शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

उत्पादन खर्चानुसार धानाला हमीभाव द्या

By admin | Updated: December 2, 2015 01:16 IST

महाराष्ट्र राज्याच्या पूर्व विदर्भातील धान उत्पादक जिल्ह्यांमध्ये गतवर्षी २०१४-१५ च्या हंगामात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे ५० ते ६० टक्के शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

शून्य प्रहरात अशोक नेते यांची मागणीगडचिरोली : महाराष्ट्र राज्याच्या पूर्व विदर्भातील धान उत्पादक जिल्ह्यांमध्ये गतवर्षी २०१४-१५ च्या हंगामात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे ५० ते ६० टक्के शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तसेच यंदाही धान उत्पादक जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे केंद्र शासनाने उत्पादन खर्चानुसार धानाला हमीभाव द्यावा, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी मंगळवारी लोकसभेच्या अधिवेशनात शुन्य प्रहारात केली. यावेळी खासदार अशोक नेते यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती सभागृहात मांडली. यंदाच्या खरीप हंगामात अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच धानाला पुरेसा भाव नसल्याने पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा व नागपूर जिल्ह्याच्या धान उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने खासगी व्यापाऱ्यांना धान विकावे लागत आहे. या सर्व परिस्थितीमुळे पूर्व विर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. धानाला योग्य भाव न मिळाल्यास शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची पाळी येऊ शकते. त्यामुळे केंद्र शासनाने उत्पादन खर्चाच्या आधारे धानाला हमीभाव देण्याची घोषणा करावी. जेणे करून खुल्या बाजारात शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव मिळेल. धानाला प्रती क्विंटल २ हजार ५०० ते तीन हजार पर्यंतचा हमीभाव देण्यासाठी केंद्र शासनाने तत्काळ पावले उचलावित, अशी विनंती खासदार अशोक नेते यांनी सभागृहात केली. दरम्यान खासदार अशोक नेते यांनी सभागृहात पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सभागृहात मांडल्या. (स्थानिक प्रतिनिधी)