शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदाराने बिलाअभावी अर्धवट सोडले काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:24 IST

शहरातील सर्वोदय वॉर्डात शिव-पार्वती मंदिर ते रोहिदास मंदिर या मार्गाच्या सिमेंटीकरणाचे काम पूर्ण होऊन दीड महिना झाला आहे. पण ...

शहरातील सर्वोदय वॉर्डात शिव-पार्वती मंदिर ते रोहिदास मंदिर या मार्गाच्या सिमेंटीकरणाचे काम पूर्ण होऊन दीड महिना झाला आहे. पण या मार्गाच्या दोन्ही बाजूने पेवर ब्लॉक (गट्टू) न लावता ते काम आहे त्या स्थितीत अर्धवट सोडण्यात आले आहे. परिणामी रस्त्याच्या दोन्ही बाजूने एक फुटापेक्षा जास्त खोल दरी तयार होऊन त्या ठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे. या पाण्यात तयार झालेल्या डासांमुळे नागरिकांना घरासमोर उभे राहणेही कठीण झाले आहे.

विशेष म्हणजे ज्या नागरिकांनी अतिरिक्त पैसे दिले त्यांच्या घरासमोर सिमेंट काँक्रिट टाकून घराच्या दारापर्यंत रस्ता तयार करण्यात आला. पण ज्यांनी पैसे दिले नाहीत, त्यांना एक फूट खड्ड्यातून घरात जाणे-येणे करावे लागत आहे. यामुळे दुचाकी वाहन घराच्या आवारात आणणेही त्यांना अशक्य होत आहे. नाईलाजाने त्यांना जोखीम पत्करत आपले वाहन रात्रभर रस्त्यावर ठेवावे लागत आहे. ही वाहने चोरीला गेल्यास त्या वाहनांची किंमत नगर परिषद भरून देणार की कंत्राटदार? असा प्रश्न नागरिक करू लागले आहेत.

(बॉक्स)

मुख्याधिकारी म्हणतात, पैशांसाठी अडले काम

नगर परिषदेचे खाते दुसऱ्या बँकेत स्थलांतरित करण्याच्या प्रक्रियेमुळे कंत्राटदाराचे पार्ट पेमेंट देणे बाकी आहे, त्यामुळे हे काम कंत्राटदाराने थांबवले, अशी कबुली मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांनी दिली. वास्तविक अशा पद्धतीने बिल मिळाले नाही म्हणून काम अर्धवट स्थितीत थांबवणे नियमात बसत नाही. पण कंत्राटदाराच्या मनमानीपुढे नगर परिषद प्रशासनही हतबल होऊन नागरिकांना होणारा त्रास निमूटपणे सहन करत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

(बॉक्स)

नळाचे पाणी वाया जाते? जाऊ द्या

सर्वोदय वॉर्डातील याच मार्गावर खोबरागडे यांच्या घरासमोर अनेक दिवसांपासून नळाची पाईपलाईन फुटली आहे, त्यातून रात्रंदिवस पाणी वाहात आहे. याबाबत खोबरागडे यांनी तक्रार करून अनेक दिवस उलटले. पण, अजूनपर्यंत ती पाईपलाईन दुरूस्त करण्याची गरज नगर परिषदेला वाटली नाही. त्यातून दिवसाकाठी हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. आता पाऊस जास्त झाल्यानंतर रस्ते, नालीतील अस्वच्छ पाणी त्या फुटलेल्या पाईपलाईनमधून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यात जाऊन डायरिया, काविळ यांसारखे आजार झाल्यास त्यासाठी नगर परिषदेचा संबंधित विभागच जबाबदार राहणार आहे.