शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

लघु व्यवसायिकांना कोरोनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 23:28 IST

कोरोना विषाूणचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने सर्व धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले. त्याचा भेट परिणाम, छायाचित्रकार, मंडप, बॅडवाले, स्वयंपाकी, डॉल्बी, मंगल कार्यालय, टेलर, लग्न पत्रिका छापणारे आदी व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. यासाठी कामाला लागणाऱ्या मजुरांवर संक्रात ओढवली आहे.

ठळक मुद्देबँण्ड पथकांवर उपासमारीची वेळ : विवाह मुहूर्त लांबणीवर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशात कोरोना विषाणूने थैमान घातल्याने जिल्ह्यातील अनेके लघू व्यवसायिक संकटात सापडले आहेत. विशेषत: उन्हाळ्यात लग्न सोहळे व इतर मुहूर्तावर अवलंबून असणारे कारागीर आणि कामगार हवालदिल झाले आहे. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात लग्नसमारंभ असतात. मात्र, यावर्षी बरेच सोहळे लांबणीवर पडले किंवा रद्द झाले. त्यामुळे विविध व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला आहे.कोरोना विषाूणचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने सर्व धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले. त्याचा भेट परिणाम, छायाचित्रकार, मंडप, बॅडवाले, स्वयंपाकी, डॉल्बी, मंगल कार्यालय, टेलर, लग्न पत्रिका छापणारे आदी व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. यासाठी कामाला लागणाऱ्या मजुरांवर संक्रात ओढवली आहे.सध्या २१ दिवसांचे लॉकडाऊ उन असल्याने व्यवसाय व उद्योगांना टाळे लागले आहे. मंगल कार्यालय एरव्ही वºहाडी मंडळींच्या उत्सवी थाटात गजबजून जाते. मात्र कोरोनामुळे मंगल कार्यालयामध्ये कमालीचा सन्नाटा दिसून येत आहे. कोरोनापासून खबरदारी म्हणून अनेकांनी विवाह सोहळे पुढे ढकलले आहे. या हंगामात वधू- वरांपासून ते वºहाडी मंडळीसाठी रेडीमेड कपडे खरेदी केली जातात. अहेर म्हणून साड्या व इतर वस्तू खरेदी केल्या जातात. मात्र कोरोनामुळे व्यवसाय ठप्प पडल्याने कापड दुकानावर व रेडीमेड कपडे विक्रेते हतबल झाल्याचे कापडे व्यापारी सांगत आहे. लॉकडाऊनमुळे प्रशासनाने मंगल कार्यालय बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे सर्व लग्न सोहळ्याच्या तारखा रद्द करण्यात आले. जूनपर्यंत सभागृहामध्ये कोणतेही सोहळे होणार नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. तर छायाचित्रकारांवर उपासमारीची वेळ आल्याचे छायाचित्रकारांनी ‘लोकमत’ला सांगितले.ऐन हंगामात डेकोरेशन व्यावसायिक अडचणीतमंडळ डेकोरेशनचा व्यवसायकही अडचणीत सापडला आहे. यंदा जून महिन्यापर्यंत लग्नतिथी होत्या. मात्र ऐन लग्नसराईच्या काळात कोरोना अवतरला. देशात लॉकडाऊ न करावे लागले. सर्वच धार्मिक कार्यक्रम लग्नसोहळे व इतर कार्यक्रम रद्द झाले आहे. आता काम नसल्याने मजुरांसह मंडप व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ ओढवल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतातच पडूनउन्हाळ्यातील लग्न सोहळा लक्षात घेवून शेतकरीसुध्दा मोठ्या प्रमाणात उन्हाळी भाजीपाल्याची लागवड करतात. यावर्षीही अनेक शेतकºयांनी खरीप हंगाम हातचा गेल्यामुळे रबी हंगामात भाजीपाल्याची लागवड केली. मात्र कोरोनामुळे वाहतुकीस बंदी असल्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतातच सडत आहे. शेतातून भाजीपाला शहरात नेण्यासाठी वाहन उपलब्ध होत नसल्याने शेतकरीसुध्दा त्रस्त आहे. कोरोनाचाही त्यांना आर्थिक फटका बसला आहे.

टॅग्स :businessव्यवसायcorona virusकोरोना वायरस बातम्या