शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

केवळ १७९ घरांची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 06:00 IST

२०१९-२० या आर्थिक वर्षात शासनाने ५ हजार १६८ घरे मंजूर केली होती. घर बांधकामाचा शुभारंभ करण्यासाठी संबंधित लाभार्थ्याला पहिला हप्ता दिला जातो. जिल्ह्यातील ४ हजार ८०९ लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. पहिल्या हप्त्याच्या रकमेतून एका विशिष्ट प्रमाणापर्यंत काम केल्यानंतर दुसरा हप्ता मंजूर केला जातो. १ हजार ३३६ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता देण्यात आला आहे.

ठळक मुद्देकाम संथगतीने : प्रधानमंत्री घरकुल योजनेची स्थिती चिंताजनक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ५ हजार १६८ घरे मंजूर करण्यात आली. आर्थिक वर्ष संपण्याच्या मार्गावर असताना केवळ १७९ घरे पूर्ण झाली आहेत. यावरून घर बांधकामाची गती अतिशय संथ असल्याचे दिसून येत आहे.देशातील प्रत्येक कुटुंबाला स्वत:चा पक्का निवारा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत केंद्र शासनामार्फत घर बांधकामासाठी लाभार्थ्याला १ लाख ३० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांची यादी बनविण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्याला प्रथम प्राधान्य या धर्तीवर यादीतील लाभार्थ्यांना घरकूल उपलब्ध करून दिले जात आहे.२०१९-२० या आर्थिक वर्षात शासनाने ५ हजार १६८ घरे मंजूर केली होती. घर बांधकामाचा शुभारंभ करण्यासाठी संबंधित लाभार्थ्याला पहिला हप्ता दिला जातो. जिल्ह्यातील ४ हजार ८०९ लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. पहिल्या हप्त्याच्या रकमेतून एका विशिष्ट प्रमाणापर्यंत काम केल्यानंतर दुसरा हप्ता मंजूर केला जातो. १ हजार ३३६ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता देण्यात आला आहे. २९४ लाभार्थ्यांना तिसरा हप्ता तर ४२ लाभार्थ्यांना चवथा हप्ता देण्यात आला आहे. चवथा व तिसरा हप्ता प्राप्त करणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या कमी आहे. यावरून स्लॅब लेवलपर्यंत घराचे बांधकाम पोहोचलेल्यांची संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे. अजुनही काही घरांचे काम केवळ जोत्यापर्यंतच पूर्ण झाले आहे. आर्थिक वर्ष संपण्याच्या पहिले बांधकाम होणे अपेक्षित आहे.केंद्र शासनाकडून उद्दिष्ट प्राप्त झाल्यानंतर लाभार्थी निवडणे, घरांना मंजुरी देणे व बँक खात्यात पैसे जमा होणे, यासाठी बराच उशीर होते. तोपर्यंत पावसाळा सुरू होते. पावसाळ्यामध्ये घराचे काम करणे शक्य होत नाही. तसेच ग्रामीण भागातील नागरिक शेतीच्या कामात व्यस्त होतात. परिणामी घर बांधकामाकडे दुर्लक्ष होते. उन्हाळ्यातच कामाला गती येते. मात्र रेतीचा तुटवडा असल्याने घरांचे बांधकाम प्रभावित झाले असल्याचे दिसून येत आहे.तीन वर्षात मिळाले १० हजार घरकूलप्रधानमंत्री आवास योजनेची सुरूवात २०१६-१७ या वर्षात झाली. मागील तीन वर्षात १० हजार १६१ घरांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. अजुनही लाखो कुटुंब घरांच्या प्रतीक्षेत आहेत. विद्यमान केंद्र शासनाच्या धोरणानुसार २०२२ पर्यंत प्रत्येकाला पक्के घर द्यायचे आहे. शासनाने ठरविलेल्या उद्दिष्टापेक्षा कितीतरी कमी कुटुंबांना घरकूल मिळाले आहे. दोन वर्षात उर्वरित कुटुंबांना खरच घरकूल मिळणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना