शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

सात महिन्यात दीडपटीने वाढला सिलिंडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 22:43 IST

उज्ज्वला योजनेंतर्गत केंद्र शासनाने खेड्यापाड्यातील प्रत्येक कुटुंबाला अनुदानावर गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिला. मात्र दर दिवशी सिलिंडरचे भाव वाढत असून नोव्हेंबर महिन्यात सिलींडरने हजारी पार केली आहे.

ठळक मुद्देनागरिकांना महागाईचे चटके : गॅसने हजारी पार करताच स्वयंपाक पुन्हा चुलीवर

शहाजी रत्नम ।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव (बुज.) : उज्ज्वला योजनेंतर्गत केंद्र शासनाने खेड्यापाड्यातील प्रत्येक कुटुंबाला अनुदानावर गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिला. मात्र दर दिवशी सिलिंडरचे भाव वाढत असून नोव्हेंबर महिन्यात सिलींडरने हजारी पार केली आहे. एवढा महागडा सिलिंडर खरेदी करणे शक्य नसल्याने ग्रामीण भागातील नागरिक आता पुन्हा चुलीवरच स्वयंपाक करून खर्चाची बचत करण्याचा प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे, मागील सात महिन्यात सिलिंडरच्या दरात सुमारे ४१ टक्के वाढ झाली आहे. १ एप्रिलला सिलिंडरचा भाव ७१३ रूपये होता. १ नोव्हेंबरला हा भाव १ हजार १० रूपये झाला आहे.चुलीवर स्वयंपाक केल्यास महिलांना श्वसनाचे आजार होतात. तसेच जंगलाची तोड होते. चुलीतून निघणाऱ्या धुरामुळे वायूप्रदुषण होते. आदी कारणे पुढे करून शासनाने गोरगरीब नागरिकांना अनुदानावर गॅस उपलब्ध करून दिला. जवळपास मोफतच गॅस उपलब्ध होत असल्याने खेड्यापाड्यातील व दुर्गम भागातील नागरिकांनी सुध्दा सिलिंडर गॅस खरेदी केला. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणात आपुलकी सुध्दा प्राप्त करून घेतली. मात्र त्याचे योग्य फलित झाल्याचे दिसत नाही. वाढत्या गॅस सिलिंडरच्या दरामुळे ग्रामीण भागातील जनता मेटाकुटीस आली आहे.एक हजार रूपये देऊन सिलिंडर खरेदी करणे शक्य नसल्याने पुन्हा चुलीवरच स्वयंपाक केला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चूलमुक्त करण्याच्या शासनाच्या धोरणावर पाणी फेरले जात आहे. दुर्गम भागात घरामध्ये असलेले गॅस सिलिंडर केवळ शोभेची वस्तू बनली आहे.शहरी भागातील नागरिकांना गॅसवर स्वयंपाक केल्याशिवाय पर्याय नसल्याने सरकारच्या नावाने बोटे मोडीत गॅस सिलिंडर खरेदी केला जात आहे. अनुदानाची रक्कम जास्त जमा होते, असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात अत्यंत कमी प्रमाणात रक्कम जमा होते.तसेच एकाच वेळी हजार रूपये मोजावे लागत असल्याने रोजी रोटी करून प्रपंच भागविणाºया कुटुंबांची चांगलीच गोची होत आहे. सिलिंडरची भाववाढ अशीच चालू राहिल्यास शहरातीलही कुटुंब पुन्हा चुलीकडेच वळण्याची शक्यता नाकारता येत नाही.चहा शिजविण्यासाठीच होतो वापरउज्ज्वला योजनेच्या सुरूवातीला सिलींडरची किंमत ६०० रूपये होती. त्यावेळी ग्रामीण भागातील नागरिक काही प्रमाणात स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलिंडरचा वापर करीत होते. आता मात्र सिलिंडरचा भाव एक हजार रूपये पार केल्याने केवळ पाहुणा आल्यास त्याला चहा मांडण्यासाठीच गॅसचा वापर केला जात आहे. ज्या गरीब नागरिकांकडे पैसे नाहीत, अशा नागरिकांनी तर गॅस भरणेच सोडून दिले आहे. त्यामुळे त्यांच्या घरी रिकामे हंडे दिसून येत आहेत. काही नागरिक १०० रूपयात गॅस मिळते म्हणून खरेदी करीत आहेत. मात्र पहिल्यांदा भरलेला सिलिंडर संपल्यानंतर दुसरा सिलिंडर भरलाच जात नसल्याचेही चित्र आहे. सिलिंडरच्या किंमती अशाच वाढत राहिल्यास ग्रामीण भागातील घरांमधून गॅस सिलिंडर कायमचे हद्दपार होऊन त्याची जागा पुन्हा चुलीने घेणार आहे.