शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

केवळ १७९ घरांची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 06:00 IST

२०१९-२० या आर्थिक वर्षात शासनाने ५ हजार १६८ घरे मंजूर केली होती. घर बांधकामाचा शुभारंभ करण्यासाठी संबंधित लाभार्थ्याला पहिला हप्ता दिला जातो. जिल्ह्यातील ४ हजार ८०९ लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. पहिल्या हप्त्याच्या रकमेतून एका विशिष्ट प्रमाणापर्यंत काम केल्यानंतर दुसरा हप्ता मंजूर केला जातो. १ हजार ३३६ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता देण्यात आला आहे.

ठळक मुद्देकाम संथगतीने : प्रधानमंत्री घरकुल योजनेची स्थिती चिंताजनक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ५ हजार १६८ घरे मंजूर करण्यात आली. आर्थिक वर्ष संपण्याच्या मार्गावर असताना केवळ १७९ घरे पूर्ण झाली आहेत. यावरून घर बांधकामाची गती अतिशय संथ असल्याचे दिसून येत आहे.देशातील प्रत्येक कुटुंबाला स्वत:चा पक्का निवारा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत केंद्र शासनामार्फत घर बांधकामासाठी लाभार्थ्याला १ लाख ३० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांची यादी बनविण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्याला प्रथम प्राधान्य या धर्तीवर यादीतील लाभार्थ्यांना घरकूल उपलब्ध करून दिले जात आहे.२०१९-२० या आर्थिक वर्षात शासनाने ५ हजार १६८ घरे मंजूर केली होती. घर बांधकामाचा शुभारंभ करण्यासाठी संबंधित लाभार्थ्याला पहिला हप्ता दिला जातो. जिल्ह्यातील ४ हजार ८०९ लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. पहिल्या हप्त्याच्या रकमेतून एका विशिष्ट प्रमाणापर्यंत काम केल्यानंतर दुसरा हप्ता मंजूर केला जातो. १ हजार ३३६ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता देण्यात आला आहे. २९४ लाभार्थ्यांना तिसरा हप्ता तर ४२ लाभार्थ्यांना चवथा हप्ता देण्यात आला आहे. चवथा व तिसरा हप्ता प्राप्त करणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या कमी आहे. यावरून स्लॅब लेवलपर्यंत घराचे बांधकाम पोहोचलेल्यांची संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे. अजुनही काही घरांचे काम केवळ जोत्यापर्यंतच पूर्ण झाले आहे. आर्थिक वर्ष संपण्याच्या पहिले बांधकाम होणे अपेक्षित आहे.केंद्र शासनाकडून उद्दिष्ट प्राप्त झाल्यानंतर लाभार्थी निवडणे, घरांना मंजुरी देणे व बँक खात्यात पैसे जमा होणे, यासाठी बराच उशीर होते. तोपर्यंत पावसाळा सुरू होते. पावसाळ्यामध्ये घराचे काम करणे शक्य होत नाही. तसेच ग्रामीण भागातील नागरिक शेतीच्या कामात व्यस्त होतात. परिणामी घर बांधकामाकडे दुर्लक्ष होते. उन्हाळ्यातच कामाला गती येते. मात्र रेतीचा तुटवडा असल्याने घरांचे बांधकाम प्रभावित झाले असल्याचे दिसून येत आहे.तीन वर्षात मिळाले १० हजार घरकूलप्रधानमंत्री आवास योजनेची सुरूवात २०१६-१७ या वर्षात झाली. मागील तीन वर्षात १० हजार १६१ घरांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. अजुनही लाखो कुटुंब घरांच्या प्रतीक्षेत आहेत. विद्यमान केंद्र शासनाच्या धोरणानुसार २०२२ पर्यंत प्रत्येकाला पक्के घर द्यायचे आहे. शासनाने ठरविलेल्या उद्दिष्टापेक्षा कितीतरी कमी कुटुंबांना घरकूल मिळाले आहे. दोन वर्षात उर्वरित कुटुंबांना खरच घरकूल मिळणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना