शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

विजेच्या धक्क्याने गायी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 23:32 IST

तालुक्यातील लगाम येथील राजे धर्मराव हायस्कूलजवळ असलेल्या विजेच्या खांबावरील इन्सुलेटर तुटल्याने विजेचा धक्का लागून दोन गायी ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता घडली.

ठळक मुद्देलगाम येथील घटना : इन्सुलेटर तुटल्याने झाला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : तालुक्यातील लगाम येथील राजे धर्मराव हायस्कूलजवळ असलेल्या विजेच्या खांबावरील इन्सुलेटर तुटल्याने विजेचा धक्का लागून दोन गायी ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता घडली.लगाम येथील राजे धर्मराव हायस्कूलजवळ असलेले वीज खांब मागील एक वर्षापासून तुटले होते. वीज खांब तुटले असल्याने वीज कर्मचारी खांबावर चढत नव्हते. इन्सुलेटरही काही प्रमाणात तुटले होते. मात्र खांबावरच चढता येत नसल्याने वीज कर्मचारी इन्सुलेटरही बदलवित नव्हते. सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक इन्सुलेटर जमिनीवर साचलेल्या पाण्यात पडले. इन्सुलेटर पडल्याने पाण्यात प्रवाह सुरू होता. गायी जाताच त्यांना विजेचा धक्का लागून मृत्यूमुखी पडल्या. घटनास्थळ हे गावातच आहे. मात्र सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही. ठार झालेल्या गायी नरेंद्र मडावी व गजानन शेडमाके यांच्या मालकीच्या आहेत. पोलीस पाटील किरमा मडावी यांनी घटनेचा पंचनामा केला.तुटलेला खांब बदलवावा, याबाबत गावकऱ्यांनी अनेकवेळा स्थानिक कर्मचाºयांना विनंती केली होती. मात्र वीज कर्मचारी व अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केले. यासाठी जबाबदार असलेल्या वीज कर्मचाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी गावकºयांनी केली आहे. त्याचबरोबर संबंधित लाईनमनच्या वेतनातून कपात करून पशुपालकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गावकºयांनी केली आहे.बेजूर येथे वाघाच्या हल्ल्यात गाय ठारतालुका मुख्यालयापासून आठ किमी अंतरावर असलेल्या बेजूर जंगल परिसरात वाघाने गायवर हल्ला केला. यात गाय ठार झाली. सदर घटना शनिवारी घडली. सदर गाय सैनु दुर्वा यांच्या मालकीची आहे. पशुपालकाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे. जंगल परिसरात वाघ आढळल्याने बेजूरवासीयांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.