शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

काँग्रेसच्या जिल्हा निवड समिती बैठकीत महिला पदाधिकाऱ्यांना डावलले

By admin | Updated: November 16, 2016 02:10 IST

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे देसाईगंज व गडचिरोली येथील नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे

प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार : सूचविलेली उमेदवारांची नावे वाद्यांत येण्याची शक्यतागडचिरोली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे देसाईगंज व गडचिरोली येथील नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार निश्चित करण्यासाठी ९ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या बैठकीला महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष व गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या पराभूत उमेदवार यांना निमंत्रण न दिल्याने त्यांनी या प्रकरणाची थेट तक्रार प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. त्यामुळे या बैठकीत समितीने निश्चित केलेल्या नावांवर आपला आक्षेप असल्याचे या दोन्ही महिला पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी जिल्हास्तरावरून शिफारस झालेली नावे वाद्यांत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १८ डिसेंबर रोजी गडचिरोली व देसाईगंज नगर पालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी जिल्हास्तरावर थेट नगराध्यक्ष व वार्डातील नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारांची नावे निश्चित करण्याकरिता काँग्रेसच्या जिल्हा निवड मंडळाची बैठक ९ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. या बैठकीला महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना संजय वानखेडे व गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून गतवेळी पराभूत झालेल्या उमेदवार सगुणा पेंटाजी तलांडी यांना बोलविण्यात आले नाही. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अ‍ॅड. रवींद्र दरेकर यांनाही निमंत्रीत करण्यात आले नाही. या तीन प्रमुख नेत्यांना डावलून बैठकीने परस्पर नाव निश्चित केले आहे. या नावांना आपला आक्षेप असल्याचे महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे व गडचिरोलीच्या पराभूत काँग्रेस उमेदवार सगुणा तलांडी यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पाठविलेल्या तक्रारीत म्हटले आहे. येत्या २१ नोव्हेंबर रोजी जिल्हा निवड समितीने निश्चित केलेल्या नावांवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची निवड समिती मुंबई येथे बैठक घेऊन विचार विनिमय करणार होती. मात्र आता दोन जबाबदार पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांच्या नावावर आक्षेप घेणारी लेखी तक्रार नोंदविल्याने या प्रकरणी प्रदेश काँग्रेसस्तरावर पडसाद उमटण्याची शक्यता आहे. प्रदेश काँग्रेसचे महासचिव अ‍ॅड. गणेश पाटील यांना विचारणा केली असता, मी सध्या बाहेर मुंबईतच आहे. काँग्रेसचे अखिल भारतीय उपाध्यक्ष खासदार राहूल गांधी यांच्या सभेची तयारी सुरू आहे. गडचिरोलीच्या निवडणुकीला वेळ आहे. ज्यावेळी उमेदवार निवडीची बैठक होईल. त्यावेळी या मुद्यावर लक्ष घातले जाईल, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)