शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

येंकापल्ली पुलाचे बांधकाम रखडले

By admin | Updated: November 18, 2015 01:42 IST

येथून पाच किमी अंतरावर असलेल्या येंकापल्ली जवळच्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम मागील पाच वर्षांपासून रखडले आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.

पाच किमीचा होत आहे फेरा : अम्ब्रीशराव आत्राम यांना निवेदन अहेरी : येथून पाच किमी अंतरावर असलेल्या येंकापल्ली जवळच्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम मागील पाच वर्षांपासून रखडले आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. येंकापल्लीजवळ गावाजवळ असलेल्या नाल्यावर पूल बांधकामासाठी २००९ साली मंजुरी मिळाली. तत्कालीन राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते या पुलाचा शिलान्यास करण्यात आले. त्यांच्यानंतर दीपक आत्राम हे आमदार म्हणून निवडून आले. मात्र त्यांच्या कारकीर्दीत या पुलासाठी निधी प्राप्त झाला नाही. सतत पाच वर्ष गावकऱ्यांनी मागणी रेटून धरली होती. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. येंकापल्ली येथील नागरिकांना शिक्षण व कार्यालयीन कामासाठी नेहमीच अहेरी व वांगपेल्ली येथे यावे लागते. मात्र नाल्यावर पूल नसल्याने एक किमीचे अंतर पाच किमी होत आहे. पावसाळ्याच्या दिवसात पुलावरून पाणी राहत असल्याने अनेक दिवस मार्ग बंद राहते. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम या गंभीर मागणीकडे लक्ष देतील या आशेने गावकऱ्यांनी त्यांना निवेदन दिले आहे. निवेदन देतेवेळी सरपंच मदना आलाम, उपसरपंच यमनुरवार, प्रकाश गलबले, नरेंद्र मडावी, विनोद तुमराम, रवींद्र आलाम, विस्तारी तलांडे, ताराबाई गलबले, दिलीप सिडाम, आलाम उपस्थित होते.