शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
5
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
6
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
7
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
8
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
9
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
10
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
11
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
12
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
13
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
14
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
16
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
17
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
18
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
19
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
20
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली

पिण्याच्या पाण्याचे ४०० स्रोत दूषित

By admin | Updated: May 20, 2017 01:36 IST

पाणी म्हणजे जीवन असे म्हटले जाते. पण हेच पाणी दूषित असेल तर ते जीवनदायी ठरण्याऐवजी मरणदायी ठरू शकते.

चार महिन्यांतील तपासणी : अहेरी, धानोरा, कोरची तालुक्यातील पाणी सर्वाधिक खराब लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : पाणी म्हणजे जीवन असे म्हटले जाते. पण हेच पाणी दूषित असेल तर ते जीवनदायी ठरण्याऐवजी मरणदायी ठरू शकते. अनेक जलजन्य आजारांच्या उद्रेकास कारणीभूत ठरणाऱ्या दूषित पाण्याचे प्रमाण जिल्ह्यात ५.१७ टक्के आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत जिल्हाभरातील विविध जलस्त्रोतांच्या नमुन्यांची तपासणी केली असता ७७४४ नमुन्यांपैकी ४०० पाणी नमुने दूषित आढळले आहेत. सध्या तीव्र उन्हामुळे अनेक जलस्त्रोत आटले आहेत. पाण्याची गरज भागविण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना मिळेल त्या पाण्यावर तहान भागवावी लागते. पण ते पाणी शुद्ध असतेच असे नाही. अशुद्ध पाण्यातून विविध आजार उद्भवू नये म्हणून त्यांचा शोध घेण्यासाठी दर महिन्याला आरोग्य विभागाकडून पाण्याचे नमुने घेतले जातात. त्यातील अहेरी, आरमोरी, चामोर्शी व कुरखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात पाणी नमुन्याची तपासणी केली जाते. याशिवाय जिल्हास्तरावर जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा आणि भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेच्या प्रयोगशाळेत पाण्याचे नमुने तपासले जातात. प्रत्येक महिन्याला तपासल्या जाणाऱ्या नमुन्यांचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून संबंधित पंचायत समिती स्तरावर आणि संबंधित ग्रामपंचायतपर्यंत कळविला जातो. त्यानुसार कोणते पाण्याचे स्त्रोत दूषित आहेत याची माहिती ग्रामपंचायतला होऊन त्या ठिकाणी ब्लिचिंग पावडर किंवा मेडिक्लोअर टाकून क्लोरिनेशन केले जाते. त्यानंतर हे निर्जंतुकीकरण केलेले पाणी वापरण्यास योग्य होते. परंतू अनेक ग्रामपंचायतींमध्ये ब्लिचिंग पावडरच उपलब्ध नसल्यामुळे दूषित पाणी स्त्रोतांचे निर्जंतुकीकरण होतच नाही. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात जिल्हाभरात १२ तालुक्यांमध्ये ७७४४ पाणी नमुन्यांची तपासणी केली असता ४०० पाण्याचे स्त्रोत दूषित आढळले आहेत. एप्रिल महिन्यात दूषित पाण्याचे प्रमाण काही अंशी कमी झाले आहे. साथरोगाचा धोका बळावला सर्वाधिक दूषित जलस्त्रोत आढळलेल्या तालुक्यांमध्ये अहेरी (२१.०४ टक्के), कुरखेडा (९.६३ टक्के), धानोरा (९.१३ टक्के) आणि कोरची (७.१४ टक्के) या तालुक्यांचा समावेश आहे. यापैकी कोरची तालुक्याची स्थिती एप्रिल महिन्यात सुधारली असली तरी इतर तालुक्यांमध्ये फारसा पडलेला नाही. त्यामुळे त्या तालुक्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून साथरोगाचा आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस पडताच साथरोग पसरण्याची शक्यता आहे. वडसा, मुलचेरा, सिरोंचा, एटापल्ली, भामरागडमध्ये सर्वाधिक शुद्ध पाणी जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये जानेवारीपासून केलेल्या पाणी नमुन्यांच्या तपासणीत एकही नमुना दूषित आढळलेला नाही. त्या तालुक्यांमधील पाण्याचे सर्व स्त्रोत शुद्ध असल्याचे यावरून दिसून येते. त्यात वडसा, मुलचेरा, सिरोंचा, एटापल्ली व भामरागड या पाच तालुक्यांचा समावेस आहे.