शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

ओबीसी महामोर्चाला कोरोनाने लावला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:09 IST

ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे, जातनिहाय जनगणना करावी, ओबीसींसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात यावे आदी मागण्यांसाठी २२ फेब्रुवारी राेजी माेर्चा ...

ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे, जातनिहाय जनगणना करावी, ओबीसींसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात यावे आदी मागण्यांसाठी २२ फेब्रुवारी राेजी माेर्चा काढण्याचे निश्चित करण्यात आले हाेते. माेर्चाच्या माध्यमातून सरकारला ओबीसींची ताकद दाखवायची असल्याने माेर्चाला लाखांच्या जवळपास नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता होती. त्यासाठी मागील एक महिन्यापासून तयारी सुरू हाेती. गावागावांत बैठका घेतल्या जात हाेत्या. ओबीसी समाजासाेबतच इतरही समाज संघटनांनी या माेर्चाला पाठिंबा दर्शविल्याने माेर्चाची ताकद आणखी वाढली. बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार, क्रीडामंत्री सुनील केदार, काॅंगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले, खा. अशोक नेते, चंद्रपूरचे खासदार बाळू धानाेरकर, आ. प्रतिभा धानाेरकर, आ. कृष्णा गजबे आदी अनेक नेत्यांनी पाठिंबा दर्शवून माेर्चात सहभागी हाेण्याचे आश्वासन दिले हाेते.

एकीकडे माेर्चाची तयारी जाेरात सुरू असताना दुसरीकडे काेराेनाचे रुग्णही वाढत आहेत. सक्रिय काेराेना रुग्णांची संख्या ५९ वर पाेहाेचली आहे. काेराेनाचे नवीन बाधित प्रामुख्याने गडचिराेली शहरातच आढळून येत आहेत. त्यामुळे माेर्चासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना काेराेनाची लागण हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. काेराेना प्रतिबंधाचे नियम पाळून माेर्चा काढला जाईल, असे आयाेजकांकडून सांगितले जात असले, तरी हजाराेंच्या संख्येत माेर्चेकरी सहभागी हाेणार असल्याने नियम पाळणे अशक्य असल्याची जाणीव आयाेजकांना झाली. त्यामुळे माेर्चा काढावा की नाही याबाबत संदिग्धता वाढत चालली हाेती.

माेर्चाला जिल्हाभरातून समाजबांधव आणण्याची जबाबदारी तालुकास्तरावरील समन्वय समित्यांवर साेपविली हाेती. त्यामुळे माेर्चाबाबत निर्णय घेताना त्यांचेही मत विश्वासात घेणे आवश्यक हाेते. त्यांनी कळविलेल्या निर्णयावरून माेर्चा पुढे ढकलण्याचा निर्णय जिल्हास्तरीय समितीने शनिवारी रात्री घेतला.

बाॅक्स

माेर्चाबाबत हे आहेत वेगवेगळे मतप्रवाह

ज्या गडचिराेली शहरात माेर्चा निघणार आहे, त्याच शहरात मागील आठ दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. माेर्चामुळे काेराेनाचा उद्रेक झाल्यास याचे खापर आयाेजकांवर फोडले जाण्याची शक्यता होती. दि.२२ ला माेर्चा काढल्यानंतर ओबीसींच्या मागण्या दुसऱ्याच दिवशी पूर्ण हाेतील असे नाही. त्यासाठी अनेक दिवस लढा द्यावा लागणार आहे. त्यामुळे आता घिसाडघाई करण्यात काहीच अर्थ नाही. माेर्चा पुढेही काढता येईल, पण काेणाच्याही आरोग्याशी खेळणे योग्य नाही, असा एक मतप्रवाह पुढे आला. मागील महिनाभरापासून माेर्चाची तयारी सुरू आहे. शेवटच्या गावापर्यंत जागृती करण्यात आल्याने नागरिक काेराेनालाही न घाबरता माेर्चात सहभागी हाेण्यास तयार हाेते. त्या नागरिकांचा मात्र हिरमाेड हाेईल, असे काहींचे मत आहे.