शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
"अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

कार्मेल हायस्कूलमध्ये गोंधळ

By admin | Updated: June 4, 2017 00:37 IST

येथील कार्मेल हायस्कूलमधून एकूण १५२ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यापैकी सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येथील कार्मेल हायस्कूलमधून एकूण १५२ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यापैकी सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र फॉर्मेटिव्ह असेसमेंटमध्ये (एफए) अत्यंत कमी गुण मिळाल्याचा आरोप होत आहे. यासाठी शाळेचे प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप करून पालक व विद्यार्थ्यांनी केला. दिवसभर शाळेच्या आवारात ठाण मांडून याबद्दल मुख्याध्यापक व शाळा प्रशासनाला जाब विचारत होते. ज्या विद्यार्थ्यांना कम्युनिटीव्ह असेसमेंटमध्ये (एसए) ए-१ गुण मिळाले आहेत. त्या विद्यार्थ्यांना एफएमध्ये बी २, सी २, डी २, ई पर्यंतची श्रेणी देण्यात आली आहे. एफएचे गुण आॅनलाईन पध्दतीने चेन्नई येथील सीबीएसईच्या बोर्डाकडे शाळेतून पाठवावे लागतात. मात्र कदाचित शाळेने गुणच पाठविले नसावे किंवा पाठविलेले गुण बोर्डाला मिळाले नसावे, असाही आरोप पालकांनी केला आहे. गुण पाठविल्यानंतर ते बोर्डाला मिळाले किंवा नाही, याची शहानिशा करणे मुख्याध्यापक व शाळा प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र निकाल लागेपर्यंत याबद्दल काहीही चौकशी शाळेने केली नाही. निकाल घोषीत झाल्यानंतर एफएमध्ये अत्यंत कमी गुण मिळाले असल्याचे लक्षात येताच पालक व विद्यार्थ्यांना धक्काच बसला. पालकांनी शाळेमध्ये जमा होऊन जे गुण आपल्याकडून पाठविण्यात आले, त्याची ओसी आपल्याला देण्यात यावी, अशी मागणी केली. मात्र संबंधित शिक्षक नसल्याने आपण ओसी उपलब्ध करून देऊ शकत नाही, अशी भूमिका प्राचार्य जीनेश यांनी घेतली. यामुळे पालकवर्गाचा संताप अनावर झाला. शाळेतच पत्रकार परिषद घेऊन झालेल्या प्रकाराबाबतची माहिती पत्रकारांना दिली. विद्यार्थ्यांना कमी गुण मिळण्यासाठी शाळेचे प्रशासनच जबाबदार आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी व शाळा प्रशासनाची मान्यता काढावी, अशी मागणी केली. शाळेच्या चुकीसाठी विद्यार्थ्यांना वेठीस न धरता सीबीएसई बोर्डाने शाळेकडून योग्य गुणांची यादी शाळेकडून मागवून त्यांचा समावेश करावा व गुणांमध्ये बदल करावा, अशी मागणी केली आहे. सायंकाळी ४ वाजतानंतर पालक आक्रमक झाले. त्यामुळे शाळा प्रशासनाने पोलिसांना बोलावून सर्व पालकांना शाळेच्या आवारातून बाहेर काढले. गुणांमध्ये झालेल्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचा निकालही शाळा प्रशासनाने शनिवारी जाहीर केला नाही. केवळ १०० टक्के निकाल लागला आहे, अशी माहिती प्राचार्य जीनेश यांनी दिली.विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले असल्याने काही तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणतीच शाळा अत्यंत कमी गुण टाकून स्वत:च्या विद्यार्थ्यांचे नुकसान करून घेणार नाही. विद्यार्थ्यांना शाळेने पाठविलेले गुण मिळावे, यासाठी शाळेच्या वतीने सीबीएसई परीक्षा बोर्डाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. आॅनलाईन पध्दतीने जाहीर झालेला निकाल अंतिम राहत नाही. मार्कशीट बनेपर्यंत त्यामध्ये सुधारणा करता येऊ शकते. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. पालकांनी धीर धरावा.- जीनेश, प्राचार्य, कारमेल हायस्कूल गडचिरोली