शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

प्रलंबित प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक

By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST

भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने जनतेला दिलेले आश्वासन पाळलेले नाहीत. जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला आहे.

जिल्ह्यातील २० प्रश्नांवर सरकारला घेरणार : काँग्रेस नेत्यांची पत्रकार परिषदगडचिरोली : भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने जनतेला दिलेले आश्वासन पाळलेले नाहीत. जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला आहे. जिल्ह्यातील २० प्रलंबित प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागपूर विधानभवनावर ८ डिसेंबर रोजी मोर्चा नेण्यात येणार आहे, अशी माहिती गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला माजी खा. मारोतराव कोवासे, माजी आ. आनंदराव गेडाम, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, माजी जि. प. अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, प्रदेश युवक काँग्रेसचे पंकज गुड्डेवार, प्रभाकर वासेकर, मनोहर पोरेटी, मुक्तेश्वर गावडे, मोंटू ब्राम्हणवाडे, पांडुरंग घोटेकर, शंकरराव सालोटकर आदी उपस्थित होते.यावेळी माहिती देताना डॉ. उसेंडी यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून एकरी २५ हजार रूपयांची मदत द्यावी, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, महागाईला आळा घालावा, राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याने सामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. धानाला प्रती क्विंटल ३ हजार ५०० रूपये, कापसाला ७ हजार रूपये व सोयाबीनला ४ हजार रूपये भाव देण्यात यावा, गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच ९२ शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करावे, काँग्रेस सरकारने मंजूर केलेले चिचडोह, हलदीपुरानी, कोटगल, कोसरी, येंगलखेडा या सिंचन प्रकल्पांना निधी देऊन त्यांचे काम सुरू करावे, वनसंवर्धन कायद्यामुळे तुलतुली, कारवाफा, चेन्ना, पिपरीरिठ, डुकरकानगुड्रा, कळमगाव बॅरेजचे काम रखडले आहे. या सिंचन प्रकल्पांना मंजुरी प्रदान करावी, गडचिरोली शहरात काँगे्रस सरकारच्या काळात १०० खाटांचे प्रशस्त महिला व बाल रुग्णालय उभारण्यात आले. मात्र या रुग्णालयाला राज्य शासन कर्मचारी उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करीत आहे. या रुग्णालयासाठी पदभरती सुरू करावी, गडचिरोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे, ओबीसी व मुस्लिमांचे आरक्षण पूर्ववत करावे, राज्यपालांनी ९ जून रोजी काढलेल्या अधिसूचनेत बदल करून ज्या गावांमध्ये ५१ टक्केपेक्षा अधिक आदिवासी जनता आहे, अशाच गावांना पेसामध्ये समाविष्ट करावे, गडचिरोली जिल्हा विकास प्राधिकरणाला मंजुरी द्यावी, ओबीसी विद्यार्थ्यांना सर्वच अभ्यासक्रमांकरिता शिष्यवृत्ती देण्यात यावी आदी मागण्यांकडे राज्य सरकारचे मोर्चाच्या माध्यमातून लक्ष वेधणार असल्याचे डॉ. उसेंडी व काँग्रेस नेत्यांनी सांगितले.या मोर्चाला जिल्ह्यातून जवळपास पाच हजार काँग्रेस कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.