रांगी : छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजेच नव्हते तर खऱ्या अर्थाने रयतेचे श्रद्धास्थान होते. आईवडिलांची आज्ञा शिरोधार्य मानून हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणली. त्यांनी स्वधर्माबरोबरच इतर धर्माचाही आदर केला. अशा थाेर महापुरुषाचा आदर्श युवकांनी डोळ्यासमोर ठेवून सशक्त धर्मनिरपेक्ष समाजाची निर्मिती करावी, असे प्रतिपादन शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार यांनी केले.
नवी रांगी येथे शुक्रवारी शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने शिवाजी चौकात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी ते बाेलत हाेते. कार्यक्रमात आरमोरीच्या मुख्याधिकारी माधुरी सलामे यांनी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन बलशाली भारताची निर्मिती करण्यास सहकार्य करावे, असे प्रतिपादन केले. तर प्रा. राजू किरमिरे, शशिकांत साळवे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी नवरगावचे ग्रामसचिव के.जी. नेवारे, रांगीचे सचिव वासुदेव बुराडे, सरपंच फालेश्वरी गेडाम, उपसरपंच नूरज हलामी, अर्चना मेश्राम, विद्या कपाट, देवराव कुनघाडकर, अरुण चापले, नरेंद्र भुरसे, प्रा. दादाजी येळणे, श्रीनिवास गणवेनवार, अनिल गणवेनवार, वीणा काटेंगे, किसन आडे, तुळशीराम भुरसे, सुरेश हलामी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष नितीन कावळे तर आभार दिनेश चापले यांनी मानले. यशस्वीतेसाठी डाकराज चापले, आकाश देशपांडे, पराग देशपांडे, अरुण पासांडे, विक्रांत पोलोजवार, गणराज कुनघाडकर, मनोहर रोहणकर, नरेश भुरसे, सुधाकर रोहणकर, पुणेश्र्वर जुवारे, अमर चापले, उमाजी चापले, आकाश चापले, कैलास चापले, भारत रोहणकर, आनंदराव पदा, कुलदीप पदा, रुपेश भुरसे, अनिल चापले यांनी सहकार्य केले.