शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

अरे बाबांनाे, गावात घरकूल बांधताय की बंगला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 05:00 IST

प्रत्येकाला हक्काचे पक्के घर उपलब्ध व्हावे, यासाठी प्रधानमंत्री आवास याेजनेंतर्गत घरकूल बांधकामासाठी जवळपास दीड लाख रुपयांचा निधी दिला जातो. हा निधी चार टप्प्यांमध्ये वितरित हाेतो. पहिला टप्पा २० हजार, दुसरा व तिसरा टप्पा प्रत्येकी ४५ हजार, चाैथ्या टप्यात २० हजार रुपये असे एकूण १ लाख ३० हजार रुपये दिले जातात. तसेच नरेगामार्फत १७ हजार रुपये व शाैचालयाचा लाभ घेतला नसल्यास १२ हजार रुपयांचा निधी दिला जातो.

दिगांबर जवादेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : घरकुलाचे बांधकाम १२० दिवसांच्या कालावधीत पूर्ण हाेणे आवश्यक आहे. मात्र, काही लाभार्थ्यांचे घरकूल दाेन वर्षांचा कालावधी उलटूनही पूर्ण झाले नाही. हे लाभार्थी घरकूल बांधत आहेत की बंगला, असा प्रश्न प्रशासकीय यंत्रणेला पडला आहे. प्रत्येकाला हक्काचे पक्के घर उपलब्ध व्हावे, यासाठी प्रधानमंत्री आवास याेजनेंतर्गत घरकूल बांधकामासाठी जवळपास दीड लाख रुपयांचा निधी दिला जातो. हा निधी चार टप्प्यांमध्ये वितरित हाेतो. पहिला टप्पा २० हजार, दुसरा व तिसरा टप्पा प्रत्येकी ४५ हजार, चाैथ्या टप्यात २० हजार रुपये असे एकूण १ लाख ३० हजार रुपये दिले जातात. तसेच नरेगामार्फत १७ हजार रुपये व शाैचालयाचा लाभ घेतला नसल्यास १२ हजार रुपयांचा निधी दिला जातो. घराचे बांधकाम गतीने झाल्यास प्रशासकीय यंत्रणा टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून देते. मात्र, अनेक लाभार्थी घराचे काम गतीने करीत नाहीत.

माेठ्या घराचा माेह नडताे-    दीड लाख रुपयांच्या निधीतून लाभार्थ्याने २७० क्वेअर फुटाच्या दाेन खाेल्या व एक बाथरूम बांधणे अपेक्षित आहे. मात्र, घर एकदाच हाेते, असा चुकीचा समज बाळगून बरेच लाभार्थी ७०० ते ८०० फुटाचे घर बांधण्यास सुरूवात करतात. एवढे घर बांधण्यासाठी ग्रामीण भागातही सात ते आठ लाख रुपयांचा खर्च हाेतो. शासनाने दिलेला घरकुलाचा पैसा पुरत नाही. मग घरकुलाचे काम रखडत असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. 

अनेक लाभार्थी कर्जबाजारी-    घरकूल मिळाल्यानंतर अनेक लाभार्थी माेठे घर बांधण्यास सुरूवात करतात. शासन केवळ दीड लाख रुपये देते. उर्वरित पैसे कर्ज घेऊन गाेळा करावी लागतात. यात अनेक घरकूल लाभार्थी कुटुंब कर्जबाजारी झाले असल्याचे दिसून येते.-    घरकूल मिळावा, यासाठी माेठी धडपड केली जाते. घरकुलासाठी ग्रामसभेत माेठे भांडण हाेते. कार्यालयाचे उंबरठे झिजविले जातात. घरकूल मिळाल्यानंतर मात्र ते बांधले जात नाही. मिळालेला निधी इतर कामांवर खर्च करतात.

दिलेल्या वेळेत  घराचे बांधकाम करा

शासनाने घरकुलासाठी १२० दिवसांचा कालावधी दिला आहे. उत्तर प्रदेशातील अनेक घरकूल या कालावधीत पूर्ण हाेत आहे. मात्र, गडचिराेली जिल्ह्यासह राज्यात घरकूल पूर्ण हाेण्यासाठी एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लागतो.

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना