शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

एटापल्लीत काँग्रेसचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:31 IST

एटापल्ली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून एकरी १० हजार रूपये आर्थिक मदत देण्यात यावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी तालुका काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष तथा जि.प. सदस्य संजय चरडुके यांच्या नेतृत्वात.....

ठळक मुद्दे शासनाच्या विरोधात नारेबाजी : एसडीओंना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : एटापल्ली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून एकरी १० हजार रूपये आर्थिक मदत देण्यात यावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी तालुका काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष तथा जि.प. सदस्य संजय चरडुके यांच्या नेतृत्वात शुक्रवारी शेतकरी, शेतमजुरांचा विशाल मोर्चा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयवर काढण्यात आला. दरम्यान काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विद्यमान सरकारच्या धोरणाविरोधात नारेबाजी केली.या मोर्चाची सुरुवात पेपर मिल कॉलनीपासून करण्यात आली. मुख्य मार्गाने मोर्चा आगेकुच करीत एटापल्ली येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. शेतकरी, शेतमजूर सहभागी असलेल्या या मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. येथे जि.प. सदस्य संजय चरडुके, पं.स. सदस्य शालिक गेडाम, नगर पंचायतीचे उपाध्यक्ष रमेश गम्पावार, जारावंडीचे सरपंच सुधाकर टेकाम, हरीदास टेकाम यांनी मोर्चेकºयांना मार्गदर्शन केले.यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी विद्यमान केंद्र व राज्य सरकारचे धोरण हे शेतकरी व शेतमजूर विरोधी असल्याचे सांगितले. विद्यमान सरकारच्या काळात शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. मात्र या सरकारने गडचिरोली जिल्ह्यातील शेतकºयांना सरसकट कर्ज माफीचा लाभ दिला नाही. एकूणच शेतकºयांच्या प्रश्नाप्रती हे सरकार गंभीर नाही, अशी टीकाही पदाधिकाºयांनी यावेळी केली.त्यानंतर उपविभागीय अधिकाºयांच्या नावे असलेले विविध मागण्यांचे निवेदन एसडीओ कार्यालयाचे नायब तहसीलदार डोर्लीकर यांनी स्वीकारले. या मोर्चात जि.प. सदस्य ऋषी पोरतेट, नगर पंचायतीचे पाणीपुरवठा सभापती जितेंद्र टिकले, बांधकाम सभापती किसन हिचामी, नगरसेवक ज्ञानेश्वर रामटेके, तानाजी दुर्वा, नगरसेविका दीपयंती पेंदाम, विनोद चव्हाण, मनोहर हिचामी, डॉ. ढोके, मोहन नामेवार, उषा ठाकरे, बंटी जुनघरे, उमेश मडावी, राकेश लोनबले, राकेश बोनपल्लीवार, पुनेश्वर खोब्रागडे, अनिल कांबळे, शुभम दुर्वा, मंदा गेडाम, श्यामला मडावी, सुनंदा उईके, वर्षा उसेंडी, अनिल तेलकुंठलवार आदींसह नागरिक उपस्थित होते.या आहेत निवेदनातील मागण्याएटापल्ली तालुक्यातील जबरानजोत जमिनीवरील प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढून पट्टे वाटप करण्यात यावे.जारावंडी-कसनसूर-एटापल्ली रस्त्याचे मजबुतीकरण तसेच कांदळी व झुरी नाल्यावरील पुलाच्या बांधकामास निधी देऊन काम सुरू करावे.पिपली बुर्गी येथील मंजूर झालेले प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे.शेतीविषयक योजनेच्या लाभाकरिता शेतकऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्राची अट शिथील करून पूर्वीप्रमाणे योजनेचा लाभ देण्यात यावा.जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी न्यायालयीन प्रक्रिया रद्द करून पूर्वीप्रमाणे तालुका दंडाधिकाºयांकडे देण्याची प्रक्रिया सुरू करावी.शेतकºयांना सरसरकट कर्जमाफी करून सातबारावरील बोजा कमी करावा.