शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

सीआरपीएफ बटालियन एटापल्लीत दाखल

By admin | Updated: April 27, 2016 01:19 IST

नक्षली कारवायांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या एटापल्ली येथे केंद्रीय राज्य राखीव पोलीस दलाचा बेस कॅम्प लावण्यात आला आहे.

कॅम्प वसला : १०० जवान पोहोचले; नक्षल कारवायांवर प्रतिबंधएटापल्ली : नक्षली कारवायांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या एटापल्ली येथे केंद्रीय राज्य राखीव पोलीस दलाचा बेस कॅम्प लावण्यात आला आहे. एकाच दिवशी एटापल्ली, हेडरी, हालेवारा, कोटमी, कसनसूर, गट्टा या सहा ठिकाणी तुकड्या दाखल झाल्या आहेत. एका तुकडीत १३५ ते १५० जवान असतात. जवळपास ८१० ते ९०० च्या संख्येत सीआरपीएफ जवान एटापल्ली तालुक्यात दाखल झाल्याने नक्षल कारवायांना आता प्रचंड धक्का बसणार आहे. एटापल्ली येथे सीमा सडक संघटन (बीआरओ) चा कॅम्प काही वर्षांपूर्वी होता. त्याच जागेवर केंद्रीय राखीव पोलीस दलाचा कॅम्प लावण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाच्या बाजुला एटापल्ली-जिमलगट्टा मार्गावर हा कॅम्प लागलेला आहे. येथे बीआरओ कॅम्प वास्तव्याला होता. एटापल्ली-गट्टा मार्गावर असलेल्या बीआरओ कॅम्पकडून आलदंडी नदीच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना सन २००३ मध्ये या कॅम्पवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता व वाहने जाळले होते. बीआरओ अभियंता एम. गणेशन यांची हत्या केली होती. तेव्हापासून हा बीआरओ कॅम्प बंद पडून तब्बल १३ वर्षांपासून खाली अवस्थेत ही जागा होती. बीआरओच्या या जुन्या इमारतीत काही नवीन टिनाचे शेड बांधून सीआरपीएफ कॅम्प सुरू करण्यात आला आहे. या कॅम्पचे बरेच विस्तारित बांधकाम व्हायचे अजून शिल्लक आहे. संरक्षक भिंतीचेही काम अर्धवट स्थितीत आहे. तारेचे कम्पाऊंडसुद्धा पूर्ण झालेले नाही. एटापल्लीवगळता इतर ठिकाणी पोलीस ठाण्याच्या आवारातच सीआरपीएफ कॅम्प लावण्यात आले आहे. एटापल्ली तालुक्यात गडचिरोली पोलीस प्रशासनाच्या जवानांनी व सी-६० जवानांनी उल्लेखनीय कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. कोटमी, हालेवारा, बुर्गी, हेडरी येथे पोलीस ठाणे उघडून नक्षल्यांचा थेट सामना करण्याची हिंमत या ठाण्याअंतर्गत कार्यरत अधिकारी व जवांनानी दाखविली. याचबरोबर दुर्गम भागातून मोठ्या प्रमाणावर नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण या पोलीस अधिकाऱ्यांच्या पुढाकारानेच झालेत. त्यामुळे एटापल्ली तालुक्यातील नक्षल कारवाया नियंत्रणात ठेवण्यात पोलीस दलाला यश आले. अशी स्थिती असताना केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या कशासाठी आणण्यात आल्या, असा प्रश्न नागरिकांनाही पडला आहे. पुन्हा दुसरी तुकडीही लवकरच दाखल होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या परिसराला पोलीस छावणीचे रूप येणार आहे. एटापल्ली तालुक्यात सूरजागड पहाडीवर लोह प्रकल्पासाठी उत्खननाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाला होत असलेला विरोध व विविध राजकीय पक्षांचे वेगवेगळे मतप्रवाह असल्याने येथून लोह खनिजाची वाहतूक करणे अडचणीचे जाऊ नये, याकरिता या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कंपन्या आणण्यात आल्या, असे बोलले जात आहे. सीआरपीएफच्या आगमनामुळे सूरजागड प्रकल्प विरोधातील आंदोलनाची धारही कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (तालुका प्रतिनिधी)