शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
4
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
5
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
6
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
7
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
8
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
9
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
10
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
11
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
12
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
13
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
15
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
16
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
17
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
19
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
20
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!

ग्राहक सेवाकेंद्र कुलूूपबंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:32 IST

चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी येथे नागरिकांच्या सोयीसाठी ग्राहक सेवा केंद्र निर्माण करण्यात आले. परंतु सदर केंद्र मागील सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध कामे करताना अडचणी येत आहेत.

ठळक मुद्देसमस्येकडे दुर्लक्ष : सहा महिन्यांपासून आर्थिक व्यवहार ठप्प असल्याने ग्राहक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कलखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी येथे नागरिकांच्या सोयीसाठी ग्राहक सेवा केंद्र निर्माण करण्यात आले. परंतु सदर केंद्र मागील सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध कामे करताना अडचणी येत आहेत. जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून केंद्र पुन्हा सुरू करावे, अशी मागणी होत आहे.लखमापूर येथे मोठी बँक नसल्याने येथील नागरिक आर्थिक व्यवहार करण्यासाठी भेंडाळा तसेच चामोर्शी येथे जात होते. मात्र हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने नागरिकांच्या सुविधेसाठी लखमापूर बोरी येथे चामोर्शी स्टेट बँक अंतर्गत मिनी स्टेट बँक अर्थात ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यात आले. मात्र सदर ग्राहक सेवा केंद्र गेल्या सहा महिन्यांपासून कुलूपबंद असल्याने आर्थिक व्यवहार करण्यासाठी नागरिकांची प्रचंड पंचाईत होत आहे.गावात ग्राहक सेवा केंद्र झाल्यानंतर अनेक नागरिक व मजुरांनी विविध कामासाठी येथे आपले खाते उघडले. अनेकांनी आपल्या खात्यात गुंतवणूकही केली. तसेच रोजगार हमी कामाच्या मजुरीची रक्कम, गॅस सबसीडीची रक्कम, वीज देयक आदी सुविधा नागरिकांना येथे मिळत होत्या. मात्र सुरूवातीपासूनच सदर ग्राहकसेवा केंद्राचे कामकाज संथगतीने चालविले जात होते. त्यानंतर हे ग्राहकसेवा केंद्र बंद झाले. सहा महिने उलटूनही केंद्र सुरू न झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या सेवा केंद्रातील संगणक संच बंद पडल्याने त्याची दुरूस्ती झाल्यानंतरच हे सेवा केंद्र सुरू करण्यात येईल, असे कर्मचाºयांकडून सांगितले जात आहे. परंतु अनेक ग्राहकांना माहित असल्याने खातेदार सकाळी ११ वाजता येऊन येथे कामासाठी बसतात. मात्र कुलूप लागल्याचे पाहून आल्यापावली ते परत जात आहेत. त्यामुळे नागरिकांची चांगलीच दमछाक होत आहे. यापूर्वी अनेकदा मागणी करण्यात आली. परंतु याकडे दुर्लक्षच झाले.परिसरातील खातेदारांची अडचणशासनाच्या विविध विभागाची कामे आॅनलाईन झाली आहेत. त्यामुळे ग्राहकांनाही आॅनलाईन कामे केल्याशिवाय पर्याय नाही. लखमापूर बोरी येथील ग्राहक सेवा केंद्रात बल्लू, भिक्षी, रामसागर, बोरी, लखमापूर आदी चार ते पाच गावातील नागरिकांनी आपले खाते उघडले आहे. परंतु ग्राहक सेवा केंद्रच बंद असल्याने त्यांना आपली कामे करता येत नाही. अनेक दिवसांपासून आॅनलाईन कामे रखडली आहेत. परिणामी नागरिकांना कमालीचा त्रास होत आहे. काही ग्राहकांना तालुकास्तरावर कामासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्राहकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.