शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

लढा देण्याचा स्वयंपाकींचा निर्धार

By admin | Updated: June 8, 2014 23:53 IST

राष्ट्रीय शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांसाठी दुपारचे जेवण बनविणार्‍या स्वयंपाकी महिलांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. आपल्या न्याय मागण्यांसाठी तीव्र लढा उभारण्याचा निर्धार

१५ व १६ जूनला मोर्चा : शालेय पोषण आहार बनविणार्‍या महिलांचे प्रश्नकुरखेडा : राष्ट्रीय शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांसाठी दुपारचे जेवण बनविणार्‍या स्वयंपाकी महिलांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. आपल्या न्याय मागण्यांसाठी तीव्र लढा उभारण्याचा निर्धार कुरखेडा येथील पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या सभेमध्ये करण्यात आला. १५ व १६ जूनला मंत्रालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले.कुपोषणाचे प्रमाण कमी करून विद्यार्थ्यांना शाळेविषयी आवड निर्माण व्हावी, शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी शासनाने शालेय पोषण आहार ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत स्वयंपाक बनविण्याचे काम गावातील महिलांना दिले जाते. शेकडो विद्यार्थ्यांच्या भोजनाची जबाबदारी उचलणार्‍या महिलांना अत्यंत कमी मोबदला दिला जातो. मोबदल्यामध्ये वाढ करावी, त्याचबरोबर त्यांना इतरही सोयी-सुविधा देण्यात याव्या, यासाठी मागील अनेक वर्षांंपासून स्वयंपाकी महिलांनी आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र शासनाने याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. स्वयंपाकी महिलेला दिवसाकाठी केवळ २0 ते ३0 रूपये मजुरी पडते. रोहयोची मजुरी १५0 रूपयाच्यावर असतांनाही स्वयंपाकी महिलांना मात्र २0 ते ३0 रूपयातच समाधान मानावे लागत आहे. कमी मजुरीमुळे बहुतांश गावांमध्ये शालेय आहार बनविण्यास महिला तयार होत नाही. अशी परिस्थिती असतांनाही शालेय पोषण आहार योजना सुरू झाली. तेव्हापासून काही महिला मात्र सातत्याने काम करीत आहेत. आयटकच्यावतीने शालेय पोषण आहार शिजविणार्‍या महिलांचा नुकताच मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला तालुक्यातील सर्वच शालेय पोषण आहार शिजविणार्‍या महिला उपस्थित होत्या. मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयटकचे कार्याध्यक्ष प्रा. रमेश कोरचा, शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद झोडगे, विमल बर्डे, संगीता सोनटक्के, तालुकाध्यक्ष निर्मला साखरे आदी उपस्थित होते. मेळाव्यात शालेय पोषण आहार कर्मचार्‍यांना चपराशी कम कुक पदावर नियुक्त करावे, महिन्याकाठी किमान १0 हजार रूपये वेतन देण्यात यावे, २६ फेब्रुवारीचा जीआर रद्द करण्यात यावा, या कर्मचार्‍यांना कायम करण्यात यावे आदी मागण्यांसाठी तीव्र लढा उभारण्याचे ठरविण्यात आले. यासाठी १५ व १६ जून रोजी मंत्रालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चात अंगणवाडी महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  (तालुका प्रतिनिधी)