शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्याच्या माध्यमातून सिंचन सुविधेची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 05:00 IST

शेतीसाठी जमिनीची सुपीकता, अत्याधुनिक कृषी साधने, बी-बियाणे, खते याबरोबरच पाण्याची उपलब्धता अत्यंत महत्वाची आहे. पावसाच्या पाण्यावर खरीप हंगामात वर्षातून एकच पीक घेता येते. मात्र शेतातल्या जमिनीवर पडलेल्या पावसाच्या पाण्याचे सुयोग्य नियोजन करून ते अडविल्यास पावसाळ्यानंतर सुद्धा रब्बी हंगामातील अनेक पिके शेतकऱ्यांना घेता येतात.

ठळक मुद्देदेसाईगंज तालुक्यात चार वर्षात ६० शेततळे पूर्णत्वास; खरीप व रबी दोन्ही हंगामात पिकांसाठी ठरताहेत उपयुक्त

अतुल बुराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत देसाईगंज तालुक्यात ^‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेअंतर्गत २०१६ ते २०२० या चार वर्षाच्या कालावधीत एकूण ६० शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. या संरक्षित सिंचन योजनेमुळे शेतकरी सुखावणार असून उत्पन्न वाढीसाठी त्याचा उपयोग होत आहे.शेतीसाठी जमिनीची सुपीकता, अत्याधुनिक कृषी साधने, बी-बियाणे, खते याबरोबरच पाण्याची उपलब्धता अत्यंत महत्वाची आहे. पावसाच्या पाण्यावर खरीप हंगामात वर्षातून एकच पीक घेता येते. मात्र शेतातल्या जमिनीवर पडलेल्या पावसाच्या पाण्याचे सुयोग्य नियोजन करून ते अडविल्यास पावसाळ्यानंतर सुद्धा रब्बी हंगामातील अनेक पिके शेतकऱ्यांना घेता येतात. धानपिकाला अधिक पाणी लागते. तरीही जिल्ह्यातील शेतकरी जलसिंचनाच्या अत्याधुनिक अशा पद्धतीचा वापर न करता धानपिकाला भरमसाठ पाणी देतात. आवश्यक तेवढेच पाणी धानपिकाला देऊन जास्तीची पाणी शेतात जमा केल्यास तेच पाणी संकटकाळात वापरता येते. ही बाब ओळखून देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागील चार वर्षांत ६० शेततळे बांधून सिंचनाची सोय केली आहे.राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजनेत ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना अमलात आणली. शेतकऱ्यांनी शेततळे घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केले होते. अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या शेततळ्याच्या एकूण ६० कामांना मंजुरी मिळाली. योजनेअंतर्गत २०१६-१७ मध्ये १२, २०१७-१८ मध्ये ३, २०१८-१९ मध्ये सर्वाधिक २९ आणि २०१९-२० मध्ये १६ अशा एकूण ६० शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. शेततळ्यांचे अनुदान मिळाले आहे.मत्स्य व्यवसायाची संधीपाऊस न आल्यास शेततळ्यात साचलेले पाणी पाईप वा नहराद्वारे पिकाला देता येणार आहे. खरीप हंगामाची फसल झाल्यावर शेततळ्यात पाणी शिल्लक राहिल्यास भाजीपाला पिके घेऊन उत्पन्नात भर पाडू शकतो. तर काही शेतकºयांना या शेततळ्यामध्ये मत्स्य व्यवसाय करण्याची संधी यामुळे निर्माण झाली आहे. त्यासाठी पाऊस पडल्यावर पाण्याचा योग्य तो निचरा होऊन शेततळ्यात पाण्याची साठवणूक कशी होईल, याचे नियोजन शेतकऱ्यांना करावे लागणार आहे.सिंचनाची सोय नसलेल्या व निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून पिकांना शेततळ्यातील पाणी फायदेशीर आहे. शेततळ्याच्या माध्यमातून शेतकरी मत्स्यपालन व्यवसायाकडे वळले आहे.आर. एम. वासेकर,कृषी सहाय्यक, विसोराशेततळा बांधल्यामुळे त्यातील पाणी धान पीक शेतीसाठी उपयोगात आले. मत्स्य उत्पादनासाठी मत्स्यबीज सुद्धा टाकले आहे.सुखदेव मुंडले शेतकरी, विसोरा

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प