शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
4
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
5
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
6
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
7
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
8
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
9
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
10
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
11
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
12
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
13
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
14
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
15
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
16
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
17
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
18
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
19
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”

जिमलगट्टा तालुका निर्माण करा

By admin | Updated: October 9, 2015 02:00 IST

अहेरी तालुका मुख्यालयापासून ६० किमी अंतरावर असलेल्या जिमलगट्टा तालुका निर्मितीची मागणी १५ वर्षांपासून शासनस्तराव प्रलंबित आहे.

जिमलगट्टा : अहेरी तालुका मुख्यालयापासून ६० किमी अंतरावर असलेल्या जिमलगट्टा तालुका निर्मितीची मागणी १५ वर्षांपासून शासनस्तराव प्रलंबित आहे. तालुका निर्मिती रखडल्याने या भागातील नागरिकांना ६० ते ७० किमी अंतर कापून अहेरी येथे शासकीय कामांसाठी हेलपाट्या माराव्या लागतात. यात वेळ, पैसा वाया जात असल्याने जिमलगट्टा तालुक्याची निर्मिती करावी, अशी मागणी जिमलगट्टा तालुका संघर्ष समितीच्या वतीने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.जिमलगट्टा येथे मंडळ कार्यालय असून या कार्यालयाअंतर्गत ग्राम पंचायत जिमलगट्टा, वेडमपल्ली, उमानूर, मरपल्ली, रेगुलवाही, गोविंदगाव, किष्टापूर, देचली, पेठा, कोंजेड, रेपनपल्ली, कमलापूर, राजाराम, मांड्रा, दामरंचा, खांदला ग्राम पंचायतींचा समावेश आहे. मंडळ कार्यालयाअंतर्गत एकूण ६७ गावे असून या गावातील एकूण लोकसंख्या ४० ते ५० हजारांच्या आसपास आहे. परिसरातील बहुतांश भाग दुर्गम आहे. लोवा, कल्लेड येथील नागरिकांना १० ते १५ किमीची पायपीट करून बस पकडावी लागते. त्यांना तालुक्याची कामे करताना दोन ते तीन दिवसांचा अवधी लागत असतो. मंडळ कार्यालय, शाळा, महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, विद्युत उपकेंद्र, बँक, वन विभाग, वनविकास महामंडळ कार्यालय, दूरभाष केंद्र आदी महत्त्वपूर्ण कार्यालय या भागात आहेत. ग्रामीण रुग्णालय सुरू करणे, पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करावा, प्राथमिक आरोग्य केंद्रात १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका द्यावी आदी मागण्यांचा समावेश होता. निवेदन देताना पं. स. सदस्य ऋषी पोरतेट, श्रीनिवास गावडे, प्रभाकर यादावार, वहिद पठाण, जयराम आत्राम, मल्लाजी आत्राम, महेश मद्देर्लावार, वसंत पेंदाम, शब्बीर सय्यद, ईश्वर कोठा उपस्थित होते. (वार्ताहर)