शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

वादळाने ११ लाखांचे नुकसान

By admin | Updated: May 21, 2016 01:17 IST

१८ मे रोजी अहेरी तालुक्यात सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळामुळे नऊ गावातील १२४ घरे क्षतिग्रस्त झाली.

१२४ घरे आपदग्रस्त : अहेरी तालुक्यातील नऊ गावांना फटका; महसूल विभागातर्फे पंचनामाआलापल्ली : १८ मे रोजी अहेरी तालुक्यात सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळामुळे नऊ गावातील १२४ घरे क्षतिग्रस्त झाली. यामुळे ११ लाख ४० हजार ७४५ रूपयांचे नुकसान झाले आहे. याबाबतचा अहवाल अहेरी तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अहेरी, आलापल्ली परिसरात जोरदार वादळासह पावसाला सुरुवात झाली होती. वादळामुळे अनेक नागरिकांच्या घरावरील टिनाचे छप्पर उडून गेले होते. काही नागरिकांच्या घरावरील कवेलू उडाले तर काही घरांवर झाडे कोसळल्याने घरांचे नुकसान झाले. वादळाचा तडाखा पेरमिली, अहेरी, देवलमारी, व्यंकटराव पेठा, गडअहेरी (बामणी), चेरपल्ली, गडअहेरी, चिंचगुंडी, आलापल्ली या नऊ गावातील १२४ घरांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने दुसऱ्याची दिवशी क्षतिग्रस्त घरांचे पंचनामे केले. यामध्ये ११ लाख ४० हजार ७४५ रूपयांचे नुकसान झाले असल्याचे तलाठी व मंडळ अधिकारी यांनी केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल गुरूवारी तहसीलदारांना सादर केला. सदर अहवाल अहेरी तहसीलदारांनी जिल्हाधिकारी यांना सादर केला आहे. पावसाळ्याच्या पर्वावर घरांचे नुकसान झाले आहे. शेतीसाठी बियाणे व खत खरेदी करावे की, घराची दुरूस्ती करावी, असा प्रश्न नुकसान झालेल्या नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. प्रशासनाने तत्काळ मदत करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)