शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

बौद्ध समाजबांधवांनी एकसंघ राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 23:11 IST

बौद्ध समाजातील लोकांनी गटातटात विभागून न राहता एक संघ राहिले पाहिजे. समाज संघटित असेल तर सामाजिक कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. त्यामुळे बौद्ध समाजबांधवांनी संघटित राहावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी रविवारी सकाळी येथे आयोजित कार्यक्रमात केले.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे आवाहन : अहेरीत धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : बौद्ध समाजातील लोकांनी गटातटात विभागून न राहता एक संघ राहिले पाहिजे. समाज संघटित असेल तर सामाजिक कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. त्यामुळे बौद्ध समाजबांधवांनी संघटित राहावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी रविवारी सकाळी येथे आयोजित कार्यक्रमात केले.येथील इंदिरा नगर परिसरातील नियोजित धम्म दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगदीश बद्रे होते. प्रमुख अतिथी म्हणून गौतम मेश्राम, प्रा.नीरज खोब्रागडे, प्रा.विजय खोंडे, प्रा.डॉ.जगदीश राठोड आदी उपस्थित होते. पुढे बोलताना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिका संघटित व्हावा व संघर्ष करा, या मूलमंत्रानुसार बौद्ध समाजबांधवांनी आचरण ठेवायला हवे, आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले पाहिजे, शुद्ध आचरण ठेवून आनंदीमय जीवन जगा, असे पालकमंत्री यांनी सांगितले. केंद्र व राज्य सरकार अनुसूचित जाती व जमातीच्या कल्याणासाठी अनेक योजनेचा लाभ घेऊन विकास करावा. अहेरीच्या इंदिरानगर येथील नियोजित जागेवर बुद्ध विहाराचे बांधकाम व इतर कामासाठी दोन कोटी रूपयांचा निधी देऊ, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.याप्रसंगी गौतम मेश्राम, जगदीश बद्रे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक समाज मंडळाचे सहसचिव सुरेश अलोणे, संचालन आनंद अलोणे यांनी केले तर आभार किशोर शंभरकर यांनी मानले.