शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

हद्दीच्या वादात मृतदेहाची अवहेलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 23:11 IST

आलापल्ली-सिरोंचा मार्गावर रेपनपल्ली गावाजवळ ट्रकने दुचाकीला धडक दिली. या धडकेत युवक जागीच ठार झाला. सदर अपघात सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडला. घटनास्थळ नेमक्या कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दित येते, यावरून रेपनपल्ली व राजाराम पोलीस स्टेशनमध्ये वाद झाला. यामुळे मृतदेह जवळपास तीन तास जागेवरच पडून होता. पोलिसांच्या या कृत्याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देरेपनपल्लीजवळ अपघात : तीन तास मृतदेह उचलला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : आलापल्ली-सिरोंचा मार्गावर रेपनपल्ली गावाजवळ ट्रकने दुचाकीला धडक दिली. या धडकेत युवक जागीच ठार झाला. सदर अपघात सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडला. घटनास्थळ नेमक्या कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दित येते, यावरून रेपनपल्ली व राजाराम पोलीस स्टेशनमध्ये वाद झाला. यामुळे मृतदेह जवळपास तीन तास जागेवरच पडून होता. पोलिसांच्या या कृत्याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.अजय चैतू कुम्मा (२४) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तो भामरागड तालुक्यातील गुब्बागुडा येथील रहिवासी आहे. अजयला ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीसह अजय रस्त्यावरच कोसळला. त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह व क्षतिग्रस्त दुचाकी रस्त्याच्या अगदी मधोमध पडली होती. त्यामुळे ट्रकसारखी मोठी वाहने नेण्यास अडथळा निर्माण झाला होता. ट्रकचालकाने ट्रक रस्त्याच्या बाजुला उभा केला.घटनास्थळ हे रेपनपल्लीपासून पाच किमी अंतरावर आहे. त्यामुळे नागरिकांनी घटनेची माहिती रेपनपल्ली पोलीस स्टेशनला दिली. रेपनपल्ली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पहाणी केली. मात्र घटनास्थळ हे राजाराम पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्याने आपण मृतदेह उचलणार नाही व पंचनामा सुध्दा करणार नाही, असा निर्णय घेऊन ते परत आले. त्यानंतर याबाबतची माहिती राजाराम पोलीस स्टेशनला देण्यात आली. राजाराम पोलिसांनी घटनास्थळ गाठले व मृतदेह उचलला. मात्र दोन पोलीस स्टेशनच्या या वादात मृतदेह जवळपास तीन तास घटनास्थळावरच पडून होता.पोलिसांच्या या असंवेदनशील वृत्तीबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.