शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

कोरोना @ 25

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:01 IST

राज्यात सर्वाधिक काळ ग्रीन झोनमध्ये राहिलेल्या गडचिरोलीत गेल्या सोमवारी (दि.१८) पहिल्यांदा ५ रुग्णांची नोंद झाली. तेव्हापासून रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. हे सर्व रुग्ण जिल्ह्यातीलच रहिवासी असले तरी ते मुंबई-पुणे येथे विविध कामकाजावर मजूर म्हणून गेले होते. तेथून एकत्रितपणे येतानाच त्यांना कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देएकाच दिवशी १० जणांची भर : दक्षिण भागातील तीन तालुक्यात कोरोनाचा शिरकाव

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये १० जणांची भर पडली. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता २५ वर गेली आहे. या १० जणांमध्ये एटापल्ली तालुक्यातील ९ तर एक जण भामरागड तालुक्याचा असल्याचे समजते. हे रुग्ण मुंबईवरून आलेले असून ते विलगिकरण कक्षात होते. रविवारी रात्री अहेरीतील विलगिकरण कक्षात असलेल्या २ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तीन तालुक्यात कोरोनाने शिरकाव केल्याने आरोग्य प्रशासन सतर्क झाले असून त्याचा फैलाव रोखण्याचे आव्हान यंत्रणेपुढे उभे ठाकले आहे.राज्यात सर्वाधिक काळ ग्रीन झोनमध्ये राहिलेल्या गडचिरोलीत गेल्या सोमवारी (दि.१८) पहिल्यांदा ५ रुग्णांची नोंद झाली. तेव्हापासून रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. हे सर्व रुग्ण जिल्ह्यातीलच रहिवासी असले तरी ते मुंबई-पुणे येथे विविध कामकाजावर मजूर म्हणून गेले होते. तेथून एकत्रितपणे येतानाच त्यांना कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता आहे. जिल्ह्यात दाखल होताच त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी संस्थात्मक विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले. सुरूवातीला चामोर्शी, कुरखेडा, आरमोरीनंतर रविवारी अहेरी आणि मंगळवारी एटापल्ली येथील विलगिकरणातील लोक पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आल्यामुळे आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे.आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात आढळलेले सर्व २५ रुग्ण हे मुंबई आणि पुण्यावरून आलेले असले तरी ते ग्रामीण भागातीलच रहिवासी आहेत. ते संस्थात्मक विलगीकरणात असल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी झाली. पण अनेक मजूरवर्ग पायी चालत आल्याने प्रशासनाला माहिती न देता आपल्या घरी पोहोचला आहे. त्यांच्यात जर कोरोना पॉझिटिव्ह असेल तर कोरोना फैलाव पसरण्यापासून कसा रोखणार याचे आव्हान प्रशासनापुढे निर्माण झाले आहे.गेल्या आठवडाभरापासून रेड झोनमधून आलेल्या सर्वच लोकांना संस्थात्मक विलगिकरणात ठेवले जात आहे. त्यांतील बहुतांश लोकांचे स्वॅब नमुने परीक्षणासाठी घेतले आहेत. अजूनही नमुने घेणे सुरूच आहे. विशेष म्हणजे बाहेरून आलेल्या संशयित प्रवाशांचा शोध घेऊन त्यांना ठिकठिकाणच्या विलगिकरण कक्षात आणणे सुरूच आहे. सोमवारी ३९६ लोकांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले.५१२ जणांचे अहवाल येणे बाकीजिल्ह्यात १२५९ संभावित रुग्ण आहेत. त्यापैकी ७२२ लोक निरीक्षणाखाली असून २५ जण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत. आतापर्यंत ११६४ लोकांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले. त्यापैकी ६८७ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर २५ पॉझिटिव्ह आले आहेत. अजून ५१३ जणांचे अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे त्यांच्यापैकी किती लोक पॉझिटिव्ह आहेत आणि किती निगेटिव्ह यावर जिल्ह्यात किती प्रमाणात कोरोनाचा फैलाव झाला हे स्पष्ट होणार आहे.एटापल्लीत ९ रुग्णांमुळे खळबळएटापल्ली : येथील शासकीय आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतिगृह तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था अशा तीन ठिकाणी विलगीकरण कक्ष आहेत. या तिन्ही विलगीकरण कक्षात ७० पुरूष व २१ महिला आहेत. विलगिकरण कक्षात असलेले बहुतांश नागरिक पुणे, मुंबई, औरंगाबाद व इतर राज्यातील रेडझोनमधून आली आहेत. २२ मे रोजी ४० जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी एकाच दिवशी नऊ नमुने पॉझिटीव्ह आल्याने एटापल्ली येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. एटापल्लीतील ९ आणि भामरागडचा १ असे १० जण येथे होते. त्यात ७ पुरूष आणि ३ महिला आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या