शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
4
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
8
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
9
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
12
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
13
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
14
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
15
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
16
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
17
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
18
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
19
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
20
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP

काँग्रेसच्या जिल्हा निवड समिती बैठकीत महिला पदाधिकाऱ्यांना डावलले

By admin | Updated: November 16, 2016 02:10 IST

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे देसाईगंज व गडचिरोली येथील नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे

प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार : सूचविलेली उमेदवारांची नावे वाद्यांत येण्याची शक्यतागडचिरोली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे देसाईगंज व गडचिरोली येथील नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार निश्चित करण्यासाठी ९ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या बैठकीला महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष व गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या पराभूत उमेदवार यांना निमंत्रण न दिल्याने त्यांनी या प्रकरणाची थेट तक्रार प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. त्यामुळे या बैठकीत समितीने निश्चित केलेल्या नावांवर आपला आक्षेप असल्याचे या दोन्ही महिला पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी जिल्हास्तरावरून शिफारस झालेली नावे वाद्यांत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १८ डिसेंबर रोजी गडचिरोली व देसाईगंज नगर पालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी जिल्हास्तरावर थेट नगराध्यक्ष व वार्डातील नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारांची नावे निश्चित करण्याकरिता काँग्रेसच्या जिल्हा निवड मंडळाची बैठक ९ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. या बैठकीला महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना संजय वानखेडे व गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून गतवेळी पराभूत झालेल्या उमेदवार सगुणा पेंटाजी तलांडी यांना बोलविण्यात आले नाही. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अ‍ॅड. रवींद्र दरेकर यांनाही निमंत्रीत करण्यात आले नाही. या तीन प्रमुख नेत्यांना डावलून बैठकीने परस्पर नाव निश्चित केले आहे. या नावांना आपला आक्षेप असल्याचे महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे व गडचिरोलीच्या पराभूत काँग्रेस उमेदवार सगुणा तलांडी यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पाठविलेल्या तक्रारीत म्हटले आहे. येत्या २१ नोव्हेंबर रोजी जिल्हा निवड समितीने निश्चित केलेल्या नावांवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची निवड समिती मुंबई येथे बैठक घेऊन विचार विनिमय करणार होती. मात्र आता दोन जबाबदार पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांच्या नावावर आक्षेप घेणारी लेखी तक्रार नोंदविल्याने या प्रकरणी प्रदेश काँग्रेसस्तरावर पडसाद उमटण्याची शक्यता आहे. प्रदेश काँग्रेसचे महासचिव अ‍ॅड. गणेश पाटील यांना विचारणा केली असता, मी सध्या बाहेर मुंबईतच आहे. काँग्रेसचे अखिल भारतीय उपाध्यक्ष खासदार राहूल गांधी यांच्या सभेची तयारी सुरू आहे. गडचिरोलीच्या निवडणुकीला वेळ आहे. ज्यावेळी उमेदवार निवडीची बैठक होईल. त्यावेळी या मुद्यावर लक्ष घातले जाईल, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)