शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

गडचिरोलीत रस्त्यांसाठी अटी होणार शिथिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 15:05 IST

नक्षलग्रस्त भाग आणि वनकायद्याच्या अटी याचा धसका घेतलेल्या कंत्राटदारांनी ग्रामीण भागातील कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांकडे पाठ फिरविली आहे. आता त्यावर उपाय म्हणून निविदाधारकांसाठी अटलेल्या अटींमध्ये बरीच शिथिलता देण्याचा प्रयोग केला जाणार आहे.

ठळक मुद्देकंत्राटदारच मिळेना दुर्गम भागातील कामे अनेक वर्षांपासून प्रलंबित

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलग्रस्त भाग आणि वनकायद्याच्या अटी याचा धसका घेतलेल्या कंत्राटदारांनी ग्रामीण भागातील कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे वारंवार निविदा काढूनही रस्त्यांची कामे प्रलंबित पडलेली आहेत. आता त्यावर उपाय म्हणून निविदाधारकांसाठी अटलेल्या अटींमध्ये बरीच शिथिलता देण्याचा प्रयोग केला जाणार आहे.७८ टक्के जंगलाने व्यापलेल्या या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रस्त्यांची कामे करण्याची जबाबदारी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना या यंत्रणेकडे दिली आहे. केंद्र सरकारकडून प्राप्त निधीनुसार या यंत्रणेकडून आवश्यक त्या भागासाठी दरवर्षी रस्त्यांच्या कामांच्या निविदा काढल्या जातात. मात्र नक्षलवाद्यांकडून होणारा विरोध, त्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास कंत्राटदाराचे केले जाणारे नुकसान, नक्षल्यांच्या मागण्या पूर्ण केल्यास पोलिसांकडून होणारा त्रास, महसुली खदानी उपलब्ध नसल्यामुळे खडी व मुरूम गोळा करताना येणाऱ्या अडचणी, कामे करताना वनकायद्याचे उल्लंघन केले म्हणून वनविभागाकडून केल्या जाणाºयाऱ्या कारवाया, अशा एक ना अनेक अडथळे पार करून कामे करताना कंत्राटदारांच्या नाकी नऊ येतात. परिणामी ही दुर्गम भागातील कामे करण्यासाठी कंत्राटदार निविदाच भरत नसल्याची वस्तुस्थिती दिसून येत आहे.२०१७-१८ या वर्षाकरिता ३६ कामांसाठी ३ वेळा निविदा प्रक्रिया झाली. आता त्यातील २६ कामांचा लिलाव झाला तरीही १० कामांसाठी निविदाच आल्या नाहीत. याशिवाय जुनी १२ कामे निविदेविना प्रलंबित आहेत. गडचिरोली जिल्ह्यासाठी स्थिती पाहता या कामांसाठी आता निविदा भरणाऱ्या कंत्राटदारासाठी असलेल्या अनेक अटी शिथिल करण्याची मागणी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांनी अधीक्षक अभियंत्यांकडे केली आहे. त्यात आता डांबरीकरणाच्या कामांसाठी कंत्राटदाराकडे हॉटमिक्स प्लान्ट असणे, पेवर, वेगवेगळे रोलर, बिटमेन स्प्रेयर आदी मशिनरीज स्वत:च्या मालकीच्या असण्याची अट काढण्याची मागणी केली आहे. एवढेच नाही तर कंत्राटदाराकडे आता केवळ १५ लाखाच्या कामाच्या परवाना असला तरी त्याला निविदा भरण्याची सूट दिली जाणार आहे.

तब्बल १५ वेळा काढल्या निविदा !२००८ मध्ये अशाच एका रस्त्याच्या कामावरील कंत्राटदाराने नक्षल्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याने त्याची हत्या करण्यात आली. त्यामुळे त्या वर्षीच्या २ कामांसह २००९ मधील २९ कामांसाठी आतापर्यंत कोणत्याच कंत्राटदाराने निविदा भरलेली नाही. या ३१ कामांसाठी गेल्या १० वर्षात तब्बल १५ वेळा निविदा काढण्यात आल्या. पण कंत्राटदार आले नाही. यावर्षी शेवटची निविदा काढताना काही अटी शिथिल केल्या. त्यात संबंधित कंत्राटदाराकडे केवळ ५० लाखांच्या कामाचे रजिस्ट्रेशन असावे एवढीच अट ठेवली. त्यामुळे १७ कामांचा लिलाव होऊ शकला.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक