शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना @ 25

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:01 IST

राज्यात सर्वाधिक काळ ग्रीन झोनमध्ये राहिलेल्या गडचिरोलीत गेल्या सोमवारी (दि.१८) पहिल्यांदा ५ रुग्णांची नोंद झाली. तेव्हापासून रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. हे सर्व रुग्ण जिल्ह्यातीलच रहिवासी असले तरी ते मुंबई-पुणे येथे विविध कामकाजावर मजूर म्हणून गेले होते. तेथून एकत्रितपणे येतानाच त्यांना कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देएकाच दिवशी १० जणांची भर : दक्षिण भागातील तीन तालुक्यात कोरोनाचा शिरकाव

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये १० जणांची भर पडली. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता २५ वर गेली आहे. या १० जणांमध्ये एटापल्ली तालुक्यातील ९ तर एक जण भामरागड तालुक्याचा असल्याचे समजते. हे रुग्ण मुंबईवरून आलेले असून ते विलगिकरण कक्षात होते. रविवारी रात्री अहेरीतील विलगिकरण कक्षात असलेल्या २ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तीन तालुक्यात कोरोनाने शिरकाव केल्याने आरोग्य प्रशासन सतर्क झाले असून त्याचा फैलाव रोखण्याचे आव्हान यंत्रणेपुढे उभे ठाकले आहे.राज्यात सर्वाधिक काळ ग्रीन झोनमध्ये राहिलेल्या गडचिरोलीत गेल्या सोमवारी (दि.१८) पहिल्यांदा ५ रुग्णांची नोंद झाली. तेव्हापासून रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. हे सर्व रुग्ण जिल्ह्यातीलच रहिवासी असले तरी ते मुंबई-पुणे येथे विविध कामकाजावर मजूर म्हणून गेले होते. तेथून एकत्रितपणे येतानाच त्यांना कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता आहे. जिल्ह्यात दाखल होताच त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी संस्थात्मक विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले. सुरूवातीला चामोर्शी, कुरखेडा, आरमोरीनंतर रविवारी अहेरी आणि मंगळवारी एटापल्ली येथील विलगिकरणातील लोक पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आल्यामुळे आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे.आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात आढळलेले सर्व २५ रुग्ण हे मुंबई आणि पुण्यावरून आलेले असले तरी ते ग्रामीण भागातीलच रहिवासी आहेत. ते संस्थात्मक विलगीकरणात असल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी झाली. पण अनेक मजूरवर्ग पायी चालत आल्याने प्रशासनाला माहिती न देता आपल्या घरी पोहोचला आहे. त्यांच्यात जर कोरोना पॉझिटिव्ह असेल तर कोरोना फैलाव पसरण्यापासून कसा रोखणार याचे आव्हान प्रशासनापुढे निर्माण झाले आहे.गेल्या आठवडाभरापासून रेड झोनमधून आलेल्या सर्वच लोकांना संस्थात्मक विलगिकरणात ठेवले जात आहे. त्यांतील बहुतांश लोकांचे स्वॅब नमुने परीक्षणासाठी घेतले आहेत. अजूनही नमुने घेणे सुरूच आहे. विशेष म्हणजे बाहेरून आलेल्या संशयित प्रवाशांचा शोध घेऊन त्यांना ठिकठिकाणच्या विलगिकरण कक्षात आणणे सुरूच आहे. सोमवारी ३९६ लोकांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले.५१२ जणांचे अहवाल येणे बाकीजिल्ह्यात १२५९ संभावित रुग्ण आहेत. त्यापैकी ७२२ लोक निरीक्षणाखाली असून २५ जण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत. आतापर्यंत ११६४ लोकांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले. त्यापैकी ६८७ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर २५ पॉझिटिव्ह आले आहेत. अजून ५१३ जणांचे अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे त्यांच्यापैकी किती लोक पॉझिटिव्ह आहेत आणि किती निगेटिव्ह यावर जिल्ह्यात किती प्रमाणात कोरोनाचा फैलाव झाला हे स्पष्ट होणार आहे.एटापल्लीत ९ रुग्णांमुळे खळबळएटापल्ली : येथील शासकीय आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतिगृह तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था अशा तीन ठिकाणी विलगीकरण कक्ष आहेत. या तिन्ही विलगीकरण कक्षात ७० पुरूष व २१ महिला आहेत. विलगिकरण कक्षात असलेले बहुतांश नागरिक पुणे, मुंबई, औरंगाबाद व इतर राज्यातील रेडझोनमधून आली आहेत. २२ मे रोजी ४० जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी एकाच दिवशी नऊ नमुने पॉझिटीव्ह आल्याने एटापल्ली येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. एटापल्लीतील ९ आणि भामरागडचा १ असे १० जण येथे होते. त्यात ७ पुरूष आणि ३ महिला आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या