शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी क्षेत्रात नद्यांवर बंधारे बांधा

By admin | Updated: November 18, 2016 01:25 IST

गडचिरोली जिल्ह्यात नद्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या नद्यांवर बंधारे बांधल्यास शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल.

नियम ३७७ वर चर्चा : अशोक नेते यांची लोकसभेत मागणीगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नद्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या नद्यांवर बंधारे बांधल्यास शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे नागरिक विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊन नक्षलवादाची समस्या सुटण्यास फार मोठी मदत होईल. त्यामुळे नद्यांवर बंधारे बांधण्याची योजना हाती घ्यावी, अशी मागणी नियम ३७७ अंतर्गत खासदार अशोक नेते यांनी लोकसभेत केली आहे.लोकसभेत निवेदन सादर करताना खासदार अशोक नेते म्हणाले की, शासनाने आदिवासी बहूल क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहासाठी वनजमिनीचे वाटप केले आहे. मात्र सिंचनाअभावी शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकला नाही. जोपर्यंत आदिवासी नागरिकांना वाटप करण्यात आलेल्या वनजमिनीच्या सिंचनासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात येत नाही. तोपर्यंत त्यांच्या जमिनी पडिक राहणार आहेत. त्यांची आर्थिक उन्नती होऊ शकणार नाही. आज देशात नक्षलवादी मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नक्षल प्रभावित असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. नक्षलवादी वाढण्याचे मागासलेपण व अविकसीतपणा हे महत्त्वाचे कारण आहे. गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगेच्या अनेक उपनद्या आहेत. त्याचबरोबर मोठमोठे नाले सुध्दा आहेत. या उपनद्या व नाल्यांना आठ महिने पाणी राहते. या नद्यांवर बंधारे बांधल्यास शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल. लहान बंधारे बांधण्यासाठी केंद्रीयस्तरावर एक कार्यक्रम हाती घेण्यात यावा, बंधारे बांधल्यास येथील शेतीला आठ महिने सिंचन सुविधा उपलब्ध होईल. नागरिकांचा विकास झाल्यास नागरिक आपोआप नक्षलवाद्यांना धूडकावून लावतील. त्यामुळे केंद्र शासनाने बंधारे बांधण्याची योजना तत्काळ अंमलात आणावी, अशी मागणी लोकसभेला सादर केलेल्या निवेदनातून केली आहे. (प्रतिनिधी)वनपट्ट्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करणे गरजेचेगडचिरोली जिल्ह्यात हजारो नागरिकांना वनपट्टे वाटप करण्यात आले आहेत. मात्र हे वनपट्टे सिंचनाच्या सोयीअभावी पडिक असल्याची बाब संसदेच्या लक्षात आणून दिली. मोठे सिंचन प्रकल्प उभे करणे जंगलामुळे अशक्य असल्याने नद्या व नाल्यांवर लहान बंधारे बांधल्यास वनपट्ट्यांना सिंचन सुविधा उपलब्ध होईल, असाही मुद्दा खा. नेते यांनी उपस्थित केला.