शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

शेततळ्याच्या माध्यमातून सिंचन सुविधेची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 05:00 IST

शेतीसाठी जमिनीची सुपीकता, अत्याधुनिक कृषी साधने, बी-बियाणे, खते याबरोबरच पाण्याची उपलब्धता अत्यंत महत्वाची आहे. पावसाच्या पाण्यावर खरीप हंगामात वर्षातून एकच पीक घेता येते. मात्र शेतातल्या जमिनीवर पडलेल्या पावसाच्या पाण्याचे सुयोग्य नियोजन करून ते अडविल्यास पावसाळ्यानंतर सुद्धा रब्बी हंगामातील अनेक पिके शेतकऱ्यांना घेता येतात.

ठळक मुद्देदेसाईगंज तालुक्यात चार वर्षात ६० शेततळे पूर्णत्वास; खरीप व रबी दोन्ही हंगामात पिकांसाठी ठरताहेत उपयुक्त

अतुल बुराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत देसाईगंज तालुक्यात ^‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेअंतर्गत २०१६ ते २०२० या चार वर्षाच्या कालावधीत एकूण ६० शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. या संरक्षित सिंचन योजनेमुळे शेतकरी सुखावणार असून उत्पन्न वाढीसाठी त्याचा उपयोग होत आहे.शेतीसाठी जमिनीची सुपीकता, अत्याधुनिक कृषी साधने, बी-बियाणे, खते याबरोबरच पाण्याची उपलब्धता अत्यंत महत्वाची आहे. पावसाच्या पाण्यावर खरीप हंगामात वर्षातून एकच पीक घेता येते. मात्र शेतातल्या जमिनीवर पडलेल्या पावसाच्या पाण्याचे सुयोग्य नियोजन करून ते अडविल्यास पावसाळ्यानंतर सुद्धा रब्बी हंगामातील अनेक पिके शेतकऱ्यांना घेता येतात. धानपिकाला अधिक पाणी लागते. तरीही जिल्ह्यातील शेतकरी जलसिंचनाच्या अत्याधुनिक अशा पद्धतीचा वापर न करता धानपिकाला भरमसाठ पाणी देतात. आवश्यक तेवढेच पाणी धानपिकाला देऊन जास्तीची पाणी शेतात जमा केल्यास तेच पाणी संकटकाळात वापरता येते. ही बाब ओळखून देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागील चार वर्षांत ६० शेततळे बांधून सिंचनाची सोय केली आहे.राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजनेत ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना अमलात आणली. शेतकऱ्यांनी शेततळे घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केले होते. अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या शेततळ्याच्या एकूण ६० कामांना मंजुरी मिळाली. योजनेअंतर्गत २०१६-१७ मध्ये १२, २०१७-१८ मध्ये ३, २०१८-१९ मध्ये सर्वाधिक २९ आणि २०१९-२० मध्ये १६ अशा एकूण ६० शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. शेततळ्यांचे अनुदान मिळाले आहे.मत्स्य व्यवसायाची संधीपाऊस न आल्यास शेततळ्यात साचलेले पाणी पाईप वा नहराद्वारे पिकाला देता येणार आहे. खरीप हंगामाची फसल झाल्यावर शेततळ्यात पाणी शिल्लक राहिल्यास भाजीपाला पिके घेऊन उत्पन्नात भर पाडू शकतो. तर काही शेतकºयांना या शेततळ्यामध्ये मत्स्य व्यवसाय करण्याची संधी यामुळे निर्माण झाली आहे. त्यासाठी पाऊस पडल्यावर पाण्याचा योग्य तो निचरा होऊन शेततळ्यात पाण्याची साठवणूक कशी होईल, याचे नियोजन शेतकऱ्यांना करावे लागणार आहे.सिंचनाची सोय नसलेल्या व निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून पिकांना शेततळ्यातील पाणी फायदेशीर आहे. शेततळ्याच्या माध्यमातून शेतकरी मत्स्यपालन व्यवसायाकडे वळले आहे.आर. एम. वासेकर,कृषी सहाय्यक, विसोराशेततळा बांधल्यामुळे त्यातील पाणी धान पीक शेतीसाठी उपयोगात आले. मत्स्य उत्पादनासाठी मत्स्यबीज सुद्धा टाकले आहे.सुखदेव मुंडले शेतकरी, विसोरा

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प