गडचिरोली : १९९५ च्या निवडणुकीत जिल्ह्यातील तिनही विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ४० उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत रंगत आली होती. त्यानंतर १९९९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रातून २१ उमेदवारांनी आपले भाग्य अजमाविले होते. या निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसला जबरदस्त हादरा बसला. आरमोरी शिवसेना, गडचिरोलीत भाजप तर सिरोंचा गोंडवाना गणतंत्र पार्टीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. आरमोरी विधानसभा क्षेत्रात एकूण १ लाख ७३ हजार १०२ मतदारांपैकी १ लाख २९ हजार ६१२ मतदारांनी मतदान केले. या निवडणुकीत शिवसेनेचे रामकृष्ण हरि मडावी यांनी ३६ हजार ४१० मते प्राप्त करीत विजय मिळविला. काँग्रेसचे आनंदराव गंगाराम गेडाम यांना ३६ हजार ४, अपक्ष नंदू नरोटे यांना १६ हजार ४३९, राष्ट्रवादी काँग्रेसचे हरिराम वरखडे यांना १४ हजार २७९ मते प्राप्त झाले. तर बसपाचे श्रीराम मडावी यांना ९९१ मतांवरच समाधान मानावे लागले. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात एकूण १ लाख ७७ हजार ५२६ मतदारांपैकी १ लाख २४ हजार ६८० मतदारांनी आपला हक्क बजाविला. यापैकी १ लाख १७ हजार ५५२ मते वैध ठरली. या निवडणुकीत भाजपचे अशोक महादेव नेते यांनी ४७ हजार ३९१ मते प्राप्त करीत विजयी मिळविला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मारोतराव सैनुजी कोवासे यांना ३९ हजार २९३, राष्ट्रवादी काँग्रेसचे नामदेव दल्लूजी उसेंडी यांना १७ हजार ७८७ मते प्राप्त झाली. सिरोंचा विधानसभा क्षेत्रातील १ लाख ७३ हजार १०० मतदारांपैकी १ लाख २१ हजार १९३ मतदारांनी निवडणुकीत हक्क बजाविला. या निवडणुकीत गणतंत्र पार्टीचे धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम यांनी २७ हजार ९८२ मते प्राप्त करीत विजयी मिळविला. काँग्रेसच्या सगुणा तलांडी यांना २७ हजार ६०७ तर नाविसचे सत्यवानराव आत्राम यांना २३ हजार ९९१, भाजपचे जोगा मडावी यांना २० हजार ९७९, राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक मल्लाजी आत्राम यांना १० हजार ७६५ मते मिळाली.
१९९९ मध्ये काँग्रेसला हादरा
By admin | Updated: September 21, 2014 23:51 IST