शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

गडचिरोलीत रस्त्यांसाठी अटी होणार शिथिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 15:05 IST

नक्षलग्रस्त भाग आणि वनकायद्याच्या अटी याचा धसका घेतलेल्या कंत्राटदारांनी ग्रामीण भागातील कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांकडे पाठ फिरविली आहे. आता त्यावर उपाय म्हणून निविदाधारकांसाठी अटलेल्या अटींमध्ये बरीच शिथिलता देण्याचा प्रयोग केला जाणार आहे.

ठळक मुद्देकंत्राटदारच मिळेना दुर्गम भागातील कामे अनेक वर्षांपासून प्रलंबित

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलग्रस्त भाग आणि वनकायद्याच्या अटी याचा धसका घेतलेल्या कंत्राटदारांनी ग्रामीण भागातील कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे वारंवार निविदा काढूनही रस्त्यांची कामे प्रलंबित पडलेली आहेत. आता त्यावर उपाय म्हणून निविदाधारकांसाठी अटलेल्या अटींमध्ये बरीच शिथिलता देण्याचा प्रयोग केला जाणार आहे.७८ टक्के जंगलाने व्यापलेल्या या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रस्त्यांची कामे करण्याची जबाबदारी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना या यंत्रणेकडे दिली आहे. केंद्र सरकारकडून प्राप्त निधीनुसार या यंत्रणेकडून आवश्यक त्या भागासाठी दरवर्षी रस्त्यांच्या कामांच्या निविदा काढल्या जातात. मात्र नक्षलवाद्यांकडून होणारा विरोध, त्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास कंत्राटदाराचे केले जाणारे नुकसान, नक्षल्यांच्या मागण्या पूर्ण केल्यास पोलिसांकडून होणारा त्रास, महसुली खदानी उपलब्ध नसल्यामुळे खडी व मुरूम गोळा करताना येणाऱ्या अडचणी, कामे करताना वनकायद्याचे उल्लंघन केले म्हणून वनविभागाकडून केल्या जाणाºयाऱ्या कारवाया, अशा एक ना अनेक अडथळे पार करून कामे करताना कंत्राटदारांच्या नाकी नऊ येतात. परिणामी ही दुर्गम भागातील कामे करण्यासाठी कंत्राटदार निविदाच भरत नसल्याची वस्तुस्थिती दिसून येत आहे.२०१७-१८ या वर्षाकरिता ३६ कामांसाठी ३ वेळा निविदा प्रक्रिया झाली. आता त्यातील २६ कामांचा लिलाव झाला तरीही १० कामांसाठी निविदाच आल्या नाहीत. याशिवाय जुनी १२ कामे निविदेविना प्रलंबित आहेत. गडचिरोली जिल्ह्यासाठी स्थिती पाहता या कामांसाठी आता निविदा भरणाऱ्या कंत्राटदारासाठी असलेल्या अनेक अटी शिथिल करण्याची मागणी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांनी अधीक्षक अभियंत्यांकडे केली आहे. त्यात आता डांबरीकरणाच्या कामांसाठी कंत्राटदाराकडे हॉटमिक्स प्लान्ट असणे, पेवर, वेगवेगळे रोलर, बिटमेन स्प्रेयर आदी मशिनरीज स्वत:च्या मालकीच्या असण्याची अट काढण्याची मागणी केली आहे. एवढेच नाही तर कंत्राटदाराकडे आता केवळ १५ लाखाच्या कामाच्या परवाना असला तरी त्याला निविदा भरण्याची सूट दिली जाणार आहे.

तब्बल १५ वेळा काढल्या निविदा !२००८ मध्ये अशाच एका रस्त्याच्या कामावरील कंत्राटदाराने नक्षल्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याने त्याची हत्या करण्यात आली. त्यामुळे त्या वर्षीच्या २ कामांसह २००९ मधील २९ कामांसाठी आतापर्यंत कोणत्याच कंत्राटदाराने निविदा भरलेली नाही. या ३१ कामांसाठी गेल्या १० वर्षात तब्बल १५ वेळा निविदा काढण्यात आल्या. पण कंत्राटदार आले नाही. यावर्षी शेवटची निविदा काढताना काही अटी शिथिल केल्या. त्यात संबंधित कंत्राटदाराकडे केवळ ५० लाखांच्या कामाचे रजिस्ट्रेशन असावे एवढीच अट ठेवली. त्यामुळे १७ कामांचा लिलाव होऊ शकला.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक