शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बौद्ध समाजबांधवांनी एकसंघ राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 23:11 IST

बौद्ध समाजातील लोकांनी गटातटात विभागून न राहता एक संघ राहिले पाहिजे. समाज संघटित असेल तर सामाजिक कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. त्यामुळे बौद्ध समाजबांधवांनी संघटित राहावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी रविवारी सकाळी येथे आयोजित कार्यक्रमात केले.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे आवाहन : अहेरीत धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : बौद्ध समाजातील लोकांनी गटातटात विभागून न राहता एक संघ राहिले पाहिजे. समाज संघटित असेल तर सामाजिक कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. त्यामुळे बौद्ध समाजबांधवांनी संघटित राहावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी रविवारी सकाळी येथे आयोजित कार्यक्रमात केले.येथील इंदिरा नगर परिसरातील नियोजित धम्म दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगदीश बद्रे होते. प्रमुख अतिथी म्हणून गौतम मेश्राम, प्रा.नीरज खोब्रागडे, प्रा.विजय खोंडे, प्रा.डॉ.जगदीश राठोड आदी उपस्थित होते. पुढे बोलताना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिका संघटित व्हावा व संघर्ष करा, या मूलमंत्रानुसार बौद्ध समाजबांधवांनी आचरण ठेवायला हवे, आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले पाहिजे, शुद्ध आचरण ठेवून आनंदीमय जीवन जगा, असे पालकमंत्री यांनी सांगितले. केंद्र व राज्य सरकार अनुसूचित जाती व जमातीच्या कल्याणासाठी अनेक योजनेचा लाभ घेऊन विकास करावा. अहेरीच्या इंदिरानगर येथील नियोजित जागेवर बुद्ध विहाराचे बांधकाम व इतर कामासाठी दोन कोटी रूपयांचा निधी देऊ, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.याप्रसंगी गौतम मेश्राम, जगदीश बद्रे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक समाज मंडळाचे सहसचिव सुरेश अलोणे, संचालन आनंद अलोणे यांनी केले तर आभार किशोर शंभरकर यांनी मानले.