेतीचा जास्त प्रमाणात उपसा झाल्यास पर्यावरणाला धोका होऊ शकते. त्यामुळे नदीपात्राची पाहणी केल्याशिवाय घाट मंजूर केला जात नाही. कोणत्याही पुलाजवळ रेतीघाट मंजूर होत नाही. सरकारी यंत्रणा मात्र कोणताही विचार न करता कामे करून घेत आहे. नदीघाटावरील माती उपसणे हा अतिशय गंभीर प्रकार असून संबंधित कंत्राटदारावर किंवा अभियंत्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग