शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट

By admin | Updated: April 16, 2017 00:37 IST

जलयुक्त शिवार अभियानातून मंजेगाव शेतशिवारात सिमेंट बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात येत आहे.

मंजेगाव येथील प्रकार : जिल्हा परिषद सदस्यांकडून कामाची पाहणीघोट : जलयुक्त शिवार अभियानातून मंजेगाव शेतशिवारात सिमेंट बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात येत आहे. मात्र सदर बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून या बांधकामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रंजीता कोडापे व गावकऱ्यांनी केली आहे. मंजेगाव येथील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शेतशिवारात असलेल्या नाल्यावर जलयुक्त शिवार अभियानातून सिमेंट बंधारा मंजूर करण्यात आला आहे. सिमेंट बंधाऱ्याचे खोदकाम केलेल्या नाल्यात तोल जाऊन राजेश्वर तुंकलवार यांचा बैल मृत्यूमुखी पडला. झालेल्या घटनेची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य रंजीता कोडापे, चापलवाडा ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश लेकलवार, माजी उपसरपंच गंगाधर रामटेके, सुरेश राजुरवार, मधुकर नरोटे, निखील उंदीरवाडे, प्रेमिला तुंकलवार, संतोष गरतुलवार, वसंत तुंकलवार, बंडू बावणे, देवाजी बावणे, मारोती तुंकलवार गेले असता बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे निदर्शनास आले. सिमेंटचा वापर कमी केला जात असल्याने केवळ रेती व गिट्टी बाहेर दिसत आहे. सिमेंटचा मसाला अत्यंत कमी प्रमाणात वापरला जात असल्याने बंधाऱ्यासाठी वापरलेले लोखंड बाहेर दिसत आहे. या कामाबाबत अभियंत्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता, सदर कंत्राटदाराला कामात सुधारणा करण्याची सूचना दिली असल्याचे अभियंत्याने सांगितले. शासन लाखो रूपये खर्चून जलस्त्रोत वाढविण्याकरिता प्रयत्न करीत असताना अशा प्रकारच्या निकृष्ट बंधाऱ्याने शासनाचे पैसे अनावश्यक खर्च होत आहेत. हा अतिशय गंभीर प्रकार आहे. सद्य:स्थितीत सुरू असलेल्या बंधाऱ्याच्या बांधकामाचा दर्जा लक्षात घेतला तर पहिल्या पाण्यातच बंधारा वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वीही निकृष्ट दर्जाचे बंधारे वाहून गेल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. या कामाची चौकशी करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रंजीता कोडापे यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.या बंधाऱ्यात पडून मृत्यूमुखी पडलेल्या बैल मालकाचे ३० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. कंत्राटदाराच्या चुकीमुळे बैलाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बैलाची रक्कम कंत्राटदाराकडूनच वसूल करावी, अशीही मागणी केली आहे. (वार्ताहर)वाहून जाण्याचा धोका४बंधाऱ्याच्या बांधकामाचा दर्जा अत्यंत निकृष्ठ असल्याने सदर बंधारा पहिल्याच पावसात वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास शासनाचे लाखो रूाये अनावश्यक खर्च होतील. झालेले बांधकाम तोडून त्याऐवजी चांगल्या दर्जाचे नवीन बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी गावातील नागरिकांनी अभियंत्याकडे केली आहे.