शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

मोदींच्या विरोधात काँग्रेसचा एल्गार

By admin | Updated: May 27, 2015 01:37 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले.

गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले. मात्र वर्षभरात या सरकारने लोकहिताची कामे न केल्याने काँग्रेस पक्षाने आज गडचिरोली, धानोरा व अन्य ठिकाणी मोदी सरकारच्या ‘अच्छे दिन’ची पुण्यतिथी साजरी केली.गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोस्टर लावून पुण्यतिथी साजरी केली. त्यानंतर सरकारविरोधात निषेध सभा घेण्यात आली. या सभेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, आरमोरीचे माजी आमदार आनंदराव गेडाम, काँग्रेसचे प्रदेश सचिव हसनअली गिलानी, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पंकज गुड्डेवार, ज्येष्ठ नेते नामदेवराव गडपल्लीवार, वसंत कुळसंगे, अमिता लोणारकर, जिल्हा परिषद सदस्य केसरी उसेंडी, शंकरराव सालोटकर, सुनील वडेट्टीवार, नरेंद्र डोंगरे, महेंद्र ब्राम्हणवाडे, रजनीकांत मोटघरे, नामदेव उडाण, पांडुरंग घोटेकर, नंदू वाईलकर, आकाश बघेले, लता ढोक, प्रेमिला जुमनाके, प्रेमिला मेश्राम यांच्यासह काँग्रेसचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. महागाई वाढली, शेतमालाला भाव दिला नाही, बेरोजगारांना रोजगार दिला नाही. भूमी अधिग्रहण कायद्याद्वारे शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगपतींना देण्याचा डाव सुरु आहे, यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. निवडणुकीपूर्वी ‘अच्छे दिन’ आणू, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु लोकांना बुरे दिन पाहावयास मिळत आहेत. एकंदरीत हे सरकार लोकहिताची कामे करण्यात अपयशी ठरले, त्यामुळे आम्ही सरकारच्या अच्छे दिनची पुण्यतिथी साजरी करीत आहोत, असे काँग्रेस नेत्यांनी यावेळी सांगितले.विकासाचा केवळ आभास-उसेंडी‘अच्छे दिन’चे आश्वासन देऊन एक वर्षापूर्वी सत्तेत आलेले मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. मात्र केवळ विकास झाल्याचा आभास निर्माण करून जनतेची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या प्रमाणात पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी झाल्या आहे, त्या तुलनेत दर कमी करण्यात आले नाही. जीवनावश्यक वस्तुंचे भाव जैसे थेच आहेत. मेक इन इंडियामध्ये गुंतवणूक झाली नाही. औषधे महाग झाली आहेत. प्रशासनातील अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी लोकपाल, माहिती आयुक्त आदी पदे भरले नाहीत. प्रत्यक्ष जनतेला अच्छे दिन नाही तर बुरे दिन आल्याची टीका केली. यावेळी माजी आ. आनंदराव गेडाम, हसनअली गिलानी, चंदू वडपल्लीवार, केशरी उसेंडी, शंकर सालोटकर, पांडुरंग घोटेकर उपस्थित होते.