शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षणाचे श्रेय सर्वच पक्षांच्या नेत्यांचे; कृतज्ञता सोहळ्यात भुजबळांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 21:21 IST

Gadchiroli News राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये ओबीसींचे आरक्षण वाढविण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. त्याचे श्रेय माझ्या एकट्याचे नसून महाआघाडीतील सर्वच पक्षांच्या नेत्यांचे आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ना. छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

गडचिरोली : अनेक वर्षांपर्यंत या जिल्ह्यातील ओबीसी बांधवांवर आरक्षणाच्या बाबतीत अन्याय झाला, हे खरे आहे. देशात आणि राज्यात ओबीसींच्या आरक्षणाचा इतिहास महात्मा फुले, शाहू, आंबेडकरांपासून फार जुना आहे. आता राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये ओबीसींचे आरक्षण वाढविण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. त्याचे श्रेय माझ्या एकट्याचे नसून महाआघाडीतील सर्वच पक्षांच्या नेत्यांचे आहे, असे प्रांजळ मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ना. छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. (Credit for OBC reservation goes to leaders of all parties; Bhujbal's candid opinion in the gratitude ceremony)

राज्य सरकारच्या ओबीसी आरक्षणासाठी गठित अभ्यास समितीचे ना. भुजबळ अध्यक्ष होते. त्यामुळे सोमवारी गडचिरोलीत राष्ट्रवादी काँग्रेस, समता परिषदेच्या वतीने कृतज्ञता सोहळ्यात त्यांचा माजी राज्यमंत्री, आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना भलामोठा पुष्पहार घालून आदिवासींची बांबूपासून बनविलेली पारंपरिक टोपी आणि तिर-कमान (धनुष्यबाण) भेट देण्यात आली.

यावेळी बोलताना ना. भुजबळ म्हणाले, २०११ च्या जनगणनेत ओबीसींची गणना व्हावी यासाठी समता परिषद न्यायालयात गेली. भाजप नेते गोपीनाथ मुंडे हेसुद्धा ओबीसी गणनेच्या बाजूने होते. १०० खासदार जाऊन भेटले. प्रणव मुखर्जींनी ओबीसी गणना करण्याचे जाहीरही केले; पण पुढे सोशियो-एकॉनॉमिक सर्व्हे झाला. नंतर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारला त्या डेटाचे विश्लेषण करायचे होते; पण ५ वर्षे त्या कमिटीवर सदस्यच नेमले नाहीत. २०१७ मध्ये एक गृहस्थ न्यायालयात गेले आणि त्यावर स्थगनादेश आला. ओबीसींच्या बाबतीमधील इम्पिरिकल डेटा मिळालाच नाही. आता त्यासाठी पुन्हा आम्ही कोर्टात जाणार आहोत, असे ते म्हणाले.

वेगवेगळ्या केंद्रीय शिक्षण संस्थांमध्ये असलेले आरक्षण २०१७ मध्ये अचानक बंद केले. त्यामुळे २५ हजार विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप भुजबळांनी केला.

यावेळी आ. धर्मरावबाबा यांनी ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम करण्याचा विचार करावा. त्याशिवाय ओबीसी समाज सक्षम होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी प्राचार्य अशोक जीवतोडे, बापूसाहेब भुजबळ, महाज्योतीचे संचालक दिवाकर गमे, राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे, माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, माजी आ. हरिराम वरखडे, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, महिला जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम, कार्याध्यक्ष प्रकाश ताकसांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

१९८५ चे आणि आताचे गडचिरोली यात खूप फरक

यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देताना भुजबळ यांनी आपण शिवसेनेत असताना १९८५ मध्ये पहिल्यांदा गडचिरोलीत आलो होतो. त्यावेळी गडचिरोली खूपच लहान होते. चौकाच्या कॉर्नरला सभा घेतली होती. त्यानंतरही गडचिरोलीत दौरे झाले; पण आताचे आणि त्यावेळचे गडचिरोली यात भरपूर फरक दिसल्याचे ते म्हणाले.

माजी आमदार वरखडे राष्ट्रवादीत

यावेळी शिवसेनेचे आरमोरीचे माजी आमदार हरिराम वरखडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाचा दुपट्टा घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. गेल्या वर्षी त्यांनी ना. विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत ब्रह्मपुरी येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर सोमवारी गडचिरोलीत राष्ट्रवादीचा दुपट्टा घातला. त्यांचे जावई भूषण खंडाते यांना समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बनविण्यात आले.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळ