शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

सात महिन्यात दीडपटीने वाढला सिलिंडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 22:43 IST

उज्ज्वला योजनेंतर्गत केंद्र शासनाने खेड्यापाड्यातील प्रत्येक कुटुंबाला अनुदानावर गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिला. मात्र दर दिवशी सिलिंडरचे भाव वाढत असून नोव्हेंबर महिन्यात सिलींडरने हजारी पार केली आहे.

ठळक मुद्देनागरिकांना महागाईचे चटके : गॅसने हजारी पार करताच स्वयंपाक पुन्हा चुलीवर

शहाजी रत्नम ।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव (बुज.) : उज्ज्वला योजनेंतर्गत केंद्र शासनाने खेड्यापाड्यातील प्रत्येक कुटुंबाला अनुदानावर गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिला. मात्र दर दिवशी सिलिंडरचे भाव वाढत असून नोव्हेंबर महिन्यात सिलींडरने हजारी पार केली आहे. एवढा महागडा सिलिंडर खरेदी करणे शक्य नसल्याने ग्रामीण भागातील नागरिक आता पुन्हा चुलीवरच स्वयंपाक करून खर्चाची बचत करण्याचा प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे, मागील सात महिन्यात सिलिंडरच्या दरात सुमारे ४१ टक्के वाढ झाली आहे. १ एप्रिलला सिलिंडरचा भाव ७१३ रूपये होता. १ नोव्हेंबरला हा भाव १ हजार १० रूपये झाला आहे.चुलीवर स्वयंपाक केल्यास महिलांना श्वसनाचे आजार होतात. तसेच जंगलाची तोड होते. चुलीतून निघणाऱ्या धुरामुळे वायूप्रदुषण होते. आदी कारणे पुढे करून शासनाने गोरगरीब नागरिकांना अनुदानावर गॅस उपलब्ध करून दिला. जवळपास मोफतच गॅस उपलब्ध होत असल्याने खेड्यापाड्यातील व दुर्गम भागातील नागरिकांनी सुध्दा सिलिंडर गॅस खरेदी केला. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणात आपुलकी सुध्दा प्राप्त करून घेतली. मात्र त्याचे योग्य फलित झाल्याचे दिसत नाही. वाढत्या गॅस सिलिंडरच्या दरामुळे ग्रामीण भागातील जनता मेटाकुटीस आली आहे.एक हजार रूपये देऊन सिलिंडर खरेदी करणे शक्य नसल्याने पुन्हा चुलीवरच स्वयंपाक केला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चूलमुक्त करण्याच्या शासनाच्या धोरणावर पाणी फेरले जात आहे. दुर्गम भागात घरामध्ये असलेले गॅस सिलिंडर केवळ शोभेची वस्तू बनली आहे.शहरी भागातील नागरिकांना गॅसवर स्वयंपाक केल्याशिवाय पर्याय नसल्याने सरकारच्या नावाने बोटे मोडीत गॅस सिलिंडर खरेदी केला जात आहे. अनुदानाची रक्कम जास्त जमा होते, असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात अत्यंत कमी प्रमाणात रक्कम जमा होते.तसेच एकाच वेळी हजार रूपये मोजावे लागत असल्याने रोजी रोटी करून प्रपंच भागविणाºया कुटुंबांची चांगलीच गोची होत आहे. सिलिंडरची भाववाढ अशीच चालू राहिल्यास शहरातीलही कुटुंब पुन्हा चुलीकडेच वळण्याची शक्यता नाकारता येत नाही.चहा शिजविण्यासाठीच होतो वापरउज्ज्वला योजनेच्या सुरूवातीला सिलींडरची किंमत ६०० रूपये होती. त्यावेळी ग्रामीण भागातील नागरिक काही प्रमाणात स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलिंडरचा वापर करीत होते. आता मात्र सिलिंडरचा भाव एक हजार रूपये पार केल्याने केवळ पाहुणा आल्यास त्याला चहा मांडण्यासाठीच गॅसचा वापर केला जात आहे. ज्या गरीब नागरिकांकडे पैसे नाहीत, अशा नागरिकांनी तर गॅस भरणेच सोडून दिले आहे. त्यामुळे त्यांच्या घरी रिकामे हंडे दिसून येत आहेत. काही नागरिक १०० रूपयात गॅस मिळते म्हणून खरेदी करीत आहेत. मात्र पहिल्यांदा भरलेला सिलिंडर संपल्यानंतर दुसरा सिलिंडर भरलाच जात नसल्याचेही चित्र आहे. सिलिंडरच्या किंमती अशाच वाढत राहिल्यास ग्रामीण भागातील घरांमधून गॅस सिलिंडर कायमचे हद्दपार होऊन त्याची जागा पुन्हा चुलीने घेणार आहे.