शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

ग्राहक सेवाकेंद्र कुलूूपबंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:32 IST

चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी येथे नागरिकांच्या सोयीसाठी ग्राहक सेवा केंद्र निर्माण करण्यात आले. परंतु सदर केंद्र मागील सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध कामे करताना अडचणी येत आहेत.

ठळक मुद्देसमस्येकडे दुर्लक्ष : सहा महिन्यांपासून आर्थिक व्यवहार ठप्प असल्याने ग्राहक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कलखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी येथे नागरिकांच्या सोयीसाठी ग्राहक सेवा केंद्र निर्माण करण्यात आले. परंतु सदर केंद्र मागील सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध कामे करताना अडचणी येत आहेत. जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून केंद्र पुन्हा सुरू करावे, अशी मागणी होत आहे.लखमापूर येथे मोठी बँक नसल्याने येथील नागरिक आर्थिक व्यवहार करण्यासाठी भेंडाळा तसेच चामोर्शी येथे जात होते. मात्र हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने नागरिकांच्या सुविधेसाठी लखमापूर बोरी येथे चामोर्शी स्टेट बँक अंतर्गत मिनी स्टेट बँक अर्थात ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यात आले. मात्र सदर ग्राहक सेवा केंद्र गेल्या सहा महिन्यांपासून कुलूपबंद असल्याने आर्थिक व्यवहार करण्यासाठी नागरिकांची प्रचंड पंचाईत होत आहे.गावात ग्राहक सेवा केंद्र झाल्यानंतर अनेक नागरिक व मजुरांनी विविध कामासाठी येथे आपले खाते उघडले. अनेकांनी आपल्या खात्यात गुंतवणूकही केली. तसेच रोजगार हमी कामाच्या मजुरीची रक्कम, गॅस सबसीडीची रक्कम, वीज देयक आदी सुविधा नागरिकांना येथे मिळत होत्या. मात्र सुरूवातीपासूनच सदर ग्राहकसेवा केंद्राचे कामकाज संथगतीने चालविले जात होते. त्यानंतर हे ग्राहकसेवा केंद्र बंद झाले. सहा महिने उलटूनही केंद्र सुरू न झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या सेवा केंद्रातील संगणक संच बंद पडल्याने त्याची दुरूस्ती झाल्यानंतरच हे सेवा केंद्र सुरू करण्यात येईल, असे कर्मचाºयांकडून सांगितले जात आहे. परंतु अनेक ग्राहकांना माहित असल्याने खातेदार सकाळी ११ वाजता येऊन येथे कामासाठी बसतात. मात्र कुलूप लागल्याचे पाहून आल्यापावली ते परत जात आहेत. त्यामुळे नागरिकांची चांगलीच दमछाक होत आहे. यापूर्वी अनेकदा मागणी करण्यात आली. परंतु याकडे दुर्लक्षच झाले.परिसरातील खातेदारांची अडचणशासनाच्या विविध विभागाची कामे आॅनलाईन झाली आहेत. त्यामुळे ग्राहकांनाही आॅनलाईन कामे केल्याशिवाय पर्याय नाही. लखमापूर बोरी येथील ग्राहक सेवा केंद्रात बल्लू, भिक्षी, रामसागर, बोरी, लखमापूर आदी चार ते पाच गावातील नागरिकांनी आपले खाते उघडले आहे. परंतु ग्राहक सेवा केंद्रच बंद असल्याने त्यांना आपली कामे करता येत नाही. अनेक दिवसांपासून आॅनलाईन कामे रखडली आहेत. परिणामी नागरिकांना कमालीचा त्रास होत आहे. काही ग्राहकांना तालुकास्तरावर कामासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्राहकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.