शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

खड्ड्यामुळे संरक्षक भिंतीला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 05:00 IST

सार्वजनिक बांधकाम विभाग कुरखेडा अंतर्गत कढोलीजवळून वाहणाऱ्या सती नदीवरील पुलाच्या लगतचा भाग पावसाळ्यात वाहून गेला. त्याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली. पूल आणि संरक्षक भिंत यांच्यामधील पोकळी बुजविण्यासाठी नदीकाठावरची माती खोदून ती त्या पोकळीमध्ये टाकण्यात आली. खालची माती गेल्याने आता संरक्षक भिंतीलाच धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्दे दरड खोदून टाकली माती : पुलाजवळील संरक्षक भिंत कोसळण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : पूल व संरक्षक भिंत यांच्यामध्ये पडलेली पोकळी बुजविण्यासाठी कंत्राटदाराने काठाच्या बाजूची नाली खोदून खड्डा तयार केला आहे. त्यामुळे संरक्षक भिंतीलाच धोका निर्माण झाला आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग कुरखेडा अंतर्गत कढोलीजवळून वाहणाऱ्या सती नदीवरील पुलाच्या लगतचा भाग पावसाळ्यात वाहून गेला. त्याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली. पूल आणि संरक्षक भिंत यांच्यामधील पोकळी बुजविण्यासाठी नदीकाठावरची माती खोदून ती त्या पोकळीमध्ये टाकण्यात आली. खालची माती गेल्याने आता संरक्षक भिंतीलाच धोका निर्माण झाला आहे. ज्या मातीवर संरक्षक भिंत उभी आहे, त्या ठिकाणी खड्डा पाडल्याने पुढे नदीच्या पाण्यामुळे उर्वरित मातीही वाहून जाणार आहे. त्यामुळे सदर संरक्षक भिंत कोसळण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे कंत्राटदाराने संरक्षक भिंतीच्या खालची माती उपसण्याची काहीच गरज नव्हती. पोकळीच्या ठिकाणी मुरूम टाकणे आवश्यक होते. मात्र थातुरमातूर काम उरकण्यासाठी त्याच ठिकाणची माती टाकली आहे. माती खोदल्यामुळे संरक्षक भिंतीला धोका पोहोचणार आहे. ही बाब सामान्य नागरिकाच्या लक्षात येते, तर अभियंत्यांना कसे समजत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.पुलाजवळची माती खोदल्याने भविष्यात पुलालाही धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.शिवकालीन बंधाऱ्याने केले पात्राचे नुकसानकढोली पुलाच्या खालच्या भागातच शिवकालीन बंधारा चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आला. या बंधाऱ्याचा काहीच फायदा झाला नाही. मात्र पुलाच्या दोन्ही बाजूला जवळपास २५ एकर नदीकाठाचा भूभाग वाहून गेला आहे. त्यामुळे नदीचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारी यंत्रणा अशा पद्धतीने चुकीचे काम करीत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. बहुतांश ठिकाणचा नदीकाठ नदीबरोबर झाला आहे.नदी हा अतिशय संवेदनशील विषय आहे. नदीतील रेतीचा जास्त प्रमाणात उपसा झाल्यास पर्यावरणाला धोका होऊ शकते. त्यामुळे नदीपात्राची पाहणी केल्याशिवाय घाट मंजूर केला जात नाही. कोणत्याही पुलाजवळ रेतीघाट मंजूर होत नाही. सरकारी यंत्रणा मात्र कोणताही विचार न करता कामे करून घेत आहे. नदीघाटावरील माती उपसणे हा अतिशय गंभीर प्रकार असून संबंधित कंत्राटदारावर किंवा अभियंत्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग