शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
3
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
4
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
5
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
7
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
8
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
10
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
11
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
12
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
13
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
14
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
15
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
16
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
17
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
18
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
19
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
20
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात

नाभिक समाजबांधवांवर पुन्हा संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 05:00 IST

चामोर्शीच्या तहसीलदारांना निवेदन बुधवारी देण्यात आले. यावेळी तालुका शाखेचे उपाध्यक्ष देविदास पालिकोंडावार, नागन्ना गड्डमवार, भेंडाळा शाखेचे अध्यक्ष घनश्याम पालपल्लीवार आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणू संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सलुनचे दुकाने बंद आहेत. दुकानमालक व तेथील कारागिर बेरोजगार झाले आहेत.

ठळक मुद्देआर्थिक मदत देण्याची मागणी : कोरोनामुळे तीन महिन्यांपासून केशकर्तनालय पूर्णत: बंद

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी/धानोरा : कोरोनाच्या संचारबंदीमुळे चामोर्शी, धानोरा तालुक्यासह जिल्हाभरातील सलुनची दुकाने गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहेत. परिणामी नाभिक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे नाभिक बांधवांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ तालुका शाखा चामोर्शी व धानोराच्या वतीने करण्यात आली आहे.चामोर्शीच्या तहसीलदारांना निवेदन बुधवारी देण्यात आले. यावेळी तालुका शाखेचे उपाध्यक्ष देविदास पालिकोंडावार, नागन्ना गड्डमवार, भेंडाळा शाखेचे अध्यक्ष घनश्याम पालपल्लीवार आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणू संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सलुनचे दुकाने बंद आहेत. दुकानमालक व तेथील कारागिर बेरोजगार झाले आहेत. दरम्यान गडचिरोली जिल्हा कोरोबाबत ग्रीन झोनमध्ये आल्याने नियमात शिथीलता करण्यात आली. त्यानंतर चार ते पाच दिवस दुकान सुरू करण्यात आले. त्यामुळे कारागिर व समाजबांधवांना दिलासा मिळाला होता. मात्र पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळून हा जिल्हा आॅरेंज झोनमध्ये गेल्याने सलुन दुकाने बंद ठेवण्याचा आदेश झळकला. आता गेल्या १० दिवसांपासून सलुनचे दुकाने पूर्णत: बंद आहेत. रोजगाराचे दुसरे साधन नसल्याने सदर व्यवसायक करणारे कारागिर व दुकानदार तसेच नाभिक समाजबांधवांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.धानोरा तालुक्यातील नाभिक समाज व्यावसायिक व कारागिरांना आर्थिक व जीवनावश्यक वस्तूूची मदत देण्यात यावी, अशी मागणी संत नगाजी महाराज सामाजिक सेवा समिती धानोराच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आले आहे. कोरोनामुळे व्यवसाय पूर्णत: बंद असल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. परिणामी कौंटुबीक दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले आहे. परिणामी नाभिक समाजबांधवांचे मानसिक संतुलन ढासळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. निवेदन देताना ज्ञानेश्वर वनस्कर, सूरज सूर्यवंशी, जगदीश सूर्यवंशी, मनोज मेसेरकर, मेघश्याम वनस्कर, राजू सुत्रपवार, महेश चौधरी, संगम सूर्यवंशी, प्रदीप सूर्यवंशी, दिलीप कौशिक आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या