शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या जिल्हा निवड समिती बैठकीत महिला पदाधिकाऱ्यांना डावलले

By admin | Updated: November 16, 2016 02:10 IST

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे देसाईगंज व गडचिरोली येथील नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे

प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार : सूचविलेली उमेदवारांची नावे वाद्यांत येण्याची शक्यतागडचिरोली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे देसाईगंज व गडचिरोली येथील नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार निश्चित करण्यासाठी ९ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या बैठकीला महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष व गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या पराभूत उमेदवार यांना निमंत्रण न दिल्याने त्यांनी या प्रकरणाची थेट तक्रार प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. त्यामुळे या बैठकीत समितीने निश्चित केलेल्या नावांवर आपला आक्षेप असल्याचे या दोन्ही महिला पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी जिल्हास्तरावरून शिफारस झालेली नावे वाद्यांत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १८ डिसेंबर रोजी गडचिरोली व देसाईगंज नगर पालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी जिल्हास्तरावर थेट नगराध्यक्ष व वार्डातील नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारांची नावे निश्चित करण्याकरिता काँग्रेसच्या जिल्हा निवड मंडळाची बैठक ९ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. या बैठकीला महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना संजय वानखेडे व गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून गतवेळी पराभूत झालेल्या उमेदवार सगुणा पेंटाजी तलांडी यांना बोलविण्यात आले नाही. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अ‍ॅड. रवींद्र दरेकर यांनाही निमंत्रीत करण्यात आले नाही. या तीन प्रमुख नेत्यांना डावलून बैठकीने परस्पर नाव निश्चित केले आहे. या नावांना आपला आक्षेप असल्याचे महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे व गडचिरोलीच्या पराभूत काँग्रेस उमेदवार सगुणा तलांडी यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पाठविलेल्या तक्रारीत म्हटले आहे. येत्या २१ नोव्हेंबर रोजी जिल्हा निवड समितीने निश्चित केलेल्या नावांवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची निवड समिती मुंबई येथे बैठक घेऊन विचार विनिमय करणार होती. मात्र आता दोन जबाबदार पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांच्या नावावर आक्षेप घेणारी लेखी तक्रार नोंदविल्याने या प्रकरणी प्रदेश काँग्रेसस्तरावर पडसाद उमटण्याची शक्यता आहे. प्रदेश काँग्रेसचे महासचिव अ‍ॅड. गणेश पाटील यांना विचारणा केली असता, मी सध्या बाहेर मुंबईतच आहे. काँग्रेसचे अखिल भारतीय उपाध्यक्ष खासदार राहूल गांधी यांच्या सभेची तयारी सुरू आहे. गडचिरोलीच्या निवडणुकीला वेळ आहे. ज्यावेळी उमेदवार निवडीची बैठक होईल. त्यावेळी या मुद्यावर लक्ष घातले जाईल, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)