शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अहेरी व कुरखेडात काँग्रेसची निदर्शने

By admin | Updated: August 7, 2015 01:19 IST

केंद्र शासनाने काँग्रेसच्या २५ खासदारांना निलंबित केले. याविरोधात गुरूवारी अहेरी व कुरखेडा तालुका काँग्रेसच्या वतीने निदर्शने करून अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

निवेदन सादर : शासनाच्या विरोधात दिल्या घोषणाअहेरी/कुरखेडा : केंद्र शासनाने काँग्रेसच्या २५ खासदारांना निलंबित केले. याविरोधात गुरूवारी अहेरी व कुरखेडा तालुका काँग्रेसच्या वतीने निदर्शने करून अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.अहेरी काँग्रेसच्या वतीने केंद्र शासनाला पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ललीत गेट प्रकरणातील ललीत मोदी यांना मदत करण्यात केंद्रीयमंत्री सुषमा स्वराज व राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा हात असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर व्यापम घोटाळ्यात तेथील मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण हे प्रमुख असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस खासदारांनी केली होती. मात्र केंद्र शासनाने काँगे्रस विरोधात डाव रचत सुमारे २५ खासदारांना निलंबित केले, असे म्हटले आहे. केेंद्र शासनाच्या या निर्णयाविरोधात अहेरी तालुका काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शन दिले. त्यानंतर नायब तहसीलदार सत्यनारायण सिलमवार यांच्या मार्फतीने निवेदन सादर करून २५ खासदारांचे निलंबन मागे घेण्यात यावे, असे म्हटले आहे. यावेळी अहेरी तालुका काँग्रेस अध्यक्ष महेबुब अली, शीला चौधरी, प्रशांत आर्इंचवार, उषा आत्राम, अरूण बेझलवार, व्यंकटेश चिलनकर, युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष बालाजी गावडे, हाजी जलीलुद्दीन काझी, ग्राम पंचायत सदस्य सलीम शेख, अरूणा गेडाम, अविनाश भोले, गणेश चापडे, बब्बू शेख, विलास जम्पलवार, सदाशिव गर्गम, कांता कोड्रावार, भीमबाई गद्दलवार, राशिदा शेख, अक्तर बानो, अंकु दब्बा यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.कुरखेडा - तालुका काँग्रेसच्या वतीने स्थानिक गांधी चौकात ११ वाजता केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. त्यानंतर कुरखेडाचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, पंचायत समिती सभापती शामीना उईके, पं. स. सदस्य प्रभाकर तुलावी, उस्मान खॉ पठाण, गिरीधर जनबंधू, माधव दहिकर, अविनाश डोंगरे, जयंत हरडे, अमोल पवार, सुभाष नैताम, कुरखेडाचे सरपंच आशा तुलावी, गुलाब डांगे, दीपक बागडे, यशवंत गावतुरे, राहुल बागडे, गणेश सिडाम, भास्कर मडावी, धर्मेंद्र मडावी, विमला हलामी, मनोज अंबादे, ईश्वर रमकेशर, तानू सहारे, ग्रा. पं. सदस्य सिराज पठाण, बन्नू हलामी, रोहीत ढवळे आदी उपस्थित होते. जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुरूवारी केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केले, अशी माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी दिली आहे.