शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

पूरपीडित शेतकऱ्यांवर पीक कर्जाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:44 IST

देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यात २७ ते ३१ ऑगस्टपर्यंत वैनगंगा नदीला गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील शेतकरी ...

देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यात २७ ते ३१ ऑगस्टपर्यंत वैनगंगा नदीला गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील शेतकरी पुरते बरबाद झाले. दरम्यान स्थानिक तलाठ्यांच्या माध्यमातून मोका चौकशी करून तसा अहवालदेखील मागवण्यात आला होता. मात्र, पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर पूरपीडित शेतकऱ्यांना पीककर्ज माफीचा अद्यापही लाभ देण्यात आला नाही. त्यातच संबंधित बँकांनी वसुलीसंदर्भात नोटीस बजावल्या असल्याने आर्थिक संकटात असलेले शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.

वैनगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील शेतकरी पुरते उद्ध्वस्त झाले असून यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करत जगावे लागत असल्याचे दिसून येते. अत्यल्प उत्पादन हाती लागल्याने वार्षिक आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे.

नदीकाठावरील शेतकऱ्यांना महापुराचा जबर फटका बसला असल्याचे २४ डिसेंबर २०२० रोजी केंद्रीय पथकाने प्रत्यक्ष दिलेल्या भेटीतून व मोका चौकशीतून स्पष्ट झाले होते. दरम्यान, तसा अहवालही शासन दरबारी सादर करण्यात आल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांना दिली होती. मात्र, दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही शासकीय स्तरावरून तुटपुंजी मदत देण्याऐवजी झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात आर्थिक मदतही देण्यात आली नाही. नियमित पीक कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्यापही सानुग्रह अनुदानाची रक्कम देण्यात आली नसताना बँकांनी पीककर्ज वसुलीसाठी तगादा लावला असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. शासनाने पश्चिम महाराष्ट्रातील पूरबाधित शेतकऱ्यांना संपूर्ण पीककर्ज माफी देऊन सातबारा कोरा केला होता, त्याच धर्तीवर येथीलही शेतकऱ्यांचे संपूर्ण पीककर्ज माफ करण्याची तत्काळ कारवाई करून तसे निर्देश संबंधित बँकांना देण्याची मागणी शेतकरीवर्गातून केली जाऊ लागली आहे.