शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम पंचायतींचे बांधकाम रखडले

By admin | Updated: March 24, 2015 01:46 IST

राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात १४ ग्राम पंचायत इमारतीच्या बांधकामाला

गडचिरोली : राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात १४ ग्राम पंचायत इमारतीच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली. व त्याचा काही प्रमाणात निधीही प्राप्त झाला. मात्र उर्वरित निधी प्राप्त न झाल्याने या ग्राम पंचायतीच्या इमारतींचे बांधकाम रखडले आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४६५ ग्राम पंचायती आहेत. यातील अर्ध्यापेक्षा अधिक ग्राम पंचायती नक्षलप्रभावीत भागामध्ये येतात. नक्षल्यांचा लोकशाहीस विरोध आहे. त्यामुळे लोकशाहीचा एक महत्वाचा भाग असलेल्या ग्राम पंचायतीलाही नक्षल्यांच्या विरोधाचा सामना करावा लागतो. परिणामी आजपर्यंत अनेक ग्रामपंचायतींची जाळपोळही झाली आहे. गावाच्या विकासाचे केंद्र असलेल्या ९४ ग्राम पंचायतींना स्वत:च्या इमारती नव्हत्या. त्यामुळे गावाचे महत्वाचे दस्ताऐवज भाड्याच्या कौलारू खोलीत ठेवावे लागत होते. पाऊस व उंदरांमुळे या दस्ताऐवजास धोका निर्माण झाल्याने शासनाने गडचिरोली जिल्ह्यात राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत १४ ग्राम पंचायतींना नवीन इमारत उपलब्ध करून देण्यासाठी निधी मंजूर केला. या योजनेंतर्गत प्रत्येक ग्राम पंचायतीला १२ लाख रूपयांचा निधी प्राप्त करून दिला जातो. यामध्ये केंद्राचा वाटा ९ लाख रूपये व जिल्हा विकास निधीतून ३ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून द्यायचा होता. या अंतर्गत केंद्र शासनाचा प्रत्येकी ४.५ निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून काही ग्राम पंचायतींचे स्लॅब लेव्हलपर्यंत बांधकामही करण्यात आले आहे. उर्वरित बांधकाम मात्र निधी अभावी रखडले आहे. महत्वाचे म्हणजे जिल्ह्याच्या विकासात महत्वपूर्ण जबाबदारी निभविणाऱ्या जिल्हा नियोजन व विकास समितीनेही याकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. वर्षभराचा कालावधी लोटूनही रूपयाचाही निधी ग्राम पंचायत इमारतीसाठी उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांकडून जिल्हा नियोजन व विकास समितीच्या धोरणाविषयीही तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. (नगर प्रतिनिधी)नक्षल्यांच्या धमकीने गावकऱ्यांनी पैसे केले परत४भामरागड व एटापल्ली हे दोनही तालुके नक्षलदृष्ट्या संवेदनशील मानले जातात. भामरागड तालुक्यातील धिरंगी, कुव्वाकोडी, नेलगुंडा ही अतिशय दुर्गम भागात असलेली गावे आहेत. या गावांमध्ये ग्रामपंचायत इमारत मंजूर झाल्याचे नक्षल्यांना माहित पडताच त्यांनी गावकरी व ग्रामसेवकास ग्रामपंचायती इमारत न बांधण्याची धमकी दिली. त्यामुळे धास्तावलेल्या गावकऱ्यांनी बांधकाम सुरू केले नाही. एवढेच नाही तर प्राप्त झालेला ४.५ लाखांचा निधीही परत केला आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आता या गावांऐवजी कोरची तालुक्यातील सातपुती, अहेरी तालुक्यातील मद्दीकुंब व गडचिरोली तालुक्यातील गिलगाव या गावांची निवड केली असून त्या गावांमध्ये ग्रामपंचायतीचे बांधकाम केले जाणार आहे. जिल्ह्यात १४ ग्रामपंचायतींना मंजूर झाल्या इमारतीगडचिरोली तालुक्यातील राजोली, विहीरगाव, चामोर्शी तालुक्यातील ठाकरी, जैरामपूर, कोरची तालुक्यातील कोरची, मुलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली, सिरोंचा तालुक्यातील विठ्ठलरावपेठा, अहेरी तालुक्यातील खमनचेरू, इष्टापूरदौड, भामरागड तालुक्यातील धिरंगी, कु व्वाकोडी, आरेवाडा, नेलगुंडा, एटापल्ली तालुक्यातील चोखेवाडा या ठिकाणच्या ग्रामपंचायतींना शासनाकडून इमारती मंजूर झाल्या आहेत.