शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्याच्या माध्यमातून सिंचन सुविधेची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 05:00 IST

शेतीसाठी जमिनीची सुपीकता, अत्याधुनिक कृषी साधने, बी-बियाणे, खते याबरोबरच पाण्याची उपलब्धता अत्यंत महत्वाची आहे. पावसाच्या पाण्यावर खरीप हंगामात वर्षातून एकच पीक घेता येते. मात्र शेतातल्या जमिनीवर पडलेल्या पावसाच्या पाण्याचे सुयोग्य नियोजन करून ते अडविल्यास पावसाळ्यानंतर सुद्धा रब्बी हंगामातील अनेक पिके शेतकऱ्यांना घेता येतात.

ठळक मुद्देदेसाईगंज तालुक्यात चार वर्षात ६० शेततळे पूर्णत्वास; खरीप व रबी दोन्ही हंगामात पिकांसाठी ठरताहेत उपयुक्त

अतुल बुराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत देसाईगंज तालुक्यात ^‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेअंतर्गत २०१६ ते २०२० या चार वर्षाच्या कालावधीत एकूण ६० शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. या संरक्षित सिंचन योजनेमुळे शेतकरी सुखावणार असून उत्पन्न वाढीसाठी त्याचा उपयोग होत आहे.शेतीसाठी जमिनीची सुपीकता, अत्याधुनिक कृषी साधने, बी-बियाणे, खते याबरोबरच पाण्याची उपलब्धता अत्यंत महत्वाची आहे. पावसाच्या पाण्यावर खरीप हंगामात वर्षातून एकच पीक घेता येते. मात्र शेतातल्या जमिनीवर पडलेल्या पावसाच्या पाण्याचे सुयोग्य नियोजन करून ते अडविल्यास पावसाळ्यानंतर सुद्धा रब्बी हंगामातील अनेक पिके शेतकऱ्यांना घेता येतात. धानपिकाला अधिक पाणी लागते. तरीही जिल्ह्यातील शेतकरी जलसिंचनाच्या अत्याधुनिक अशा पद्धतीचा वापर न करता धानपिकाला भरमसाठ पाणी देतात. आवश्यक तेवढेच पाणी धानपिकाला देऊन जास्तीची पाणी शेतात जमा केल्यास तेच पाणी संकटकाळात वापरता येते. ही बाब ओळखून देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागील चार वर्षांत ६० शेततळे बांधून सिंचनाची सोय केली आहे.राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजनेत ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना अमलात आणली. शेतकऱ्यांनी शेततळे घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केले होते. अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या शेततळ्याच्या एकूण ६० कामांना मंजुरी मिळाली. योजनेअंतर्गत २०१६-१७ मध्ये १२, २०१७-१८ मध्ये ३, २०१८-१९ मध्ये सर्वाधिक २९ आणि २०१९-२० मध्ये १६ अशा एकूण ६० शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. शेततळ्यांचे अनुदान मिळाले आहे.मत्स्य व्यवसायाची संधीपाऊस न आल्यास शेततळ्यात साचलेले पाणी पाईप वा नहराद्वारे पिकाला देता येणार आहे. खरीप हंगामाची फसल झाल्यावर शेततळ्यात पाणी शिल्लक राहिल्यास भाजीपाला पिके घेऊन उत्पन्नात भर पाडू शकतो. तर काही शेतकºयांना या शेततळ्यामध्ये मत्स्य व्यवसाय करण्याची संधी यामुळे निर्माण झाली आहे. त्यासाठी पाऊस पडल्यावर पाण्याचा योग्य तो निचरा होऊन शेततळ्यात पाण्याची साठवणूक कशी होईल, याचे नियोजन शेतकऱ्यांना करावे लागणार आहे.सिंचनाची सोय नसलेल्या व निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून पिकांना शेततळ्यातील पाणी फायदेशीर आहे. शेततळ्याच्या माध्यमातून शेतकरी मत्स्यपालन व्यवसायाकडे वळले आहे.आर. एम. वासेकर,कृषी सहाय्यक, विसोराशेततळा बांधल्यामुळे त्यातील पाणी धान पीक शेतीसाठी उपयोगात आले. मत्स्य उत्पादनासाठी मत्स्यबीज सुद्धा टाकले आहे.सुखदेव मुंडले शेतकरी, विसोरा

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प