शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

विजेच्या धक्क्याने गायी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 23:32 IST

तालुक्यातील लगाम येथील राजे धर्मराव हायस्कूलजवळ असलेल्या विजेच्या खांबावरील इन्सुलेटर तुटल्याने विजेचा धक्का लागून दोन गायी ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता घडली.

ठळक मुद्देलगाम येथील घटना : इन्सुलेटर तुटल्याने झाला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : तालुक्यातील लगाम येथील राजे धर्मराव हायस्कूलजवळ असलेल्या विजेच्या खांबावरील इन्सुलेटर तुटल्याने विजेचा धक्का लागून दोन गायी ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता घडली.लगाम येथील राजे धर्मराव हायस्कूलजवळ असलेले वीज खांब मागील एक वर्षापासून तुटले होते. वीज खांब तुटले असल्याने वीज कर्मचारी खांबावर चढत नव्हते. इन्सुलेटरही काही प्रमाणात तुटले होते. मात्र खांबावरच चढता येत नसल्याने वीज कर्मचारी इन्सुलेटरही बदलवित नव्हते. सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक इन्सुलेटर जमिनीवर साचलेल्या पाण्यात पडले. इन्सुलेटर पडल्याने पाण्यात प्रवाह सुरू होता. गायी जाताच त्यांना विजेचा धक्का लागून मृत्यूमुखी पडल्या. घटनास्थळ हे गावातच आहे. मात्र सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही. ठार झालेल्या गायी नरेंद्र मडावी व गजानन शेडमाके यांच्या मालकीच्या आहेत. पोलीस पाटील किरमा मडावी यांनी घटनेचा पंचनामा केला.तुटलेला खांब बदलवावा, याबाबत गावकऱ्यांनी अनेकवेळा स्थानिक कर्मचाºयांना विनंती केली होती. मात्र वीज कर्मचारी व अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केले. यासाठी जबाबदार असलेल्या वीज कर्मचाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी गावकºयांनी केली आहे. त्याचबरोबर संबंधित लाईनमनच्या वेतनातून कपात करून पशुपालकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गावकºयांनी केली आहे.बेजूर येथे वाघाच्या हल्ल्यात गाय ठारतालुका मुख्यालयापासून आठ किमी अंतरावर असलेल्या बेजूर जंगल परिसरात वाघाने गायवर हल्ला केला. यात गाय ठार झाली. सदर घटना शनिवारी घडली. सदर गाय सैनु दुर्वा यांच्या मालकीची आहे. पशुपालकाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे. जंगल परिसरात वाघ आढळल्याने बेजूरवासीयांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.