शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

लघु व्यवसायिकांना कोरोनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 23:28 IST

कोरोना विषाूणचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने सर्व धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले. त्याचा भेट परिणाम, छायाचित्रकार, मंडप, बॅडवाले, स्वयंपाकी, डॉल्बी, मंगल कार्यालय, टेलर, लग्न पत्रिका छापणारे आदी व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. यासाठी कामाला लागणाऱ्या मजुरांवर संक्रात ओढवली आहे.

ठळक मुद्देबँण्ड पथकांवर उपासमारीची वेळ : विवाह मुहूर्त लांबणीवर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशात कोरोना विषाणूने थैमान घातल्याने जिल्ह्यातील अनेके लघू व्यवसायिक संकटात सापडले आहेत. विशेषत: उन्हाळ्यात लग्न सोहळे व इतर मुहूर्तावर अवलंबून असणारे कारागीर आणि कामगार हवालदिल झाले आहे. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात लग्नसमारंभ असतात. मात्र, यावर्षी बरेच सोहळे लांबणीवर पडले किंवा रद्द झाले. त्यामुळे विविध व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला आहे.कोरोना विषाूणचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने सर्व धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले. त्याचा भेट परिणाम, छायाचित्रकार, मंडप, बॅडवाले, स्वयंपाकी, डॉल्बी, मंगल कार्यालय, टेलर, लग्न पत्रिका छापणारे आदी व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. यासाठी कामाला लागणाऱ्या मजुरांवर संक्रात ओढवली आहे.सध्या २१ दिवसांचे लॉकडाऊ उन असल्याने व्यवसाय व उद्योगांना टाळे लागले आहे. मंगल कार्यालय एरव्ही वºहाडी मंडळींच्या उत्सवी थाटात गजबजून जाते. मात्र कोरोनामुळे मंगल कार्यालयामध्ये कमालीचा सन्नाटा दिसून येत आहे. कोरोनापासून खबरदारी म्हणून अनेकांनी विवाह सोहळे पुढे ढकलले आहे. या हंगामात वधू- वरांपासून ते वºहाडी मंडळीसाठी रेडीमेड कपडे खरेदी केली जातात. अहेर म्हणून साड्या व इतर वस्तू खरेदी केल्या जातात. मात्र कोरोनामुळे व्यवसाय ठप्प पडल्याने कापड दुकानावर व रेडीमेड कपडे विक्रेते हतबल झाल्याचे कापडे व्यापारी सांगत आहे. लॉकडाऊनमुळे प्रशासनाने मंगल कार्यालय बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे सर्व लग्न सोहळ्याच्या तारखा रद्द करण्यात आले. जूनपर्यंत सभागृहामध्ये कोणतेही सोहळे होणार नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. तर छायाचित्रकारांवर उपासमारीची वेळ आल्याचे छायाचित्रकारांनी ‘लोकमत’ला सांगितले.ऐन हंगामात डेकोरेशन व्यावसायिक अडचणीतमंडळ डेकोरेशनचा व्यवसायकही अडचणीत सापडला आहे. यंदा जून महिन्यापर्यंत लग्नतिथी होत्या. मात्र ऐन लग्नसराईच्या काळात कोरोना अवतरला. देशात लॉकडाऊ न करावे लागले. सर्वच धार्मिक कार्यक्रम लग्नसोहळे व इतर कार्यक्रम रद्द झाले आहे. आता काम नसल्याने मजुरांसह मंडप व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ ओढवल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतातच पडूनउन्हाळ्यातील लग्न सोहळा लक्षात घेवून शेतकरीसुध्दा मोठ्या प्रमाणात उन्हाळी भाजीपाल्याची लागवड करतात. यावर्षीही अनेक शेतकºयांनी खरीप हंगाम हातचा गेल्यामुळे रबी हंगामात भाजीपाल्याची लागवड केली. मात्र कोरोनामुळे वाहतुकीस बंदी असल्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतातच सडत आहे. शेतातून भाजीपाला शहरात नेण्यासाठी वाहन उपलब्ध होत नसल्याने शेतकरीसुध्दा त्रस्त आहे. कोरोनाचाही त्यांना आर्थिक फटका बसला आहे.

टॅग्स :businessव्यवसायcorona virusकोरोना वायरस बातम्या