शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: वडाळा, हिंदमाता, दादर टीटीसह मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले; वाहतूक मंदावली
2
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
3
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
4
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
5
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
6
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
7
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
8
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
9
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
10
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
11
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
12
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
13
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
14
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
15
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
16
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
17
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
18
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
19
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
20
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

लढा देण्याचा स्वयंपाकींचा निर्धार

By admin | Updated: June 8, 2014 23:53 IST

राष्ट्रीय शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांसाठी दुपारचे जेवण बनविणार्‍या स्वयंपाकी महिलांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. आपल्या न्याय मागण्यांसाठी तीव्र लढा उभारण्याचा निर्धार

१५ व १६ जूनला मोर्चा : शालेय पोषण आहार बनविणार्‍या महिलांचे प्रश्नकुरखेडा : राष्ट्रीय शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांसाठी दुपारचे जेवण बनविणार्‍या स्वयंपाकी महिलांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. आपल्या न्याय मागण्यांसाठी तीव्र लढा उभारण्याचा निर्धार कुरखेडा येथील पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या सभेमध्ये करण्यात आला. १५ व १६ जूनला मंत्रालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले.कुपोषणाचे प्रमाण कमी करून विद्यार्थ्यांना शाळेविषयी आवड निर्माण व्हावी, शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी शासनाने शालेय पोषण आहार ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत स्वयंपाक बनविण्याचे काम गावातील महिलांना दिले जाते. शेकडो विद्यार्थ्यांच्या भोजनाची जबाबदारी उचलणार्‍या महिलांना अत्यंत कमी मोबदला दिला जातो. मोबदल्यामध्ये वाढ करावी, त्याचबरोबर त्यांना इतरही सोयी-सुविधा देण्यात याव्या, यासाठी मागील अनेक वर्षांंपासून स्वयंपाकी महिलांनी आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र शासनाने याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. स्वयंपाकी महिलेला दिवसाकाठी केवळ २0 ते ३0 रूपये मजुरी पडते. रोहयोची मजुरी १५0 रूपयाच्यावर असतांनाही स्वयंपाकी महिलांना मात्र २0 ते ३0 रूपयातच समाधान मानावे लागत आहे. कमी मजुरीमुळे बहुतांश गावांमध्ये शालेय आहार बनविण्यास महिला तयार होत नाही. अशी परिस्थिती असतांनाही शालेय पोषण आहार योजना सुरू झाली. तेव्हापासून काही महिला मात्र सातत्याने काम करीत आहेत. आयटकच्यावतीने शालेय पोषण आहार शिजविणार्‍या महिलांचा नुकताच मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला तालुक्यातील सर्वच शालेय पोषण आहार शिजविणार्‍या महिला उपस्थित होत्या. मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयटकचे कार्याध्यक्ष प्रा. रमेश कोरचा, शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद झोडगे, विमल बर्डे, संगीता सोनटक्के, तालुकाध्यक्ष निर्मला साखरे आदी उपस्थित होते. मेळाव्यात शालेय पोषण आहार कर्मचार्‍यांना चपराशी कम कुक पदावर नियुक्त करावे, महिन्याकाठी किमान १0 हजार रूपये वेतन देण्यात यावे, २६ फेब्रुवारीचा जीआर रद्द करण्यात यावा, या कर्मचार्‍यांना कायम करण्यात यावे आदी मागण्यांसाठी तीव्र लढा उभारण्याचे ठरविण्यात आले. यासाठी १५ व १६ जून रोजी मंत्रालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चात अंगणवाडी महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  (तालुका प्रतिनिधी)