शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

पूरपीडित शेतकऱ्यांवर पीक कर्जाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:44 IST

देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यात २७ ते ३१ ऑगस्टपर्यंत वैनगंगा नदीला गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील शेतकरी ...

देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यात २७ ते ३१ ऑगस्टपर्यंत वैनगंगा नदीला गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील शेतकरी पुरते बरबाद झाले. दरम्यान स्थानिक तलाठ्यांच्या माध्यमातून मोका चौकशी करून तसा अहवालदेखील मागवण्यात आला होता. मात्र, पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर पूरपीडित शेतकऱ्यांना पीककर्ज माफीचा अद्यापही लाभ देण्यात आला नाही. त्यातच संबंधित बँकांनी वसुलीसंदर्भात नोटीस बजावल्या असल्याने आर्थिक संकटात असलेले शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.

वैनगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील शेतकरी पुरते उद्ध्वस्त झाले असून यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करत जगावे लागत असल्याचे दिसून येते. अत्यल्प उत्पादन हाती लागल्याने वार्षिक आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे.

नदीकाठावरील शेतकऱ्यांना महापुराचा जबर फटका बसला असल्याचे २४ डिसेंबर २०२० रोजी केंद्रीय पथकाने प्रत्यक्ष दिलेल्या भेटीतून व मोका चौकशीतून स्पष्ट झाले होते. दरम्यान, तसा अहवालही शासन दरबारी सादर करण्यात आल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांना दिली होती. मात्र, दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही शासकीय स्तरावरून तुटपुंजी मदत देण्याऐवजी झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात आर्थिक मदतही देण्यात आली नाही. नियमित पीक कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्यापही सानुग्रह अनुदानाची रक्कम देण्यात आली नसताना बँकांनी पीककर्ज वसुलीसाठी तगादा लावला असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. शासनाने पश्चिम महाराष्ट्रातील पूरबाधित शेतकऱ्यांना संपूर्ण पीककर्ज माफी देऊन सातबारा कोरा केला होता, त्याच धर्तीवर येथीलही शेतकऱ्यांचे संपूर्ण पीककर्ज माफ करण्याची तत्काळ कारवाई करून तसे निर्देश संबंधित बँकांना देण्याची मागणी शेतकरीवर्गातून केली जाऊ लागली आहे.