शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

कंत्राटदाराने बिलाअभावी अर्धवट सोडले काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:24 IST

शहरातील सर्वोदय वॉर्डात शिव-पार्वती मंदिर ते रोहिदास मंदिर या मार्गाच्या सिमेंटीकरणाचे काम पूर्ण होऊन दीड महिना झाला आहे. पण ...

शहरातील सर्वोदय वॉर्डात शिव-पार्वती मंदिर ते रोहिदास मंदिर या मार्गाच्या सिमेंटीकरणाचे काम पूर्ण होऊन दीड महिना झाला आहे. पण या मार्गाच्या दोन्ही बाजूने पेवर ब्लॉक (गट्टू) न लावता ते काम आहे त्या स्थितीत अर्धवट सोडण्यात आले आहे. परिणामी रस्त्याच्या दोन्ही बाजूने एक फुटापेक्षा जास्त खोल दरी तयार होऊन त्या ठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे. या पाण्यात तयार झालेल्या डासांमुळे नागरिकांना घरासमोर उभे राहणेही कठीण झाले आहे.

विशेष म्हणजे ज्या नागरिकांनी अतिरिक्त पैसे दिले त्यांच्या घरासमोर सिमेंट काँक्रिट टाकून घराच्या दारापर्यंत रस्ता तयार करण्यात आला. पण ज्यांनी पैसे दिले नाहीत, त्यांना एक फूट खड्ड्यातून घरात जाणे-येणे करावे लागत आहे. यामुळे दुचाकी वाहन घराच्या आवारात आणणेही त्यांना अशक्य होत आहे. नाईलाजाने त्यांना जोखीम पत्करत आपले वाहन रात्रभर रस्त्यावर ठेवावे लागत आहे. ही वाहने चोरीला गेल्यास त्या वाहनांची किंमत नगर परिषद भरून देणार की कंत्राटदार? असा प्रश्न नागरिक करू लागले आहेत.

(बॉक्स)

मुख्याधिकारी म्हणतात, पैशांसाठी अडले काम

नगर परिषदेचे खाते दुसऱ्या बँकेत स्थलांतरित करण्याच्या प्रक्रियेमुळे कंत्राटदाराचे पार्ट पेमेंट देणे बाकी आहे, त्यामुळे हे काम कंत्राटदाराने थांबवले, अशी कबुली मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांनी दिली. वास्तविक अशा पद्धतीने बिल मिळाले नाही म्हणून काम अर्धवट स्थितीत थांबवणे नियमात बसत नाही. पण कंत्राटदाराच्या मनमानीपुढे नगर परिषद प्रशासनही हतबल होऊन नागरिकांना होणारा त्रास निमूटपणे सहन करत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

(बॉक्स)

नळाचे पाणी वाया जाते? जाऊ द्या

सर्वोदय वॉर्डातील याच मार्गावर खोबरागडे यांच्या घरासमोर अनेक दिवसांपासून नळाची पाईपलाईन फुटली आहे, त्यातून रात्रंदिवस पाणी वाहात आहे. याबाबत खोबरागडे यांनी तक्रार करून अनेक दिवस उलटले. पण, अजूनपर्यंत ती पाईपलाईन दुरूस्त करण्याची गरज नगर परिषदेला वाटली नाही. त्यातून दिवसाकाठी हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. आता पाऊस जास्त झाल्यानंतर रस्ते, नालीतील अस्वच्छ पाणी त्या फुटलेल्या पाईपलाईनमधून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यात जाऊन डायरिया, काविळ यांसारखे आजार झाल्यास त्यासाठी नगर परिषदेचा संबंधित विभागच जबाबदार राहणार आहे.