शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

कोरोना @ 25

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:01 IST

राज्यात सर्वाधिक काळ ग्रीन झोनमध्ये राहिलेल्या गडचिरोलीत गेल्या सोमवारी (दि.१८) पहिल्यांदा ५ रुग्णांची नोंद झाली. तेव्हापासून रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. हे सर्व रुग्ण जिल्ह्यातीलच रहिवासी असले तरी ते मुंबई-पुणे येथे विविध कामकाजावर मजूर म्हणून गेले होते. तेथून एकत्रितपणे येतानाच त्यांना कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देएकाच दिवशी १० जणांची भर : दक्षिण भागातील तीन तालुक्यात कोरोनाचा शिरकाव

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये १० जणांची भर पडली. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता २५ वर गेली आहे. या १० जणांमध्ये एटापल्ली तालुक्यातील ९ तर एक जण भामरागड तालुक्याचा असल्याचे समजते. हे रुग्ण मुंबईवरून आलेले असून ते विलगिकरण कक्षात होते. रविवारी रात्री अहेरीतील विलगिकरण कक्षात असलेल्या २ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तीन तालुक्यात कोरोनाने शिरकाव केल्याने आरोग्य प्रशासन सतर्क झाले असून त्याचा फैलाव रोखण्याचे आव्हान यंत्रणेपुढे उभे ठाकले आहे.राज्यात सर्वाधिक काळ ग्रीन झोनमध्ये राहिलेल्या गडचिरोलीत गेल्या सोमवारी (दि.१८) पहिल्यांदा ५ रुग्णांची नोंद झाली. तेव्हापासून रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. हे सर्व रुग्ण जिल्ह्यातीलच रहिवासी असले तरी ते मुंबई-पुणे येथे विविध कामकाजावर मजूर म्हणून गेले होते. तेथून एकत्रितपणे येतानाच त्यांना कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता आहे. जिल्ह्यात दाखल होताच त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी संस्थात्मक विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले. सुरूवातीला चामोर्शी, कुरखेडा, आरमोरीनंतर रविवारी अहेरी आणि मंगळवारी एटापल्ली येथील विलगिकरणातील लोक पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आल्यामुळे आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे.आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात आढळलेले सर्व २५ रुग्ण हे मुंबई आणि पुण्यावरून आलेले असले तरी ते ग्रामीण भागातीलच रहिवासी आहेत. ते संस्थात्मक विलगीकरणात असल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी झाली. पण अनेक मजूरवर्ग पायी चालत आल्याने प्रशासनाला माहिती न देता आपल्या घरी पोहोचला आहे. त्यांच्यात जर कोरोना पॉझिटिव्ह असेल तर कोरोना फैलाव पसरण्यापासून कसा रोखणार याचे आव्हान प्रशासनापुढे निर्माण झाले आहे.गेल्या आठवडाभरापासून रेड झोनमधून आलेल्या सर्वच लोकांना संस्थात्मक विलगिकरणात ठेवले जात आहे. त्यांतील बहुतांश लोकांचे स्वॅब नमुने परीक्षणासाठी घेतले आहेत. अजूनही नमुने घेणे सुरूच आहे. विशेष म्हणजे बाहेरून आलेल्या संशयित प्रवाशांचा शोध घेऊन त्यांना ठिकठिकाणच्या विलगिकरण कक्षात आणणे सुरूच आहे. सोमवारी ३९६ लोकांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले.५१२ जणांचे अहवाल येणे बाकीजिल्ह्यात १२५९ संभावित रुग्ण आहेत. त्यापैकी ७२२ लोक निरीक्षणाखाली असून २५ जण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत. आतापर्यंत ११६४ लोकांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले. त्यापैकी ६८७ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर २५ पॉझिटिव्ह आले आहेत. अजून ५१३ जणांचे अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे त्यांच्यापैकी किती लोक पॉझिटिव्ह आहेत आणि किती निगेटिव्ह यावर जिल्ह्यात किती प्रमाणात कोरोनाचा फैलाव झाला हे स्पष्ट होणार आहे.एटापल्लीत ९ रुग्णांमुळे खळबळएटापल्ली : येथील शासकीय आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतिगृह तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था अशा तीन ठिकाणी विलगीकरण कक्ष आहेत. या तिन्ही विलगीकरण कक्षात ७० पुरूष व २१ महिला आहेत. विलगिकरण कक्षात असलेले बहुतांश नागरिक पुणे, मुंबई, औरंगाबाद व इतर राज्यातील रेडझोनमधून आली आहेत. २२ मे रोजी ४० जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी एकाच दिवशी नऊ नमुने पॉझिटीव्ह आल्याने एटापल्ली येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. एटापल्लीतील ९ आणि भामरागडचा १ असे १० जण येथे होते. त्यात ७ पुरूष आणि ३ महिला आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या