लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी/धानोरा : कोरोनाच्या संचारबंदीमुळे चामोर्शी, धानोरा तालुक्यासह जिल्हाभरातील सलुनची दुकाने गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहेत. परिणामी नाभिक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे नाभिक बांधवांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ तालुका शाखा चामोर्शी व धानोराच्या वतीने करण्यात आली आहे.चामोर्शीच्या तहसीलदारांना निवेदन बुधवारी देण्यात आले. यावेळी तालुका शाखेचे उपाध्यक्ष देविदास पालिकोंडावार, नागन्ना गड्डमवार, भेंडाळा शाखेचे अध्यक्ष घनश्याम पालपल्लीवार आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणू संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सलुनचे दुकाने बंद आहेत. दुकानमालक व तेथील कारागिर बेरोजगार झाले आहेत. दरम्यान गडचिरोली जिल्हा कोरोबाबत ग्रीन झोनमध्ये आल्याने नियमात शिथीलता करण्यात आली. त्यानंतर चार ते पाच दिवस दुकान सुरू करण्यात आले. त्यामुळे कारागिर व समाजबांधवांना दिलासा मिळाला होता. मात्र पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळून हा जिल्हा आॅरेंज झोनमध्ये गेल्याने सलुन दुकाने बंद ठेवण्याचा आदेश झळकला. आता गेल्या १० दिवसांपासून सलुनचे दुकाने पूर्णत: बंद आहेत. रोजगाराचे दुसरे साधन नसल्याने सदर व्यवसायक करणारे कारागिर व दुकानदार तसेच नाभिक समाजबांधवांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.धानोरा तालुक्यातील नाभिक समाज व्यावसायिक व कारागिरांना आर्थिक व जीवनावश्यक वस्तूूची मदत देण्यात यावी, अशी मागणी संत नगाजी महाराज सामाजिक सेवा समिती धानोराच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आले आहे. कोरोनामुळे व्यवसाय पूर्णत: बंद असल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. परिणामी कौंटुबीक दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले आहे. परिणामी नाभिक समाजबांधवांचे मानसिक संतुलन ढासळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. निवेदन देताना ज्ञानेश्वर वनस्कर, सूरज सूर्यवंशी, जगदीश सूर्यवंशी, मनोज मेसेरकर, मेघश्याम वनस्कर, राजू सुत्रपवार, महेश चौधरी, संगम सूर्यवंशी, प्रदीप सूर्यवंशी, दिलीप कौशिक आदी उपस्थित होते.
नाभिक समाजबांधवांवर पुन्हा संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 05:00 IST
चामोर्शीच्या तहसीलदारांना निवेदन बुधवारी देण्यात आले. यावेळी तालुका शाखेचे उपाध्यक्ष देविदास पालिकोंडावार, नागन्ना गड्डमवार, भेंडाळा शाखेचे अध्यक्ष घनश्याम पालपल्लीवार आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणू संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सलुनचे दुकाने बंद आहेत. दुकानमालक व तेथील कारागिर बेरोजगार झाले आहेत.
नाभिक समाजबांधवांवर पुन्हा संकट
ठळक मुद्देआर्थिक मदत देण्याची मागणी : कोरोनामुळे तीन महिन्यांपासून केशकर्तनालय पूर्णत: बंद