शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
5
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
6
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
7
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
8
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
9
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
10
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
11
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
12
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
13
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
14
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
15
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
16
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
17
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
18
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
19
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
20
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ

सामाजिक उपक्रमातही सीआरपीएफचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 00:50 IST

नक्षलविरोधी अभियानासाठी गडचिरोली जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पाच बटालियन कार्यरत आहेत. त्यांच्याकडून नक्षली कारवाया रोखण्यासोबतच आता नागरी कृती कार्यक्रमातून सामाजिक उपक्रमही राबवून गोरगरीब आदिवासींना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ठळक मुद्देनागरी कृती कार्यक्रम : रोजगार-स्वयंरोजगार प्रशिक्षणावर १ कोटी ३० लाख रुपये खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलविरोधी अभियानासाठी गडचिरोली जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पाच बटालियन कार्यरत आहेत. त्यांच्याकडून नक्षली कारवाया रोखण्यासोबतच आता नागरी कृती कार्यक्रमातून सामाजिक उपक्रमही राबवून गोरगरीब आदिवासींना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या वर्षभरात यावर १ कोटी ३० लाख रुपये खर्च झाले आहेत.बेरोजगार, महिलांना रोजगार-स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यासोबतच इतरही उपक्रम राबविले जात आहेत. जिल्ह्यात दुर्गम भागात नक्षली कारवाया रोखण्यासोबतच नागरिकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचेही आव्हान आहे. रोजगाराची साधने नसल्यामुळे बेरोजगार युवक नक्षल चळवळीकडे भरकटू शकतात. हे टाळण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलही नागरी कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांच्या उत्थानासाठी पुढे येत आहे. वर्षभरापूर्वी या उपक्रमाचे उद्घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते झाले होते.जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात कार्यरत सीआरपीएफच्या पाचही बटालियनकडे जबाबदारी देऊन कुठे काय करता येईल याची आखणी करण्यात आली. बेरोजगार युवक, नागरिक, महिला यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना विविध प्रकारचे स्वयंरोजगार, रोजगारासाठीचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यात कॉम्प्युटर प्रशिक्षण, वाहन चालक प्रशिक्षण, महिलांसाठी शिवणकाम प्रशिक्षण आणि शिलाई मशीनचे वाटप, याशिवाय बकरीपालन, कुकुट पालन, मच्छीपालन यासाठीही मदत केली जात आहे. सीआरपीएफचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ.टी.शेखर यांनी सांगितले की, या कार्यक्रमातून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. महिला आणि युवकांना स्वयंरोजगारासाठी मदत मिळाली आहे.१० गावांत जलस्त्रोतांचे संवर्धनजिल्ह्यातील १० गावांमध्ये जलस्त्रोत वाढविण्यासाठी तलावांचे खोलीकरण आणि इतर आवश्यक त्या सुविधा देण्यात आल्या आहेत. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने त्या तलावांमध्ये पुरेसे पाणी साचले असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीHansraj Ahirहंसराज अहिर