शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

वादळाने अहेरी तालुक्यातील शेकडो घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 23:39 IST

अहेरी तालुक्याला बुधवारी सायंकाळी वादळाचा तडाखा बसला. यामध्ये तालुक्यातील शेकडो घरांचे नुकसान झाले. त्यांना तातडीने मदत देण्याची मागणी जि.प.सभापती भाग्यश्री आत्राम यांनी केली आहे.

ठळक मुद्देआलापल्ली व गुड्डीगुडम गावांना फटका : जि.प. उपाध्यक्ष व बांधकाम सभापतींनी केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी/आलापल्ली : अहेरी तालुक्याला बुधवारी सायंकाळी वादळाचा तडाखा बसला. यामध्ये तालुक्यातील शेकडो घरांचे नुकसान झाले. त्यांना तातडीने मदत देण्याची मागणी जि.प.सभापती भाग्यश्री आत्राम यांनी केली आहे.आलापल्ली येथील २० घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर जवळपास ५० घरांचे अंशत: नुकसान झाले. गोंडमोहल्ला, पुनागुडम, मल्लेवार कॉलनी, बजरंग चौक, वन वसाहत तसेच बसस्थानक परिसरातील नागरिकांच्या कवेलु व टिनाचे पत्रे घरावरून उडाल्याने घरातील वस्तू, उपकरणे पावसामुळे ओले झाले. आलापल्लीचे उपवनसंरक्षक सी. आर. तांबे यांनी वन वसाहतीची पाहणी केली. टिन उडून जात असल्याची तक्रार केली. गोंड मोहल्ला, पुनागुडम तसेच इतर वार्डात जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार, सरपंच सुगंधा मडावी, सदस्य संतोष तोडसाम, दिलीप गंजीवार, जुलेख शेख यांनी पाहणी केली. मदतीसंदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन जि.प. उपाध्यक्षांनी केले. गुरूवारीही काही वार्डातील वीज पुरवठा बंदच होता.अहेरी तालुक्यातील सिरोंचा मार्गावरील गुड्डीगुडम येथीलही घरांचे मोठे नुकसान झाले. जि.प. बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम यांनी पाहणी केली. सारय्या भिमा मडावी, नामदेव धर्मा मडावी यांच्या घरावरचे छप्पर उडाल्याने मोठे नुकसान झाले. निमलगुडम येथील बिच्छु पोट्टी आत्राम, दिवाकर सडमेक, वैनकतेश शिरलावार यांच्याही घरांना भेट देऊन पाहणी केली. काही घरांवर विजेचे तार तुटून पडल्याने नागरिकांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तारा सुरळीत करण्याचे निर्देश वीज विभागाला दिले.