शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या विरोधात काँग्रेसचा एल्गार

By admin | Updated: May 27, 2015 01:37 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले.

गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले. मात्र वर्षभरात या सरकारने लोकहिताची कामे न केल्याने काँग्रेस पक्षाने आज गडचिरोली, धानोरा व अन्य ठिकाणी मोदी सरकारच्या ‘अच्छे दिन’ची पुण्यतिथी साजरी केली.गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोस्टर लावून पुण्यतिथी साजरी केली. त्यानंतर सरकारविरोधात निषेध सभा घेण्यात आली. या सभेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, आरमोरीचे माजी आमदार आनंदराव गेडाम, काँग्रेसचे प्रदेश सचिव हसनअली गिलानी, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पंकज गुड्डेवार, ज्येष्ठ नेते नामदेवराव गडपल्लीवार, वसंत कुळसंगे, अमिता लोणारकर, जिल्हा परिषद सदस्य केसरी उसेंडी, शंकरराव सालोटकर, सुनील वडेट्टीवार, नरेंद्र डोंगरे, महेंद्र ब्राम्हणवाडे, रजनीकांत मोटघरे, नामदेव उडाण, पांडुरंग घोटेकर, नंदू वाईलकर, आकाश बघेले, लता ढोक, प्रेमिला जुमनाके, प्रेमिला मेश्राम यांच्यासह काँग्रेसचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. महागाई वाढली, शेतमालाला भाव दिला नाही, बेरोजगारांना रोजगार दिला नाही. भूमी अधिग्रहण कायद्याद्वारे शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगपतींना देण्याचा डाव सुरु आहे, यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. निवडणुकीपूर्वी ‘अच्छे दिन’ आणू, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु लोकांना बुरे दिन पाहावयास मिळत आहेत. एकंदरीत हे सरकार लोकहिताची कामे करण्यात अपयशी ठरले, त्यामुळे आम्ही सरकारच्या अच्छे दिनची पुण्यतिथी साजरी करीत आहोत, असे काँग्रेस नेत्यांनी यावेळी सांगितले.विकासाचा केवळ आभास-उसेंडी‘अच्छे दिन’चे आश्वासन देऊन एक वर्षापूर्वी सत्तेत आलेले मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. मात्र केवळ विकास झाल्याचा आभास निर्माण करून जनतेची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या प्रमाणात पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी झाल्या आहे, त्या तुलनेत दर कमी करण्यात आले नाही. जीवनावश्यक वस्तुंचे भाव जैसे थेच आहेत. मेक इन इंडियामध्ये गुंतवणूक झाली नाही. औषधे महाग झाली आहेत. प्रशासनातील अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी लोकपाल, माहिती आयुक्त आदी पदे भरले नाहीत. प्रत्यक्ष जनतेला अच्छे दिन नाही तर बुरे दिन आल्याची टीका केली. यावेळी माजी आ. आनंदराव गेडाम, हसनअली गिलानी, चंदू वडपल्लीवार, केशरी उसेंडी, शंकर सालोटकर, पांडुरंग घोटेकर उपस्थित होते.