शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

वादळाने ११ लाखांचे नुकसान

By admin | Updated: May 21, 2016 01:17 IST

१८ मे रोजी अहेरी तालुक्यात सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळामुळे नऊ गावातील १२४ घरे क्षतिग्रस्त झाली.

१२४ घरे आपदग्रस्त : अहेरी तालुक्यातील नऊ गावांना फटका; महसूल विभागातर्फे पंचनामाआलापल्ली : १८ मे रोजी अहेरी तालुक्यात सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळामुळे नऊ गावातील १२४ घरे क्षतिग्रस्त झाली. यामुळे ११ लाख ४० हजार ७४५ रूपयांचे नुकसान झाले आहे. याबाबतचा अहवाल अहेरी तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अहेरी, आलापल्ली परिसरात जोरदार वादळासह पावसाला सुरुवात झाली होती. वादळामुळे अनेक नागरिकांच्या घरावरील टिनाचे छप्पर उडून गेले होते. काही नागरिकांच्या घरावरील कवेलू उडाले तर काही घरांवर झाडे कोसळल्याने घरांचे नुकसान झाले. वादळाचा तडाखा पेरमिली, अहेरी, देवलमारी, व्यंकटराव पेठा, गडअहेरी (बामणी), चेरपल्ली, गडअहेरी, चिंचगुंडी, आलापल्ली या नऊ गावातील १२४ घरांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने दुसऱ्याची दिवशी क्षतिग्रस्त घरांचे पंचनामे केले. यामध्ये ११ लाख ४० हजार ७४५ रूपयांचे नुकसान झाले असल्याचे तलाठी व मंडळ अधिकारी यांनी केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल गुरूवारी तहसीलदारांना सादर केला. सदर अहवाल अहेरी तहसीलदारांनी जिल्हाधिकारी यांना सादर केला आहे. पावसाळ्याच्या पर्वावर घरांचे नुकसान झाले आहे. शेतीसाठी बियाणे व खत खरेदी करावे की, घराची दुरूस्ती करावी, असा प्रश्न नुकसान झालेल्या नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. प्रशासनाने तत्काळ मदत करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)